स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

”शिवसेनेला मतांची चिंता, त्यामुळेच नामांतराचा ‘सामना’, औरंगाबादच्या जनतेला विकास महत्वाचा”- बाळासाहेब थोरात

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 17, 2021
in महाराष्ट्र
ADVERTISEMENT

स्थैर्य, मुंबई, दि.१७: औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजी नगर करण्याच्या हालचाली शिवसेनेकडून सुरू आहेत. यातच, मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन करण्यात आलेल्या ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला होता. याला महाविकास आघाडीमधील काँग्रेसने विरोध दर्शवला होता. यावर आता काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘शिवसेनेला मतांची चिंता असल्यानेच औरंगाबाद नामांतरावरुन त्यांचा ‘सामना’ सुरू आहे’, असा टोला त्यांनी लगावला आहे.

औरंगाबादच्या जनतेला विकास महत्वाचा

बाळासाहेब थोरात आपल्या पोस्टमध्ये म्हतात की, ‘औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात धुरळा उडवला जात आहे. शिळ्या कढीला ऊत आणून काही मंडळी आपला स्वार्थ साधू इच्छित आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर सल्ला देणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. मात्र, मागील 5 वर्षे एकमेकांसोबत सत्तेत असलेले आज नामांतराचे राजकारण करत आहेत. हा ढोंगीपणा नाही तर काय आहे? केंद्रात आणि राज्यात हे दोघेही मांडीला मांडी लावून सत्ता भोगत होते, तेव्हा यांना नामांतराचा मुद्दा का आठवला नाही?’

‘गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादमध्ये सत्तेत असलेल्या या दोघांनीही खरंतर औरंगाबादच्या विकासावर बोलायला हवे. औरंगाबादकरांची तीच अपेक्षा आहे. मात्र महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या या दोघांनीही जनतेचा भ्रमनिरास केला आहे. म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर त्यांना नामांतराच्या मुद्द्याचा आधार घ्यावा लागतो आहे. हे दोन्ही पक्ष नामांतराचा मुद्दा काढून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे फार काळ चालणार नाही. औरंगाबादच्या जनतेलाच आज नामांतरापेक्षा विकास महत्वाचा आहे.’

शिवसेनेला मतांची चिंता

या पोस्टमधून बाळासाहेब थोरातांनी आपला मित्र पक्ष शिवसेनेवरही निशाना साधला. ते म्हणाले, “राज्यात आमचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला आपल्या मतांची चिंता वाटते. त्यामुळेच त्यांनी हा नामांतराचा ‘सामना’ सुरू केला आहे. भाजपच्या बाबतीत बोलायचे झाल्यास ढोंगीपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्यच आहे. त्यामुळे त्यांच्या वागण्या-बोलण्याकडे जनता करमणूक म्हणून बघते. राहिला प्रश्न छत्रपती संभाजी महाराजांवरील श्रद्धेचा! छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्यांनी आम्हाला छत्रपती संभाजी महाराज समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठी आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्यदैवत आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या आदर्शांचा मतांची पोळी भाजण्यासाठी वापर करणार नाही. कोणी तो करत असेल तर त्याला कडाडून विरोध करू,’ असेही बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राचे सरकार अस्थिर होईल या भ्रमात राहू नये

थोरातप पुढे म्हणाले की, ‘महाराष्ट्राचे सरकार यामुळे अस्थिर होईल अशा भ्रमात कोणी राहू नये. आम्ही तिन्ही पक्षांनी अत्यंत विचारपूर्वक महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी सरकार बनवले आहे. हे सरकार बनवताना आम्ही सर्वांनी एकमताने किमान समान कार्यक्रम ठरवला आहे. हा कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, गरीब माणसाच्या हिताचा विचार आहे. भावनेच्या राजकारणाला त्यात थारा नाही. आमचे सरकार स्थिर आहे, खंबीर आहे. त्यामुळे कोणालाही उकळ्या फुटण्याचे कारण नाही,’ अशी स्पष्टोक्तीही थोरातांनी दिली.


ADVERTISEMENT
Previous Post

संशयितांचे 72 अहवाल कोरोनाबाधित 1 बाधिताचा मृत्यु

Next Post

स्टॅच्यू ऑफ यूनिटीपर्यंत पोहोचणे सोपे:मोदींनी 8 नवीन ट्रेन सुरू केल्या

Next Post

स्टॅच्यू ऑफ यूनिटीपर्यंत पोहोचणे सोपे:मोदींनी 8 नवीन ट्रेन सुरू केल्या

ताज्या बातम्या

सुशांत मृत्यू प्रकरणात ड्रग अँगल : 9 महीन्यानंतर NCB ने दाखल केली 12 हजार पानांची चार्जशीट, या प्रकरणात रिया आणि शोविकसह 33 आरोपी

March 5, 2021

शिक्षणमंत्र्यांचा खुलासा : 31 हजार शिक्षकांचे अस्तित्व पणाला, ना वेतन ना दिलासा; संधी देण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी

March 5, 2021

अर्थमंत्री अजित पवारांनी विधीमंडळात सादर केला राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवाल

March 5, 2021

हर्णे बंदराचा कायापालट होणार – बंदरे विकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार

March 5, 2021

ममता बॅनर्जी यांनी जाहीर केली सर्व 291 उमेदवारांची यादी; 52 महिला आणि 42 मुस्लिम उमेदवारांसह नवीन चेहऱ्यांना संधी

March 5, 2021

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली कोव्हॅक्सिन लस

March 5, 2021

नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश

March 5, 2021

फडणवीस सरकारच्या धोरणामुळेच स्वस्त वीज मिळणार – चंद्रशेखर बावनकुळे

March 5, 2021

अनंत अडचणीत पारदर्शी व काटकसरीने सद्गुरू पतसंस्था कार्यरत

March 5, 2021

जागतिक महिला दिनानिमित्त सुझुकी वाहन खरेदीवर ऑफर

March 5, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.