शेतकरी जगला पाहिजे


भारत कृषीप्रधान देश असून शेतकरी गरीब आहे. कर्जबाजारी, अशिक्षितपणा अशा शेतकऱ्यांना नवनविन कायदे करुन सरकारला काय साध्य करावयाचे आहे. आधीच महागाई, हमीभाव नाही, खाती तोंड व शेती तुकडे यांनी मेटाकुटीला आलेल्या शेतक-याला शेत मशागतीच्या वेळी स्वतः बैलाऐवजी जुंपून घ्यावे लागते. निघालेले अल्प (तीनशे-चारशे) किलो शेतमाल विकायला कुठे नेणार. भांडवलाचा अभाव, वहातूक खर्च आवक्याबाहेर यातच अल्पभूधारक शेतकरी भरडला जातोय.

अल्पभूधारक व मोठ्या शेतजमिनीवर शेती करणारा शेतकरी या दोघांना एकच कायदा लागू करता येणार नाही.देशाला स्वातंत्र्य मिळून ७२ वरीस झाली तरी सतरी पार केलेल्या शेतकऱ्यांना कष्ट करावे लागते.याचा ही विचार व्हावा.

शेतकरी क्रांती हीच देश प्रगती

आपलाच बळी (राजा) वंश ​– प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!