स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सातारच्या प्रतिसरकार स्मारक उभारण्यात लोकप्रतिनिधी, प्रशासनाची उदासीनता

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
सातारच्या प्रतिसरकार स्मारक उभारण्यात लोकप्रतिनिधी, प्रशासनाची उदासीनता
ADVERTISEMENT

दैदिप्यमान इतिहासाकडे दुर्लक्ष

स्थैर्य, सातारा, दि. ०९ (विजय मांडके) : देशातील मिदनापुर , बलिया व पुर्वीचा सातारा या तीन जिल्ह्यात इंग्रजांच्या नाकावर टिच्चून स्वातंत्र्यसैनिकांनी प्रतिसरकार स्थापन केले होते. स्मृतीशेष पंतप्रधान नरसिंह राव यांनी जाहीर केलेली सरकारकडे मिदनापूर , बलिया याठिकाणी सुसज्ज पध्दतीने उभी राहिली. मात्र सातारा येथील स्मारक उभे करण्याबाबत महाराष्ट्र शासन , जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी हे उदासीन असल्याचे दिसून येत आहे. काही स्वातंत्र्य सैनिकांच्या पुढाकाराने पाठपुरावा झाल्याने एक स्तंभ उभारण्यात आला आहे. बाकी उदासीनताच दिसत आहे. अयोध्येत राममंदिर बांधकाम सुरू मात्र प्रतिसरकार सन्मानार्थ सातारला स्मारक उभारणीबाबत मात्र सगळीकडे उदासीनता.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

इंग्रज सरकारला देशाबाहेर घालवून देण्यासाठी अनेक ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपले रक्त सांडले. कारावास भोगला. देशातील मिदनापूर , बलीया आणि सातारा या तीन जिल्ह्यांत प्रतिसरकार स्थापन करण्यात आले होते. या तीन जिल्ह्यांत तत्कालीन पंतप्रधान स्मृतीशेष नरसिंह राव यांनी प्रतिसरकार मधील सैनिकांच्या समानार्थ भव्य स्मारक उभारण्याची घोषणा केली आणि त्यासाठी काही रक्कमही जाहीर केली. मिदनापूर आणि बालिया या जिल्ह्याच्या ठिकाणी अशा प्रकारची भव्य स्मारके उभी राहिली. मात्र अद्यापही सातारा जिल्ह्यातील अशा प्रकारचे स्मारक उभे राहू शकले नाही ही खेदाची नव्हे तर संतापजनक बाब आहे . सातारा शहरात नवीन प्रशासकीय इमारतीच्या शेजारी प्रतिसरकारच्या चळवळीचे स्मारक सध्या महत्प्रयासाने उभे करण्याचा काही मंडळी प्रयत्न करीत आहेत परंतु जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर त्यांना म्हणावा असा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही असेच म्हणावे लागेल.

पुर्वीच्या सातारा जिल्ह्याला स्वातंत्र्य चळवळीचा दैदिप्यमान असा इतिहास आहे. (आताचा सातारा व सांगली जिल्हा). परंतु तो इतिहास पुसून टाकण्याचे काम काही प्रवृत्ती जाणीवपूर्वक करीत आहेत. विशेष म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकार चळवळ सातारा जिल्ह्यात झाली होती. हे प्रतिसरकार बालिया व मिदनापूर येथील प्रतिसरकारच्या तुलनेत अधिक काळ चालले होते. स्वातंत्र्य दिल्याचे घोषित केले तरीही प्रतिसरकार काही गावातून सुरू होते अशी स्थिती असलेल्या सातारा जिल्ह्यात जिल्ह्याच्या ठिकाणी हे स्मारक उभे राहिले जात नाही हे वास्तव आहे .

तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी १९९१ साली मिदनापूर , बलिया व सातारा जिल्ह्यात अशा प्रकारची स्मारके व त्यासाठी काही कोटी निधी मंजूर केला. मिदनापूर व बलिया या ठिकाणी अशा प्रकारची भव्य स्मारके उभी राहिली. सातारा येथे तत्कालीन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील व त्यानंतर स्मृतीशेष अभयसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली या स्मारकासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठका झाल्या होत्या. मात्र त्यानंतर पुढे काहीच हालचाल झाली नाही

अशा प्रकारचे स्मारक व्हावे यासाठी खटाव तालुक्यातील जाखणगाव येथील स्वातंत्र्यसैनिक खाशाबा शिंदे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. त्याच वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सरचिटणीस प्रभाकर महाबळेश्वरकर यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी हे त्यादरम्यानच सातारा येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनीही या आंदोलनस्थळी भेट दिली. खाशाबा शिंदे यांना त्यावेळी स्वातंत्र्यसैनिकांची बैठक घेऊन आपण पुढील आंदोलनाची दिशा ठरवू असे सांगून उपोषण स्थगित करण्यात आले. त्यानंतर क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पुढाकाराने सातारच्या शासकीय विश्रामधाम येथे जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांची एक व्यापक बैठक झाली. त्यात या संदर्भात आंदोलन करण्याचे निश्चित झाले त्यामुळे पुन्हा एकदा या स्मारकाच्या उभारणीसाठी लोकांकडून व स्वातंत्र्य सैनिकांकडून गती मिळाली. त्याच दरम्यान या स्मारकासाठी जागा सरकारने उपलब्ध करून दिली होती त्यात त्यावेळी काही बदल होऊन आता फक्त अडीच एकर जागा या स्मारकासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे व तशी नोंदही करण्यात आलेली आहे. बलीया व मिदनापूर येथील स्मारके दहा एकर जागेत सुसज्ज पध्दतीने उभी राहिली आहेत.

सातारचे हे प्रतिसरकार चे स्मारक व्हावे यासाठी स्वातंत्र्य सेनानी व प्रतिसरकार मधील एका गटाचे प्रमुख सोपानराव घोरपडे यांच्या पुढाकाराने सध्या स्वातंत्र्यसैनिक पतंगराव फाळके सामाजिक कार्यकर्ते अस्लम तडसरकर , विजय निकम , शिवाजी राऊत ही मंडळी विशेष प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे या मंडळींनी सातारचे माजी जिल्हाधिकारी सुबराव पाटील, डॉ. एन. रामास्वामी यांच्याबरोबर अनेक बैठका घेऊन पाठपुरावा करून हा प्रश्न जरा पुढे सरकवला. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाण यांनीही या प्रश्नात लक्ष लागले होते. त्यावेळी पंजाबराव चव्हाण यांच्या पुढाकाराने हे कार्यकर्ते दिल्लीला गेले होते.

डॉ. एन. रामास्वामी यांनी मात्र पुढाकार घेऊन काही रक्कम या स्मारकासाठी स्वतःच्या अखत्यारित मंजूर केली आणि येथे शिल्प उभे केले. ज्या पद्धतीने मिदनापूर व बालिया येथे तिथल्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन ही स्मारके उभी केली त्या तुलनेत सातारा येथील लोकप्रतिनिधी मात्र याबाबतीत नेहमीच उदासीन राहिले आहेत हे नक्की आणि त्यांच्या उदासीनतेमुळे हे स्मारक उभे राहत नाही हे वास्तव आहे. आताचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे सुध्दा बैठक घेणार असल्याचे समजते. बघुया कधी घेतात ते बैठक.

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील प्रतिसरकारची चळवळही ही जाळपोळ किंवा घातपात करणारी अशी चळवळ नव्हती तर ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकण्यासाठी त्यांनी कष्ट घेतलेच शिवाय न्यायदान मंडळ , पंचायत स्थापन करून त्यांनी शेतकऱ्यांना ,स्त्रीयांना , गावकऱ्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीने काम केले. जो कोणी सावकार गरिबाला नडेल त्याला या न्यायदान मंडळात त्याची सुनावणी होऊन त्याला शिक्षा दिली जात असे. प्रतिसरकारचा दैदिप्यमान इतिहास नव्या पिढीपुढे मांडणे गरजेचे असताना या शहिदांची व हुतात्म्यांची आठवण जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधींनी न ठेवता चालवलेली उदासीनता याला काय म्हणावे?

