• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

साडेचार वर्षीय रिदमने 3 तास 38 मिनिटांत 5 हजार 400 फूट उंचीच्या ‘कळसुबाई’वर उंचावला तिरंगा

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 5, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, दि.५: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाैर्यगाथा कानावर पडत गेल्या आणि सातत्याने
प्रेरणा मिळत गेली. याच स्फूर्तिदायी कथेवरून साडेचार वर्षीय रिदम गजानन
टाकळेने (रा. ग्रामसेवक काॅलनी, नगर राेड, बीड)पाच हजार ४०० फूट उंचीचे
कळसुबाई शिखर गाठण्याचा पराक्रम केला. त्याने हे अंतर तीन तास ३८ मिनिटांत
सर करून शिखरावर तिरंगा उंचावला. बीड जिल्ह्यातील साडेचार वर्षीय
चिमुकल्याने प्रचंड ऊर्जेतून सर केलेले शिखर यशस्वीपणे त्याच उत्साहातून
परतीचा प्रवासही पूर्ण करत शारीरिक क्षमतेचा परिचय करून दिला. बालवाडीत
शिक्षण घेत असलेल्या रिदमने शिखरावर पाेहाेचताच तिरंगा झेंडा फडकवला.

नगर
जिल्ह्यातील कळसुबाई शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. त्यामुळे
गिर्यारोहकांच्या दृष्टीने कळसुबाई शिखराला एक वेगळे महत्त्व आहे.
चिमुकल्या रिदमने २९ नाेव्हेंबर २०२० राेजी सकाळी ७.५५ वाजता कळसुबाई
शिखरावर चढण्यास सुरुवात केली. नंतर न थांबता त्याने सकाळी ११.३३ वाजता
शिखर गाठले.

साडेतीनव्या वर्षांपासून माेहिमेवर

चिमुकल्या
रिदमला वडील गजानन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शाैर्याविषयीचा इतिहास
सांगत असतात. साेशल माध्यमातून किल्ल्यांची माहिती, कसे सर करायचे व
त्यांचे कार्य अशी माहिती ते देत असतात. यातूनच रिदमला िकल्ल्यांविषयीची
आवड निर्माण झाली असून ताे किल्ले, गड, डाेंगर चढण्यासाठी उत्सुक असताे.
यापूर्वीही त्याने ३ वर्षे सात महिन्यांचा असताना रायगड, राजगड, लाेहगड व
सुधागड हे किल्ले सर केलेले असल्याचे वडील गजानन टाकळे यांनी ‘दिव्य
मराठी’शी बाेलताना सांगितले.

२५ डिसेंबरला सर करणार हरिश्चंद्र गड

रिदम
टाकळे हा येत्या २५ डिसेंबरला हरिश्चंद्र गड (ता. अकाेले, जि. नगर) सर
करणार आहे. रिदम टाकळेने कळसुबाई शिखर सर केलेल्या या विक्रमाची नाेंद
इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये व्हावी, अशी अपेक्षा वडील गजानन टाकळे यांनी
व्यक्त केली आहे.


Tags: राज्यस्पोर्ट्स
Previous Post

लस घेऊनही झाला कोरोना :​​​​​​​ व्हॅक्सीन ट्रायलच्या 14 दिवसांनंतर हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल विज कोरोना पॉझिटीव्ह

Next Post

विमान प्रवास चिंताजनक; ७ दिवसांत आढळले २१ कोरोनाबाधित प्रवासी

Next Post

विमान प्रवास चिंताजनक; ७ दिवसांत आढळले २१ कोरोनाबाधित प्रवासी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्थानक योजनेत फलटणचा समावेश : रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव; खासदार रणजितसिंह यांच्या प्रयत्नांना यश

मार्च 29, 2023

ग्रामदैवत फलटण, पुरातन श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहण हे फलटणच्या परंपरेला साजेसे काम : आ.श्रीमंत रामराजे

मार्च 29, 2023

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी ‘आयएफसी’ सोबतचा भागिदारी करार उपयुक्त ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे प्रतिपादन

मार्च 29, 2023

प्रवचने – पैशाच्या आसक्तित राहू नये

मार्च 29, 2023

कमी पाण्यात जास्तीच्या उत्पन्नाची हमी देणारी ‘प्रति थेंब अधिक पीक योजना’

मार्च 29, 2023

ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मार्च 29, 2023

कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे संजय कोळी यांचे दीर्घ आजाराने निधन

मार्च 29, 2023

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात सातारा जिल्हा राज्यात अव्वल

मार्च 29, 2023

वझीरएक्सने पारदर्शकता अहवालाची चौथी आवृत्ती सादर केली

मार्च 29, 2023

मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्पाचे काम आठ दिवसात मार्गी लावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

मार्च 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!