संचारबंदी उल्लंघनप्रकरणी मत्यापुर येथे गुन्हे दाखल


स्थैर्य, सातारा, दि. 19 : मत्यापुर (ता.सातारा) येथील भीमरावदादा घोरपडे यांच्या सावडण्याच्या विधीप्रसंगी संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी सातजणांसह अनोळखी ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये अतीत गावच्या सरपंचासह भागातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत अतीत (ता.सातारा) गावच्या सरपंच सौ.प्रतीक्षा चंद्रसेन कांबळे, दादा कांबळे (रा.मत्यापुर.ता.सातारा), जयवंत गायकवाड (रा.माजगाव,ता.सातारा), शिवाजी निकम (रा.अपशिंगे मि,ता.सातारा),अशोक घाडगे( रा.खोजेवाडी, ता.सातारा),अच्युत घोरपडे (रा.नांदगाव,ता.सातारा), सुधीर जाधव (रा.अतीत,ता.सातारा) यांच्यासह ५० अनोळखी इसमांवर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतची फिर्याद पोलिस हवालदार सुनील दिंगबर जाधव यांनी केली असून अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत कुंभार करत आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!