• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

यात्रांना परवानगी मिळणार?; म्हसवड, पुसेगाव, औंध, पाली यात्रांकडे व्यावसायिकांच्या नजरा

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 25, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, विसापूर, दि.२५: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेले आठ महिने राज्यातील बंद असलेली मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, मंदिरे उघडण्यासोबतच राज्य सरकार ग्रामीण भागातील यात्रांना परवानगी देणार का? अशी नागरिकांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे. 

जिल्ह्यातील म्हसवड, पुसेगाव, औंध, पाली या यात्रा महिन्याच्या अंतराने भरतात. म्हसवडच्या यात्रेस फक्त काही दिवसांचाच कालावधी राहिला आहे. या यात्रांमध्ये तात्पुरता व्यवसाय करून कुटुंबाची जबाबदारी सांभाळत असलेल्या व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. आकाशी पाळणे, खेळण्याची दुकाने, प्रसादाची दुकाने, मिठाई, जिलेबी-फरसाण, संसारोपयोगी वस्तू, सौंदर्य प्रसाधने, मनोरंजनाची साधने आदी विक्री करणारे व्यावसायिक यात्रेसाठी येतात. यात्रेतील या हंगामी व्यवसायावर हजारो कुटुंबे अवलंबून असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चपासून चालू वर्षीच्या यात्रा रद्द झाल्याने या व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. परिणामी, मंदिरे दर्शनासाठी खुली झाली असली, तरी आगामी यात्रा भरविण्यास राज्य सरकार परवानगी देणार का? या चिंतेत हंगामी व्यावसायिक सापडले आहेत. 

महामार्गालगतच्या बॅटरी दुकानांत चोरट्यांचा धूडगूस; तब्बल 28 बॅटरी पळवल्या

दरम्यान, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशासह भारतातील विविध राज्यातील लाखो भाविकही या यात्रा पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित असतात. ग्रामीण भागातील या यात्रांमध्ये कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होते. मात्र, या यात्रा भरविण्यास परवानगी न मिळाल्यास हंगामी व्यावसायिकांसोबतच स्थानिक व्यापाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होण्याची शक्‍यता आहे. लॉकडाउनमुळे डबघाईला आलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राज्य सरकारने सकारात्मकता दाखवून या यात्रांना परवानगी देण्याची मागणी भाविक, व्यावसायिक व नागरिक करत आहेत. 

मागील 15 वर्षांपासून यात्रांमध्ये मिठाईच्या दुकानाचा व्यवसाय करतो. माझ्यासाठी हा हंगामी व्यवसाय उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मात्र, यात्रा बंद असल्याने नुकसान भरून काढणे कठीण झाले आहे.


Tags: सातारा
Previous Post

साताऱ्यात उदयनराजेंचा हटके अंदाज; जिप्सी रायडिंग अन् गाण्यावर अफलातून ठेका..

Next Post

महामार्गालगतच्या बॅटरी दुकानांत चोरट्यांचा धूडगूस; तब्बल 28 बॅटरी पळवल्या

Next Post

महामार्गालगतच्या बॅटरी दुकानांत चोरट्यांचा धूडगूस; तब्बल 28 बॅटरी पळवल्या

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्थानक योजनेत फलटणचा समावेश : रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव; खासदार रणजितसिंह यांच्या प्रयत्नांना यश

मार्च 29, 2023

ग्रामदैवत फलटण, पुरातन श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहण हे फलटणच्या परंपरेला साजेसे काम : आ.श्रीमंत रामराजे

मार्च 29, 2023

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी ‘आयएफसी’ सोबतचा भागिदारी करार उपयुक्त ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे प्रतिपादन

मार्च 29, 2023

प्रवचने – पैशाच्या आसक्तित राहू नये

मार्च 29, 2023

कमी पाण्यात जास्तीच्या उत्पन्नाची हमी देणारी ‘प्रति थेंब अधिक पीक योजना’

मार्च 29, 2023

ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मार्च 29, 2023

कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे संजय कोळी यांचे दीर्घ आजाराने निधन

मार्च 29, 2023

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात सातारा जिल्हा राज्यात अव्वल

मार्च 29, 2023

वझीरएक्सने पारदर्शकता अहवालाची चौथी आवृत्ती सादर केली

मार्च 29, 2023

मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्पाचे काम आठ दिवसात मार्गी लावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

मार्च 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!