स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतातील दोन बलाढ्य आदर्श : लोकमान्य टिळक, अण्णा भाऊ साठे – यशेंद्र क्षीरसागर

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
भारतातील दोन बलाढ्य आदर्श : लोकमान्य टिळक, अण्णा भाऊ साठे – यशेंद्र क्षीरसागर
ADVERTISEMENT


दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

महान स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक लोकमान्य  टिळकांना जाऊन आज दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी शंभर  वर्ष झाली. त्यांची आज स्मृतिशताब्दी..!याच दिवशी साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊंचा जन्म झाला.त्यांची आज जन्मशताब्दी. त्यानिमित्त या दोन बलाढ्य सिंहांना शब्द सुमनांजली

स्थैर्य, सातारा, दि. ०१ : महान स्वातंत्र्यसेनानी, तत्त्वज्ञ, राजकारणी, लेखक आणि संपादक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी प्रखर देशप्रेम आणि अफाट बुद्धिमत्ता यांच्या जोरावर भारताच्या इतिहासात अढळ स्थान मिळवले आहे.”स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच”, अशा ध्येयाने पछाडलेल्या लोकमान्यांनी महाराष्ट्रात एक वैचारिक क्रांती घडवून आणली. 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. त्यानंतर तळागाळात विचार पोहोचवावेत म्हणून 1881 मध्ये “केसरी आणि मराठा “या वर्तमानपत्रांची अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुरुवात केली.1884 ला “डेक्कन एज्युकेशन सोसायटी” आणि 1885 मध्ये “फर्ग्युसन महाविद्यालया”ची स्थापना करून शिक्षण क्षेत्रात क्रांती केली. 

स्वराज्य मिळवण्यासाठी “होम रुल लीग” ची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराज, तात्या टोपे आणि महाराणा प्रताप यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. तर स्वतः राष्ट्रपिता महात्मा गांधी लोकमान्यांच्या कार्याने प्रभावित होते.वयाच्या केवळ 26 व्या वर्षी लोकमान्य टिळकांना स्वामी विवेकानंद भेटले. त्यावेळी स्वामीजींचे वय केवळ 19 वर्ष होते. या दोन तरुणांनी प्रचंड विचारमंथन केले. ही घटना 1882 सालातील आहे. त्यांचे विचार जुळले त्यानंतर लोकमान्यांनी “गीतारहस्य” हा सुंदर ग्रंथ लिहिला. त्यामध्ये कर्मयोगाचे महत्त्व भगवद्गीतेच्या आधारे विशद केले. प्रचंड सहनशक्ती, त्याग, कष्ट करण्याची तयारी, ज्वलंत देशप्रेम यांचे प्रतीक म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते. “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने” असे म्हणणाऱ्या तुकोबांच्या ; आणि “जो जे वांछील, तो ते लाहो” अशी प्रार्थना या जगासाठी करणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या या भूमीमध्ये अनेक सुपुत्रांनी समाजाला विचारात्मक आणि कृतीतून दिशा दाखविली. अण्णा भाऊ त्यापैकी एक मानाचे सुवर्णपान आहे. तुकाराम भाऊराव ऊर्फ शिवशाहीर अण्णा भाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.

अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनात्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. यातून समजते की शाळेतील शिक्षणापेक्षा समाजाचे वाचन करणे महत्त्वाचे आहे. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. केवळ दोन दिवस औपचारिक शाळेत शिक्षण घेतलेल्या अण्णाभाउंनी “समाजाच्या शाळेत” मात्र उच्च प्रतीचे आणि संवेदनशील शिक्षण घेतले . ऐन स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात तरुण अण्णाभाऊ यांनी किती अभ्यास केला असेल आणि अपरिमीत त्याग केला असेल; याची कल्पनाच केलेली बरी. प्रचंड कष्ट, दारिद्र्य आणि अपरिमित संकटे यांच्यावर त्यांनी मात केली. त्रास देणाऱ्या समाजाविषयी तक्रार केली नाही. प्रचंड निरीक्षणशक्ती आणि समाजाविषयी तळमळ या गुणांच्या जोरावर त्यांनी पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या. “फकीरा” हे त्यातील एक रत्न होय. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. आत्ताच्या काळात उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुण-तरुणी यांनी अण्णाभाऊंचे साहित्य वाचणे, त्यांचे विचार वाचणे आणि त्यानुसार वाटचाल करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण; त्यांनी अशी वाटचाल केली तरच ते इतर समाजाला दिशा दाखवतील आणि इतर समाज सुद्धा समाजशील आणि संवेदनशील होईल. जयंती पुण्यतिथी ही प्रतीकात्मक असते आदर आणि प्रेम व्यक्त करण्याचा तो एक मार्ग असतो. परंतु; विचारधारा स्वीकारणे आणि त्यानुसार वाटचाल करण्याचा थोडासा का होईना प्रयत्न करणे, हे जागरूक आणि जिवंत नागरिकाचे लक्षण आहे. अन्यथा; महापुरुषांना सोनेरी चौकटीत कोंडून ठेवल्यासारखे होते. असे व्हायचे नसेल; तर अण्णा भाऊंचे विचार, तळमळ आणि वाटचाल यांचा अभ्यास करून आत्ताच्या समाजाने त्यानुसार वर्तन करण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्या शिक्षणाचा वापर सुशिक्षितांनी आपल्या गरीब, दीनदलित बांधवांच्या उद्धारासाठी करायला हवा. अण्णाभाऊ….तुमचे विचार, तुमची तळमळ आणि समाजाविषयी तुमची कळकळ; आम्ही प्रत्येक वाडीत, प्रत्येक शहरात, प्रत्येक वस्तीवर शोधतोय. पेरण्याचा प्रयत्न करतोय. आम्हाला शक्ती द्या. लोकमान्य आणि अण्णा भाऊ; तुमच्या स्मृती हीच आमची खूप मोठी ताकद आहे.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: सातारा
ADVERTISEMENT
Previous Post

लोकशाहीर अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

Next Post

जिल्ह्यातील 201 संशयितांचे अहवाल आले करोना बाधित; 4 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू

Next Post
जिल्ह्यातील 201 संशयितांचे अहवाल आले करोना बाधित; 4 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू

जिल्ह्यातील 201 संशयितांचे अहवाल आले करोना बाधित; 4 बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

अजिंक्य रहाणेचे मुंबईत जोरदार स्वागत

अजिंक्य रहाणेचे मुंबईत जोरदार स्वागत

January 21, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यात घेणार लस; या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त वयस्कर लोकांना दिली जाणार लस

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यात घेणार लस; या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त वयस्कर लोकांना दिली जाणार लस

January 21, 2021
तुरुंगातील कैद्यांना ड्रग्जचा पुरवठा करताना शिपायाला अटक; 28 ग्रॅम ड्रग्ज जप्त

तुरुंगातील कैद्यांना ड्रग्जचा पुरवठा करताना शिपायाला अटक; 28 ग्रॅम ड्रग्ज जप्त

January 21, 2021
मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, पण… : जयंत पाटील

मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, पण… : जयंत पाटील

January 21, 2021
पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे 31 जानेवारी पर्यंत सुधारीत आदेश जारी

साताऱ्यात शनिवारपासून खरेदी व खाद्य जत्रेचे आयोजन

January 21, 2021
‘फ्युचर ऑफ होम्स’ ई-बुकची दुसरी आवृत्ती लॉन्च

‘फ्युचर ऑफ होम्स’ ई-बुकची दुसरी आवृत्ती लॉन्च

January 21, 2021
कोरोनाची लस बनवणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लँटमध्ये भीषण आग

कोरोनाची लस बनवणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लँटमध्ये भीषण आग

January 21, 2021
बोंडारवाडी प्रकल्पासाठीची जागा निश्चिती करून प्रस्ताव शासनाकडे पाठवा  आ. शिवेंद्रसिंहराजे

बोंडारवाडी प्रकल्पासाठीची जागा निश्चिती करून प्रस्ताव शासनाकडे पाठवा आ. शिवेंद्रसिंहराजे

January 21, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

70 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्य

January 21, 2021
कोरोना काळातही शासनाने  लोकाभिमुख काम केलं ; सामान्य जनतेच्या अपेक्ष्यपूर्तीचे एक वर्षे : ना. बाळासाहेब पाटील

कोरोना काळातही शासनाने लोकाभिमुख काम केलं ; सामान्य जनतेच्या अपेक्ष्यपूर्तीचे एक वर्षे : ना. बाळासाहेब पाटील

January 21, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.