• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नोकर भरतीत घोटाळा

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 18, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, सातारा, दि.१८: रयत शिक्षण संस्थेत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नोकर भरतीत घोटाळा झाला आहे. याबाबत तक्रारी झाल्यानंतर संस्थेचे माजी सचिव भाऊसाहेब कराळे आणि अरविंद बुरुंगले यांचे राजीनामे संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आले. 

रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरीसाठी पैसे घेतले जातात अशा तक्रारी यापूर्वीही अनेकदा झाल्या आहेत. मात्र, या संस्थेचे पदाधिकारी कोणाकडूनही पैसे घेत नाहीत असा दावा संस्थेकडून केला जात होता. त्यांचा हा दावा किती खोटा होता हे आता समोर आले आहे. रयत मध्ये देखील नोकरीसाठी पैसे घेतले जातात अशी तक्रार काही सदस्यांनी केली होती. अनेक संस्थांच्या प्राचार्यांकडेही याबाबत तक्रारी आल्या होत्या, पैसे दिले नाहीत म्हणून अनेकांना पंधरा पंधरा वर्ष नोकरीत कायम करण्यात आले नव्हते. मात्र, ज्यांनी पैसे दिले त्यांच्या ताबडतोब ऑर्डर काढण्यात आल्या. त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अनेक जणांना केवळ तासिका तत्त्वावर काम करावे लागत होते. संस्थेमध्ये सचिव पदावर काम केलेले भाऊसाहेब कराळे आणि अरविंद बुरुंगले यांच्याबाबतही तक्रारी झाल्या होत्या याबाबतची चौकशी केल्यानंतर ते दोषी आढळले. त्यामुळे या दोघांकडूनही राजीनामे घेण्यात आले आहेत. 

राज्यपाल कोश्यारी यांच्याकडेही नोकर भरतीसाठी पैसे घेतले जातात अशा प्रकारच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारीची गंभीर दखल घेत याबाबत गृहविभागाने लक्ष घालावे असे आदेश देण्यात आले होते. मात्र, सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने आणि या संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार असल्यामुळे दोन माजी सचिवांचे राजीनामे घेऊन हे प्रकरण याच ठिकाणी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, अशा प्रकारे किती जणांची फसवणूक झाली, किती जणांना नोकऱ्या मिळाल्या. किती जणांना नोकरी वाचून वंचित राहावे लागले हा प्रश्नही अनुत्तरितच राहिलेला आहे. याबाबत संस्थेचे चेअरमन अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी  बोलण्यास नकार दिला.


Tags: सातारा
Previous Post

शाहुपुरीसह नवी मुंबईतील 3 जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस शाहुपुरी डी.बी. पथकाची कामगिरी 

Next Post

वीर जवान अमित पाटील अनंतात विलीन; वाकडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, आमदारांनी घेतली मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी

Next Post

वीर जवान अमित पाटील अनंतात विलीन; वाकडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, आमदारांनी घेतली मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदी महागले, सोन्याचे दर ६० हजारांच्या पार, तपासा आजचे दर

मार्च 31, 2023

मोदींची डिग्री दाखण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केला रद्द, केजरीवालांवर ठोठावला २५ हजाराचा दंड

मार्च 31, 2023

राहुल गांधींनी मनाचा मोठेपणा दाखवावा अन् OBC समाजाची माफी मागावी – कपिल पाटील

मार्च 31, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना घाबरतात; त्यामुळेच अशी कारवाई – प्रणिती शिंदेंचा आरोप

मार्च 31, 2023

महाराष्ट्र अस्थिर व्हावा ही सरकारची इच्छा; संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं

मार्च 31, 2023

देशात पेट्रोल-डिझेल बंद होणार?; जल, वायू अन् ध्वनी प्रदूषणावर नितीन गडकरींचं भाष्य

मार्च 31, 2023

श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

मार्च 31, 2023

पौष्टिक तृणधान्य… काळाची गरज

मार्च 31, 2023

बौध्दजन पंचायत समिती मीरा भाईंदर गट क्रं.३३ चे मार्गदर्शन शिबिर संपन्न

मार्च 31, 2023

ना. डॉ. नीलमताई गोर्‍हे यांची कै. लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

मार्च 31, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!