सातारा येथील या प्रतिसरकारच्या चळवळीच्या स्मारकाच्या जाग्यावर सध्या शिल्प उभे करण्यात आले आहे व सातारा जिल्ह्यात प्रतिसरकार नेमके कोणत्या भागात होते त्याचा नकाशा हि त्या शिल्पावरील कोनशिलेवर काढण्यात आलेला आहे. मात्र सध्याची त्या स्मारकाच्या जागेची अवस्था बघितली तर गवताचे साम्राज्य येथे उभे राहिलेले आहे व या स्मारकाची दुर्दशा मात्र तेथे दिसून येत आहे जिल्हा प्रशासन व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी याकडे कधी लक्ष देणार . तिकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन करून राम मंदिर उभारणी सुद्धा सुरू झाली आहे मात्र देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी हौतात्म्य पत्करले , रक्त सांडले , कारावास भोगला त्यांच्या चळवळीच्या स्मारकासाठी मात्र जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी उदासीन आहेत याला काय म्हणावे ? प्रतिसरकारच्या चळवळीचा दैदिप्यमान इतिहास आपण जपणार आहोत की नाही हीच शंका येऊ लागली आहे. छत्रपती शिवाजी राजांच्या मुलखात प्रतिसरकारच्या स्मारकाबाबत एवढे दुर्लक्ष का होते हे कळत नाही. प्रतिसरकारचा इतिहास नव्या पिढीपुढे जाऊ नये असे वाटत आहे का?

विजय मांडके, सातारा. ९८२२६५३५५८


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: सातारा
ADVERTISEMENT
Previous Post

राजेश टोपेजी ! सातार्‍यात तुमचं स्वागत…

Next Post

जिल्ह्यातील 261 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 3 बाधितांचा मृत्यु

Next Post
जिल्ह्यातील 261 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 3  बाधितांचा मृत्यु

जिल्ह्यातील 261 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 3 बाधितांचा मृत्यु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

विडणीत लागलेल्या आगीत 6 एकर ऊस जळून खाक; सुमारे 9 लाखांचे नुकसान

विडणीत लागलेल्या आगीत 6 एकर ऊस जळून खाक; सुमारे 9 लाखांचे नुकसान

January 16, 2021
फलटण येथे ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते ‘कोवीड 19 लसीकरणा’चा आज शुभारंभ

फलटण येथे ना.श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते ‘कोवीड 19 लसीकरणा’चा आज शुभारंभ

January 16, 2021
फलटण तालुक्यात 81.74 % मतदान; सोमवारी मतमोजणी

फलटण तालुक्यात 81.74 % मतदान; सोमवारी मतमोजणी

January 16, 2021
सरदार बर्गे मंडळींच्यावतीने 18 मार्च रोजी साजरा होणार ‘खंडेराव शार्य दिन’ : दिनेशआप्पा बर्गेश्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठान व बर्गे मंडळींच्यावतीने ‘पानिपत स्मृती दिन’ साजरा

सरदार बर्गे मंडळींच्यावतीने 18 मार्च रोजी साजरा होणार ‘खंडेराव शार्य दिन’ : दिनेशआप्पा बर्गेश्रीमंत हरजीराजे बर्गे प्रतिष्ठान व बर्गे मंडळींच्यावतीने ‘पानिपत स्मृती दिन’ साजरा

January 16, 2021
‘हत्ती गेला आणि शेपूट उरले’‘लस’ जरी आली; तरी ‘ढिलाई’ कशासाठी?

‘हत्ती गेला आणि शेपूट उरले’‘लस’ जरी आली; तरी ‘ढिलाई’ कशासाठी?

January 16, 2021
राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा येत्या 27 जानेवारीपासून सुरु, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा येत्या 27 जानेवारीपासून सुरु, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

January 15, 2021
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरासरी 79 टक्के मतदान; राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची माहिती

ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरासरी 79 टक्के मतदान; राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची माहिती

January 15, 2021
पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे 31 जानेवारी पर्यंत सुधारीत आदेश जारी

सातारच्या मेडीकल कॉलेजला मिळाले मूर्त स्वरूप ; ४९५ कोटी रुपये मंजूर

January 15, 2021
चोराडे येथे झालेल्या अपघातात शंकर महादेव पवार यांचा मूत्यू

चोराडे येथे झालेल्या अपघातात शंकर महादेव पवार यांचा मूत्यू

January 15, 2021
पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य द्या महाबळेश्वरमधील मुख्य बाजारपेठ, वेण्णा लेक परिसराचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी लगेच कार्यवाही करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पर्यावरणपूरक विकासाला प्राधान्य द्या महाबळेश्वरमधील मुख्य बाजारपेठ, वेण्णा लेक परिसराचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी लगेच कार्यवाही करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

January 15, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.