स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पवारांचे केंद्रावर टीकास्त्र:’अजूनही वेळ गेलेली नाही, केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 26, 2021
in देश विदेश
ADVERTISEMENT

स्थैर्य , मुंबई , दि .२६: कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हिंसक वळण लागले. आज शेकडो शेतकऱ्यांनी दिल्लीतील लाल किल्याचा ताबा मिळवत खालसा पंथाचे झेंडे फडकावले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी यावर भाष्य केले आहे. ‘नवी दिल्लीत जे घडले, त्याला समर्थन नाही. पण, ते का घडले? शांततेने आंदोलन करणारा शेतकरी संतप्त का होतो ? केंद्र सरकारने अजूनही शहाणपणा दाखवावा’, असे पवार म्हणाले.

शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, ‘अजून वेळ गेलेली नाही. केंद्र सरकारने शहाणपणा दाखवावा. टोकाची भूमिका घेऊ नये.बळाचा वापर करून निर्णय घेणे योग्य नाही. तशी मानसिकताही ठेवू नका’, असे शरद पवार म्हणाले. तसेच, ‘मी यापूर्वीही शेतकऱ्यांचे मोर्चे पाहिले आहेत. अगदी मोर्च्यांवर गोळीबार झालेलाही पाहिला आहे. पण फक्त शेतकरी वर्गालाच टार्गेट करण्याचा प्रकार पहिल्यांदाच झाला आहे. शेतकऱ्यांना खलिस्तानी ठरवणे, त्यांना पाकिस्तानी संबोधणे, त्यांच्या झेंड्यावरून वक्तव्य करणे, हा आततायीपणा आहे. देशाच्या प्रमुखाने शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी होती’, असेही ते म्हणाले

‘केंद्राने टोकाची भूमिका घेऊ नये’

पवार पुढे म्हणाले की, ‘गेल्या 60 दिवसांपासून पंजाब-हरयाणाचे शेतकरी आंदोलन करत आहेत. कडाक्याच्या थंडीत बसून त्यांचे म्हणणे मांडत आहेत. शेतकऱ्यांनी 60 दिवस संयम दाखवला ही अभूतपूर्व गोष्ट आहे. इतक्या संयमाने भूमिका गेणारे शेतकरी असताना केंद्राने सकारात्मक पुढाकार घेऊन मार्ग काढायला हवा होता. शेतकऱ्यांच्या रॅलीसाठी येण्या-जाण्यासाठी परवानगी द्यायला हवी होती. त्यांचे मार्ग आखून द्यायला हवे होते. 25 हजार ट्रॅक्टर रस्त्यावर उतरल्यावर काय परिस्थिती होईल याचा अंदाज त्यांना यायला हवा होता. पण पोलिसांनी जाचक अटी लादल्याने प्रतिकार झाला. वातावरण चिघळले’, असंही ते म्हणाले.

‘शेतकऱ्यांशी चर्चा करायला हवी होती’

पवार पुढे म्हणाले की, ‘कृषी विधेयक कायद्यासंबंधी 2013 पासून चर्चा सुरू होती. माझ्याकडे जबाबदारी असतानाही कायदा झाला होता. सर्व राज्यांचे कृषी मंत्र्यांना विश्वासात घेऊन पणन कायद्यांवर चर्चा करण्याचे ठरले होते. पण नंतर निवडणुका आल्याने तो विषय मागे राहिला. मोदी सरकारने तीन कायदे संसदेसमोर आणले. या कायद्यावर सविस्तर चर्चा व्हावी, चर्चेला मर्यादा असेल तर सिलेक्ट कमिटीकडे पाठवून सविस्तर चर्चा करून निर्णय घ्यावा ही आमची मागणी होती. सिलेक्ट कमिटीत सत्ताधाऱ्यांचे वर्चस्व असते. पण या कमिटीत लोक पक्ष म्हणून विचार करत नाहीत, तर तज्ज्ञ म्हणून निर्णय घेतात. सिलेक्ट कमिटीत चर्चा झाल्यानंतर हे विधेयक संसदेत आले असते तर विरोध झाला नसता. पण संसदेत गोंधळात विधेयक मंजूर केले. तेव्हाच काही तरी गडबड होईल, असे वाटले होते,’ असेही शरद पवारांनी म्हटले.


ADVERTISEMENT
Previous Post

पांडू’ या सिनेमाच्या घोषणेमुळे मराठी सिनेसृष्टीला मिळालं नवं चैतन्य

Next Post

‘कठीण प्रसंगात तुम्ही साथ दिल्याबद्दल मी तुमचे शब्दात आभार मानू शकत नाही’- धनंजय मुंडे

Next Post

'कठीण प्रसंगात तुम्ही साथ दिल्याबद्दल मी तुमचे शब्दात आभार मानू शकत नाही'- धनंजय मुंडे

ताज्या बातम्या

शेंद्रे ता. येथे मधुमक्षिका पालन शिबीराचे उदघाटन करताना श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले. शेजारी डी. आर. पाटील, निसार तांबोळी, श्रीमती हेमलता फडतरे व मान्यवर

मधुमक्षिका पालन हा फायदेशीर शेतीपूरक व्यवसाय – सौ. वेदांतिकाराजे

March 2, 2021

एमजी मोटरद्वारे सर्वाधिक उत्पादन, बुकिंग आणि विक्रीची नोंद

March 2, 2021

वेधिक अ‍ॅकॅडमीमधून उत्तमोत्तम प्रशासकीय अधिकारी घडावेत : आ.दीपक चव्हाण

March 2, 2021

अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ साजरा

March 2, 2021

राष्ट्रीय जंतनाशक मोहीमे अंतर्गत गोखळी येथे जंतनाशक गोळ्यांचे वाटप

March 2, 2021

अर्थसंकल्पात लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांची घोषणा केलेली असूनदेखील मोदी सरकार सामान्य लोकांकडून पैसे का घेत आहे? – श्री पृथ्वीराज चव्हाण  

March 2, 2021

ज्येष्ठ नागरिक आणि दुर्धर आजार असणाऱ्यांना कोविड लस देणे सातारा जिल्ह्यात सुरु; लस सुरक्षित, लस घेण्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आवाहन

March 2, 2021

फलटण तालुक्यातील ११ तर जिल्ह्यातील ९८ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; एका बाधिताचा मृत्यु

March 2, 2021

12 आमदारांच्या नियुक्तीशिवाय वैधानिक विकास महामंडळे नाही, मंत्रिमंडळाने निर्णय घेतल्याचा अजित पवारांचा गाैप्यस्फोट

March 2, 2021

चतुर्थी’ या तिथीचे महत्त्व अन् गणेश पूजन आणि उपासना  यांसाठी निरनिराळ्या अवतारांतील त्याची नावे आणि कार्य !

March 2, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.