
दैनिक स्थैर्य । 22 एप्रिल 2025। फलटण । विडणी ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सागर कांतीलाल अभंग यांची राष्ट्रीय सरपंच संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
राष्ट्रीय सरपंच संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंदनसिंह ठाकूर यांनी या नियुक्तीबाबतचे पत्र दिले.
सागर अभंय यांनी राज्यातील सरपंचांना संघटन करून त्यांच्या अडचणी निरसन कराव्यात.
या निवडीबद्दल ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील व विडणी ग्रामस्थांनी सागर अभंय यांचे अभिनंदन केले.