स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

इतक्या उशिरा चौपाटी सुरु करण्यामागचे गौडबंगाल काय? – अमोल मोहिते

हप्ते ठरवण्यासाठी व्यावसायिकांची उपासमार केल्याची चर्चा

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
March 20, 2021
in सातारा जिल्हा

स्थैर्य, सातारा, दि.२०: कोरोना महामारीमध्ये लॉकडाऊन झाल्यानंतर राजवाडा चौपाटी बंद करण्यात आली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्वकाही चालू झाले मात्र पालिकेने स्वच्छतेचे कारण पुढे करून चौपाटी बंदच ठेवली. व्यवसाय बंद असल्याने या व्यावसायिकांची उपासमार होत होती मात्र कोणीही लक्ष दिले नाही. आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून रुग्ण वाढीमुळे पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राजवाडा चौपाटी सुरुच करायची होती तर आधी का नाही केली एवढ्या उशिरा सुरु करण्याचा निर्णय का घेतला? यामागचे नेमके गौडबंगाल काय असा प्रश्न नगरविकास आघाडीचे पक्ष प्रतोद अमोल मोहिते यांनी केला असून आर्थिक तडजोडीसाठी पालिका पदाधिकाऱ्यांनी इतके दिवस त्यांची उपासमार केली अशी चर्चा शहरात दबक्या आवाजात सुरु असल्याचेही म्हटले आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मोहिते यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे गेल्या कित्तेक महिन्यांपासून राजवाडा चौपाटी बंद होती. लॉकडाऊन उठल्यानंतरही स्वच्छतेचे कारण पुढे करून सातारा पालिकेने चौपाटी बंद ठेण्याचा निर्णय घेतला. त्याठिकाणच्या व्यावसायिकांनी वारंवार मागणी करूनही चौपाटी सुरु झाली नाही. तसेच चौपाटीवरील व्यावसायिकांना दुसरी जागाही निश्चित करण्यात आली मात्र व्यावसायिकांनी त्याला विरोध करून राजवाडा चौपाटी सुरु करण्याचा आग्रह धरला होता. व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची कित्तेक महिन्यांपासून उपासमार सुरु होती. काही व्यावसायिकांवर आत्महत्या करण्याचीही वेळ आली. त्यावेळी कोणीही या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. आता पुन्हा कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनामुळे इतके दिवस बंद असणारी राजवाडा चौपाटी आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना इतक्या उशिरा चौपाटी सुरु करण्याचा निर्णय घेतला याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. चौपाटी सुरूच करायची होती तर मग यापूर्वी का सुरु केली नाही असा सवाल उपस्थित होत असून यामागचे गौडबंगाल काय, असा सवाल मोहिते यांनी उपस्थित केला आहे.

चौपाटी बंद असल्याने संबंधितांची उपासमार सुरु होती. व्यावसायिकांनी वारंवार मागणी करूनही एवढे दिवस पालिकेने चौपाटी सुरु केली नाही. मग एवढे दिवस व्यावसायिकांचे हप्ते ठरवण्यासाठी वेळ गेला का, किती हप्ता घ्यायचा हे ठरत नव्हते का, अशी चर्चा शहरात दबक्या आवाजात सुरु आहे. त्यामुळे चौपाटी होती त्याच ठिकाणी सुरु करायची होती तर मग ती यापूर्वीच का सुरु केली नाही आत्ताच, तेही कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत असतानाच चौपाटी सुरु करण्याचा निर्णय का घेतला, यामागचे गौडबंगाल काय आहे, असा प्रश्नही मोहिते यांनी उपस्थित केला आहे.

चौपाटी दादांचा आश्रयदाता कोण?
उशिरा का होईना चौपाटी सुरु करण्याचा निर्णय पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला पण, या चौपाटीवरील व्यावसायिकांचे हप्ते गोळा करणाऱ्या चौपाटी दादांचे काय? चौपाटी दादांमुळे राजवाडा चौपाटीवर अनेकदा हाणामाऱ्या झाल्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे या चौपाटी दादांचा आश्रयदाता कोण आहे? व्यावसायिकांना समाधानाने आणि निर्भीडपणे व्यवसाय करण्यासाठी पालिकेने चौपाटी दादांचा बंदोबस्त करण्यासाठी काही उपाययोजना केली आहे का, अशी विचारणाही मोहिते यांनी पत्रकात केली आहे.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

कठोर लॉकडाऊन नको, लसीकरणाला वेग द्या : देवेंद्र फडणवीस

Next Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवा परीक्षेसाठीची आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण – निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे

Next Post

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवा परीक्षेसाठीची आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण - निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,026 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

कोरोना निर्बंध काळात बियाणे, खते, निविष्ठा पुरवठ्याच्या तक्रारींसाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित

April 16, 2021

‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे योजना’ राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या पुढाकाराने सुरू

April 16, 2021

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर केली सातारा शहराची पहाणी

April 16, 2021

गडकरी, फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळेच नागपुरातील स्थिती आटोक्यात – भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक

April 16, 2021

पंढरपूर पोट निवडणुक : नागरिकांना मतदानासाठी प्रवास करण्याबाबत सूचना

April 16, 2021

भारतातील ऍडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम्स

April 16, 2021

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ‘एएनएस कॉमर्सची’ उपाययोजना

April 16, 2021

एक देश एक रेशन कार्ड योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी

April 16, 2021

खावटी अनुदान सर्व गरजू आदिवासी कुटुंबांना द्यावे – आमदार विनोद निकोले

April 16, 2021

साताऱ्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ७८ बेडची नवीन सुविधा उभारणी; पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली जागेची पाहणी

April 16, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.