स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

उद्या नितीश कुमार सातव्यांदा मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ; उपमुख्यमंत्री बदलण्याची शक्यता

Team Sthairya by Team Sthairya
November 15, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, दि.१५: बिहारमध्ये नवीन
मुख्यमंत्र्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. रविवारी झालेल्या NDA च्या
बैठकीमध्ये नितीश कुमारांची विधीमंडळनेतेपदी निवड करण्यात आली. सोमवारी ते
राजभवनात संध्याकाळी वाजता सातव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. NDA
च्या बैठकीपूर्वी जदयूची बैठक झाली. यामध्ये नितीश कुमारांची विधीमंडळ
नेतेपदी निवड करण्यात आली.

तारकिशोर उपनेता, उपमुख्यमंत्री पदाचे उमेदवार

भाजप
नेते तारकिशोर प्रसाद यांना NDA चा उपनेता निवडण्यात आले आहे, तर रेणु
देवी यांची भाजपच्या विधीमंडळनेते पदी निवड झाली आहे. सामान्यतः NDA चा
उपनेता उपमुख्यमंत्री होतो, पण यावेळेस काही अडचण येण्याची शक्यता आहे.
नितीश कुमार यांना सुशील मोदी यांना उपमुख्यमंत्री बनवायचे आहे, तर भाजप
त्यांना राज्यसभेवर पाठवून केंद्रात मंत्री बनवण्याच्या विचारात आहे.
यामुळेच, उपनेते तारकिशोर यांचे नाव उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सर्वात
पुढे आहे.

काय म्हणाले नितीश ?

राज्यपालांची
भेट घेतल्यानंतर नितीश म्हणाले की, NDA च्या बैठकीत मला नेतेपदी निवडण्यात
आले आहे. राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा सादर केला आहे. उद्या दुपारी
शपथविधी होईल. एनडीएतील घटक पक्षांकडे लक्ष्य असेल.

दरम्यान
NDA ची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये पर्यवेक्षक म्हणून राजनाथ
सिंह, भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस आणि बिहार भाजपा प्रभारी
भूपेंद्र यादव उपस्थित होते. दरम्यान उपमुख्यमंत्र्यांविषयी पेच कायम आहे.
तसेच नितीश कुमारांनी बैठकीनंतर राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेत सरकार
बनवण्याचा दावा केला.

प्रत्येकाचे मत वेगळे

NDA
च्या बैठकीमध्ये भाजप आमदार श्रेयसी सिंह आपल्या आई पुतुल देवींसोबत
पोहोचल्या. पुतुल देवींनी मुलीच्या मंत्री बनवण्याच्या प्रश्नावर म्हटले
की, हा पक्षाचा निर्णय असेल. श्रेयसी प्रतिभेची धनी आहे आणि माझ्यानुसार
तिला संधी मिळायला हवी. भाजप नेता प्रेम कुमार यांनी म्हटले की, माझी
उपमुख्यमंत्री बनण्याची कोणतीही इच्छा नाही, फक्त पंतप्रधानांचे स्वप्न
पूर्ण करायचे आहे

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

घटक पक्षांना भाजप केंद्राची ऑफर देऊ शकते

जेडीयू
केंद्रातील एनडीए सरकारचा एक भाग आहे, परंतु त्यांच्याकडे मंत्रीपद नाहीत.
ही बाब सभेत अडकल्यास भाजप घटक पक्षांना केंद्रात सहभागी करून घेण्याची
ऑफर देण्याची शक्यता आहे. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नितीश यांनी
केंद्रातील मंत्रिपदाची ऑफर नाकारली होती. बिहारमध्ये भाजपाकडे 17 आणि
जेडीयूचे 16 खासदार आहेत. त्यामुळे नितीश किमान तीन केंद्रीय मंत्रीपदाची
मागणी करत होते. 6 खासदार असलेल्या लोजपाने विधानसभा निवडणुकीत दाखविलेल्या
वृत्तीमुळे नितीश नाराज आहेत. यामुळे ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमवेत
एलजेपीसंदर्भात अटी घालू शकतात.

Related


Tags: देश
Previous Post

शेअर बाजारात तेजीचा मुहूर्त; सेन्सेक्स, निफ्टी सर्वकालीन उच्चांकावर बंद

Next Post

प्रियकराने प्रेयसीवर अॅसिड आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळले; आरोपी फरार

Next Post

प्रियकराने प्रेयसीवर अॅसिड आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळले; आरोपी फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात ११ व्या फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद

August 11, 2022

पानीपत’पूर्वीच कॉंग्रेसला आत्मचिंतनाची गरज – हेमंत पाटील

August 11, 2022

नारळी पौर्णिमेच्या उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

August 11, 2022

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन निमित्त शुभेच्छा

August 11, 2022

दुःखद निधन – कै. बाळासाहेब जाधव

August 11, 2022

ऑडी इंडियाकडून नवीन ‘ऑडी क्यू३’ साठी बुकिंग्ज्चा शुभारंभ

August 11, 2022
सदाशिव पाटील

एन आय पी एम च्या चेअरमन पदी सदाशिव पाटील

August 11, 2022

देशाच्या सैनिकांच्या सन्मानार्थ म्युझिकल फ्लॅश मॉबचे आयोजन

August 11, 2022
कै रवींद्र पेंढारकर

दुःखद निधन – कै रवींद्र पेंढारकर

August 11, 2022

पेटीएम ऍपवर ‘लाइव्ह ट्रेन स्टेटस’ सुविधा

August 11, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!