स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बीडच्या राजकारणाला हादरा! जिल्हा बँकेतील सेवा संस्थांचे सर्वच अर्ज बाद

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 23, 2021
in महाराष्ट्र
ADVERTISEMENT

स्थैर्य,बीड,दि २३: बीडच्या राजकारणाला हादरा देणारी एक गोष्ट घडली आहे. याचे निमित्त आहे जिल्हा मध्यवर्ती बँक. सेवा संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्यासाठी संबंधित संस्था ‘अ’ किंवा ‘ब’ वर्गातीलच असायला हवी हा नियम आहे. या नियमामुळे सेवा संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्वचे सर्व ८७ उमेदवारांचे अर्ज बाद झालेत. यामुळे बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मोठा पेच निर्माण झाला आहे. इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज बाद झाले आहेत. ७३५ सेवा संस्थांपैकी अवघ्या १३ संस्थांचे लेखा परिक्षण अ किंवा ब वर्गात असल्याचे सांगण्यात आले.

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागल्यानंतर १९ जागांसाठी तब्बल १६० जणांनी २१४ उमेदवारी अर्ज दाखल केले. या संस्थेच्या सेवा संस्था मतदारसंघातून तब्बल ८७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सर्वच पक्षांच्या अनेक मातब्बरांचा समावेश आहे. आज उमेदवारी अर्ज छाननी सुरू झाली तेव्हा धक्कादायक बाब समोर आली.

सेवा संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी संबंधित उमेदवार हा ज्या संस्थेमध्ये सदस्य आहे, त्या संस्थेचे ऑडीट हे ‘अ’ किंवा ‘ब’ असायला हवे. परंतु जिल्ह्यातील ७३५ सेवा संस्थांपैकी अवघ्या १३ संस्थांचे लेखापरिक्षण हे ‘अ’ किंवा ‘ब’आहे. बाकी सर्व संस्था या ‘क’ वर्गात येतात. त्यामुळे डीसीसी बँक निवडणुकीच्या उपविधी नियमानुसार सेवा संस्था निवडणुकीत दाखल करण्यात आलेले ११ जागांसाठीचे ८७ अर्ज बाद झालेत.

निवडणूक निर्णय अधिकारी रविकिरण देशमुख आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी गोपालसिंह परदेशी यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृहात आज सकाळी ११ वाजल्यापासून छानणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. या दरम्यान अर्ज बाद होऊ नये म्हणून वकिलाच्या माध्यमातून निवडणूक अधिकाऱ्यांसमोर युक्तीवादही झाला. परंतू बँकेच्या उपविधी नियमानुसार अधिकाऱ्यांनी संबंधित ८७ उमेदवारांचे अर्ज बाद केले.

यांचे झाले अर्ज बाद
यामध्ये विजयसिंह पंडित, बाबूराव सिरसट, फुलचंद मुंडे, महेंद्र गर्जे, वसंत सानप, अशोक लोढा, सत्यभामा बांगर, दशरथ वनवे, राजेंद्र मस्के, दाजीसाहेब लोमटे, ऋषिकेश देशमुख, वैजिनाथ मिसाळ, जयदत्त धस, मंगल सानप यांच्यासह अकरा जागांसाठी उमेदवारांनी ८७ अर्ज दाखल केले होते. ते सर्वचे सर्व बाद झाले.


ADVERTISEMENT
Previous Post

मोबाईलवरुन झालेल्या बाचाबाची नंतर चाकूने भोसकून खून

Next Post

पोहरादेवी येथील गर्दीबाबत प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

पोहरादेवी येथील गर्दीबाबत प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

आता 24 तासात कधीही, तुमच्या सोयीनुसार कोरोना लस घ्या! केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा

March 3, 2021

चाैथ्या कसोटीसाठी टीम इंडियाचा कसून सराव, टेस्ट चॅम्पियनशिप फायनलवर नजर

March 3, 2021

‘कनेक्शन तोडून नाही तर हात जोडून महावितरण करणार थकीत वीज बिलाची वसुली

March 3, 2021

सोने स्वस्त : मागणी घटल्याने सात महिन्यांत सोने 10,887 रुपये स्वस्त; 56 हजारांचा टप्पा गाठून 45 हजारांपर्यंत घट

March 3, 2021

कर्नाटकात जॉब फॉर सेक्स स्कँडल : भाजपच्या मंत्र्यांनी CD समोर आल्यानंतर दिला राजीनामा, नोकरी देण्याच्या बहाण्याने लैंगिक शोषणाचा आरोप

March 3, 2021

पुण्यात भीषण आग : बिबेवाडी परिसरात भंगाराच्या गोदामाला भीषण आग, संपूर्ण परिसरात धूर

March 3, 2021

हिंगोली : शासकीय रुग्णालयातील वार्डमधील छताचा भाग कोसळला, सुदैवाने कोणीही जखमी नाही

March 3, 2021

लग्न समांरभासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केले सुधारीत आदेश जारी

March 3, 2021

भारतीय निर्देशांक काही टक्क्यांनी वधारला

March 3, 2021

फलटण तालुक्यातील १८ तर सातारा जिल्ह्यातील १३१ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यु

March 3, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.