स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वाधवान बंधू पास प्रकरणाची सीबीआय चौकशी करा : देवेंद्र फडणवीस

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
ADVERTISEMENT

स्थैर्य, मुंबई, दि. 18 : वादग्रस्त वाधवान बंधू व कुटुंबियांना लॉकडाऊनच्या काळात खंडाळा ते महाबळेश्‍वर असा प्रवास करण्यासाठी विशेष पास दिल्याने वादात सापडलेले प्रधान सचिव अमिताभ गुप्ता हे पुन्हा सेवेत रूजू झाले आहेत. त्यांच्याकडे आता स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, यात्रेकरू यांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुखपदही देण्यात आले आहे. यामुळे सरकारवर टीका करताना, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

राज्यात तसेच देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर आंतरजिल्हा प्रवासास बंदी घालण्यात आली. मात्र वाधवान कुटुंबियांनी खंडाळा ते महाबळेश्‍वर असा प्रवास केला होता. प्रवास करताना त्यांनी अमिताभ गुप्ता यांच्या सहीचे पत्र पोलिसांना दाखवले होते. ही बाब उघड झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली.10 एप्रिल रोजी अमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र चौकशी समितीने गुप्ता यांना समज देऊन प्रकरणावर पडदा टाकला आहे. आता महिन्याभरानंतर अमिताभ गुप्ता पुन्हा कामावर रूजू झाले आहेत. त्यांना अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी यांना त्यांच्या मूळगावी पाठविण्याबाबत नेमण्यात आलेल्या समितीचे प्रमुखपदही देण्यात आले आहे. यावर भाजपने जोरदार टीका केली.

लॉकडाऊनच्या काळात ईडीचा आरोप असलेल्या वाधवान बंधूंना पास देणारे सरकारी अधिकारी अमिताभ गुप्ता पुन्हा रूजू झाले आहेत. कोणताही सरकारी अधिकारी आपल्या भरोशावर असा पास देऊ शकत नाही. जोपर्यंत सरकारमधील किंवा सरकार चालविणार्‍या प्रमुख लोकांचा आशिर्वाद, आदेश देत नाहीत तोपर्यंत असा पास दिला जात नाही. हे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आहे की वाधवान सरकार आहे, असा प्रश्‍न विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


Tags: राज्य
ADVERTISEMENT
Previous Post

विलगीकरण कक्षात असणाऱ्या 232 जणांचे घशातील स्त्राव पाठविले

Next Post

मिलीटरी कॅन्टीनतर्फे कार्डधारकांना आवाहन

Next Post

मिलीटरी कॅन्टीनतर्फे कार्डधारकांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

केदारेश्वर मंदिरा शेजारील सिमेंट बंधारा

औंध येथील सिमेंट बंधारा निर्लेखित करु नये, शेतकऱ्यांची मागणी

March 4, 2021

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर, 28 तारखेला दिला होता राजीनामा

March 4, 2021

पोलिस प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, अपघात असल्याचे भासवण्यासाठी केली मोठी प्लॅनिंग

March 4, 2021

6 दिवसांपूर्वी भाजपमध्ये सामील झालेले 88 वर्षीय ई श्रीधरन मुख्यमंत्री पदाचे अधिकृत उमेदवार

March 4, 2021

एंजल ब्रोकिंगच्या चीफ ग्रोथ ऑफिसरपदी प्रभाकर तिवारी यांची नियुक्ती

March 4, 2021

महिला दिनानिमित्त ट्रेलचा ‘सुपरस्त्री’ उपक्रम

March 4, 2021

उत्तर सोलापूर तालुक्यातील 23 गावांचे होणार ड्रोनद्वारे भूमापन, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप यांची माहिती

March 4, 2021

सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत, आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीवरून अजितदादांच्या महसूल, वित्त विभागाला सूचना

March 4, 2021

जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनीजारी केले पून्हा सुधारित आदेश

March 4, 2021

मंत्री अस्लम शेख आणि भाजपा आमदार मंगलप्रभात लोढा यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी

March 4, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.