स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

सकाळी सकाळी सुरक्षा ताफ्याशिवाय PM मोदींची दिल्लीच्या गुरुद्वाऱ्याला भेट

Team Sthairya by Team Sthairya
December 20, 2020
in Uncategorized

 

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.२०: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी सकाळी दिल्लीमधील रकब गंज साहिब या गुरुद्वारामध्ये गुरु तेग बहादुर यांचे दर्शन घेण्यासाठी अचानकच पोहोचले होते. हा दौरा अनियजित तर होताच शिवाय कसल्याही सुरक्षा ताफ्याशिवाय ते याठिकाणी पोहोचले होते. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांनी तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन पुकारले आहे. गेल्या 24 दिवसांपासून कसलाही खंड न पडता शांततेने हे आंदोलन केले जात आहे. ऐन थंडीत बायका-मुलांसह या आंदोलक शेतकऱ्यांचा निश्चय अजिबात ढळलेला नाहीये. या पार्श्वभुमीवर नरेंद्र मोदींनी गुरुद्वाऱ्याला ही भेट दिली जात असल्याचं बोललं जात आहे.

शेतकरी आणि सरकार यांच्यात दिल्लीच्या विज्ञान भवनात केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्यासह चर्चेच्या पाच बैठका झाल्या आहेत. मात्र, अद्याप या चर्चेमधून कसलाही तोडगा निघाला नाहीये. शेतकऱ्यांनी चर्चेसाठी तयार रहावं, आम्ही कायद्यात बदल करण्यास तयार असल्याची सरकारची भुमिका आहे तर हे कायदे रद्दच करा, अशी शेतकऱ्यांची भुमिका ठाम आहे. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या काही दिवसांतील आपल्या कार्यक्रमांमधून हे कृषी कायदे शेतकऱ्यांच्याच फायद्याचे असल्याचे नमूद केले होते. तसेच या कायद्यांबाबत गैरसमज पसरवून विरोधकांची दिशाभूल केली जात असल्याचं मोदींनी म्हटलं होतं.

काल शनिवारी गुरु तेग बहादुर यांच्या शहिद दिवसानिमित्त मोदींनी ट्विट करुन त्यांना आदरांजलीही वाहिली होती. त्यांनी म्हटलं होतं की, श्री गुरु तेज बहादुर जी यांचं आयुष्य म्हणजे धैर्य आणि करुणेचे प्रतीक आहे. त्यांच्या शहीदी दिवसानिमित्त, मी महान श्रीगुरु तेज बहादुरजी यांना नमन करतो आणि न्यायी आणि सर्वसमावेशक समाजासाठी त्यांची दृष्टी आठवते. गुरु तेगबहादुर हे शिखांच्या दहा गुरुंपैकी नववे गुरु होते. त्यांचा जन्म अमृतसरमध्ये 1621 रोजी झाला. त्यांची पुण्यतिथी ही शहिद दिवस म्हणून साजरी केली जाते.

Related


Tags: देश
Previous Post

मुंबईतील सातारकरांसाठी ‘शिवशाही’ची संख्या वाढविली : रेश्‍मा गाडेकर

Next Post

दिल्ली सीमेवरील शेतकरी आज शहीद दिन साजरा करतील, आंदोलनात प्राण गमावलेल्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम होतील

Next Post

दिल्ली सीमेवरील शेतकरी आज शहीद दिन साजरा करतील, आंदोलनात प्राण गमावलेल्यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम होतील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“हर घर तिरंगा” या अभियानासाठी फलटणमध्ये श्रीमंत संजीवराजे मोफत ध्वज देणार

August 11, 2022

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून

August 11, 2022

आशियातील सर्वात मोठ्या टाटा मुंबई मॅरेथॉनला गौरवशाली परंपरा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 11, 2022

देश स्वतंत्र करण्यासाठी तरुणांनी रक्ताचे अर्ध्य दिले

August 11, 2022

रासायनिक निविष्ठांचा वापर हा शेवटचा पर्याय असावा- शास्त्रज्ञ डॉ. इंडी

August 11, 2022

शहीद हसेन – हुसेन यांच्या ताबुताला आटपाडीच्या नाथांनी दिला खांदा !

August 11, 2022

सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिबी अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम प्रभात फेरी द्वारे संपन्न

August 11, 2022

आज काँग्रेसची आझादी गौरव यात्रा; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती

August 11, 2022

मुधोजी महाविद्यालयात M.Com. व M.Sc चे वर्ग सुरू

August 11, 2022
कटफळ गावातून रॅली काढताना झेनिबियाचे विद्यार्थी

झैनबिया स्कूलच्या वतीने घर घर तिरंगा रॅली

August 11, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!