स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

..तर मी माझ्या पद्धतीने पोहोचेन; बच्चू कडूंना पोलिसांनी नागपुरातच अडवले

Team Sthairya by Team Sthairya
December 22, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, नागपूर, दि.२२: वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कॉर्पोरेट कार्यालयावर आज अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. त्या मोर्चात सहभागी होण्यासाठी कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू निघाले होते. पण, पोलिसांनी त्यांना नागपुरातच अडवले. 

दरम्यान, अजूनही बच्चू कडू सिंचन विभागाच्या गेस्ट हाउसवर अडकून आहेत. त्यांना नागपूरच्या विमानतळावर जाऊ दिले जात नाहीये. गेस्ट हाउसच्या परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत शेतकऱ्यांच्या विविध संघटना एकत्र येणार आहेत. वांद्रा उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयापासून या मोर्चाची सुरुवात होणार आहे. 

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

बच्चू कडू म्हणाले, सकाळी विमानतळावर जाण्यासाठी बाहेर निघालो असता पोलिसांनी आम्हाला थांबवले आणि आपल्याला येथून जाऊ न देण्याचे आदेश असल्याचे त्यांनी सांगितले. माझे विमान सकाळी ९.११ वाजताचे होते, ते हुकले आहे. या प्रकाराबाबत मी फोनवरून माहिती घेत आहे, की थांबवण्याचे कारण काय? आजचा मोर्चा शांततेनेच होणार आहे, तरीसुद्धा अडवून ठेवण्यामागचे कारण कळले नाही. नेमके कोण अडवत आहे, याचा शोध आम्ही घेत आहोत. मी नाही गेलो तरी आजचे आंदोलन होणारच असल्याचा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे. 

ते पुढे म्हणाले, मोर्चा नक्की निघेल. सर्व जण तेथे पोहोचले आहेत. आमचे कार्यकर्तेदेखील पोहोचले आहेत आणि मीसुद्धा मुंबईला लवकरच पोहोचणार आहे. अजून दोन विमान आहेत. तरीही अडवले तर मी माझ्या पद्धतीने पोहोचेनच, असे स्पष्ट संकेत बच्चू कडू यांनी दिले आहेत. त्यांची पद्धत कोणती हे मात्र त्यांनी सांगितलेलं नाही. पण, त्यांची पद्धत नेहमी वेगळीच राहिली आहे. त्यामुळे ते आता काय करतील, याकडे माध्यमांचे लक्ष लागून राहिले आहे. मोर्चा १२ वाजता निघणार आहे आणि १२ ते १५ हजार शेतकरी मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चात बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, हमाल पंचायतीचे प्रमुख बाबा अढाव आणि सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर सहभागी होणार आहेत. यांपैकी बच्चू कडू नागपुरात अडकून पडले आहेत.

Related


Tags: राज्य
Previous Post

सात नगरसेवक असलेल्या भाजपला एकही सभापतिपद नाही;तीन समित्या बिनविरोध

Next Post

पुण्यात पुन्हा शिरला गवा; बावधन परिसरात उडाली खळबळ

Next Post

पुण्यात पुन्हा शिरला गवा; बावधन परिसरात उडाली खळबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सेवाग्राममधील बापूकुटीला भेट

August 12, 2022

जिल्ह्यात “अमृत सरोवर” मोहिमेचे आयोजन

August 12, 2022

१५ ऑगस्ट रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते

August 12, 2022

हर घर तिरंगा – हमारी शान तिरंगा

August 12, 2022

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दरे ग्रामस्थांना तिरंगा वितरण

August 12, 2022

जन्मभूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 12, 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध विषयातील तज्ज्ञ सल्लागारांना अर्ज करण्याचे आवाहन

August 12, 2022

मायक्रोहोस्ट क्लाउडचा जागतिक कंपन्यांवर प्रभाव

August 12, 2022

‘ऑडी क्यू३’च्या बुकिंगला सुरुवात

August 12, 2022

निरा – देवधर व कृष्णा – भिमा स्थिरीकरणाच्या कामांना गती देणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 12, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!