स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

तलाठी परीक्षा उत्तीर्ण होवूनही दीड वर्ष नियुक्त्याच नाहीत उत्तीर्ण उमेदवारांचा बेमुदत उपोषणाचा इशारा

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
March 23, 2021
in सातारा जिल्हा

स्थैर्य, सातारा, दि.२३: सातारा जिल्ह्यातील तलाठी पदांसाठी 2019 मध्ये परीक्षा झाली होती. मात्र, सुमारे 18 महिन्यांनंतरही परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांना अद्यापही नियुक्ती देण्यात आली नाही. यामुळे 1 एप्रिलपर्यंत नियुक्त्या दिल्या नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा इशारा उत्तीर्ण परीक्षार्थींनी दिला आहे.
याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्हाधिकारी तलाठी पदभरतीसाठी फेब्रु 2019 मध्ये अर्ज मागविण्यात आले होते. या पदांची परिक्षा जुले 2019 मध्ये घेण्यात आली. साधारण सप्टेंबर-ऑक्टो महिन्यात (2019) या परिक्षेचे गुण या कार्यालयास प्राप्त झालेले आहेत. या घटनेस साधारण 17-18 महिन्यांचा कालावधी होऊन गेला आहे. पण अद्याप सातारा जिल्हा निवड समितीने व जिल्हाधिकारी यांनी उमेदवारांना नियुक्त्या दिल्या नाहीत. या उमेदवारांसोबत परिक्षा देणारे इतर जिल्हयातील परिक्षार्थी त्या-त्या जिल्हयांमध्ये हजर होऊन, वर्षांचा कालावधी होऊन गेलेला आहे. मध्यंतरी असणारी कोरोनाची परिस्थिती आणि लॉकडाऊन यामुळे उमेदवार शांत होते. पण त्यानंतर रखडलेली 5 जिल्ह्यांची तलाठी भरती तात्काळ करावी, असे परिपत्रक शासनाने काढूनसुदधा आजतागायत उमेदवारांना हजर करून घेतले नाही. परिक्षा सर्वांनी एकत्र दिली. मग सेवा देताना भेदभाव का? एक दीड वर्षांच्या दिरंगाईने झालेले आर्थिक, मानसिक, कौटुंबिक नुकसान यास जबाबदार कोण? सातार्‍याला अर्ज केला हा गुन्हा आहे काय? देशात बेरोजगारी वाढत असताना गेली एक-दीड वर्षे कोणतीही जाहिरात नाही. कोणतीही परिक्षा नाही आणि उत्तीर्ण होऊनसुदधा जुलै 2019 च्या परिक्षेचे जॉइनिंग नाही. उमेदवारांचे भवितव्य प्रशासनाच्या दप्तरदिरंगाईने टांगणीला लागले आहे. वारंवार निवेदने, अर्ज, विनंत्या करूनही निराश झालो असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच येत्या 1 एप्रिलपर्यंत नियुक्त्या दिल्या नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 05 एप्रिलपासून बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही निवेदनात दिला आहे.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

तंबाखूची पुडी घेवून येइपर्यंत चोरट्यांनी केली मोटारसायकल लंपास

Next Post

तुषार नाईक निंबाळकर व विजयकुमार लोंढे पाटील यांची श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या संचालक मंडळावर नियुक्ती

Next Post

तुषार नाईक निंबाळकर व विजयकुमार लोंढे पाटील यांची श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या संचालक मंडळावर नियुक्ती

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,024 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या शुभेच्छा

April 12, 2021

‘५० वर्षावरील कलाकारांसाठी मासिक मानधन योजना’ विहित प्रक्रियेनुसारच – सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे स्पष्टीकरण

April 12, 2021

भीती न बाळगता लस घ्या – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

April 12, 2021

मृत्यूदर कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत : पालकमंत्री छगन भुजबळ

April 12, 2021

राज्यपाल, मुख्यमंत्री, नॅशनल मेडिकल कौन्सिल, केंद्रीय आरोग्य मंत्रालय आदींशी चर्चा करून परीक्षेसंदर्भात निर्णय घेणार – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

April 12, 2021

नेस्को संकुलात आणखी १५०० खाटांची सुविधा; कोविड सेंटरसाठी आमदार निधीतून मशिन्स देणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई

April 12, 2021

बारावीची परीक्षा मे अखेरीस तर १० वीची परीक्षा जूनमध्ये घेण्याबाबतचे नियोजन आणि परिपूर्ण तयारी करावी – मुख्यमंत्री

April 12, 2021

फलटण तालुक्यातील १५७ तर सातारा जिल्ह्यातील १०१६ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; १० बाधितांचा मृत्यु

April 12, 2021

लॉकडाऊनऐवजी कोरोनावर प्रभावी उपाय करा – भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

April 12, 2021

माजी आमदार पास्कल धनारे यांच्या निधनाने आदिवासींचा सेवक गमावला – भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील यांनी अर्पण केली श्रद्धांजली

April 12, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.