कृषि निविष्ठांची चढ्या दरांने विक्री केल्यास कारवाई; जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविंद्र माने यांचा इशारा


स्थैर्य, सोलापूर, दि. २८ : जिल्ह्यातील कोणत्याही कृषि सेवा केंद्रामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त दराने खताची विक्री करणे, खत उपलब्ध असूनही देण्यास नकार देणे, पक्के बिल न देणे, खरेदी पावती न देणे, मुदत बाहय कृषि निविष्ठांची विक्री करणे इत्यादी प्रकारच्या तक्रारी असल्यास तात्काळ तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. तालुकास्तरावर शंकेचे निराकरण न झाल्यास जिल्हास्तरीय अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी पुढील दक्षता घ्यावी.

  1. बियाण्याची गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रत्यांकडूनच खरेदीस प्राधान्य दयावे.
  2. बियाणे खरेदीची पक्की पावती त्यावर बियाणांचा संपूर्ण तपशील पिक वाण, संपूर्ण लॅाट नंबर, कंपनीचे नाव, खरेदीदाराचे नाव, पत्ता व स्वाक्षरी तसेच विक्रत्याचे नाव पत्ता व स्वाक्षरी आहे याची खात्री करावी.
  3. खरेदी केलेल्या बियाणांचे वेष्टन /पिशवी, टँग, खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिक कापणी होई पर्यंत जपून ठेवावे.
  4. खरेदी केलेले बियाणे त्याच हंगामासाठी शिफारस केल्याची खात्री करावी.
  5. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकीटावरची अंतीम मुदत पाहून घ्यावी.

शेतकऱ्यांचे तालुकास्तरावर तक्रारीबाबत समाधान न झाल्यास खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

  1. सागर बारवकर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक मो.नं.8788670050
  2. अशोक मोरे, मोहिम अधिकारी ,जिल्हा परिषद सोलापूर मो. नं. 7083774100
  3. साहेबराव बेंदगुडे, कृषि विकास अधिकारी, सोलापूर मो.नं. 7559361663
  4. रविंद्र माने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सोलापूर मो. नं. 8975011900

Back to top button
Don`t copy text!