स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

केवळ सकारात्मक विचारच, कोरोनाला हरवतील – यशेंद्र क्षीरसागर

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
केवळ सकारात्मक विचारच, कोरोनाला हरवतील – यशेंद्र क्षीरसागर
ADVERTISEMENT


 

स्थैर्य, सातारा, दि. १८ : ऑगस्ट 2020 चा शेवट होत असतानाच खूप चांगली परिस्थिती आहे .रुग्ण जरी वाढत असले तरीही, बरे होण्याची टक्केवारी वाढत आहे. संपूर्ण भारतामध्ये 19 लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. खुद्द सातारा जिल्ह्यात जवळपास 4 हजार 200 पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत, तर महाराष्ट्रामध्ये हा टप्पा चार लाखापेक्षा अधिक आहे. 

भारतामध्ये बरे होण्याचा दर 73 टक्‍क्‍यांवर पोचला आहे. तर महाराष्ट्रामध्ये हाच दर 70 टक्केहून अधिक झाला आहे. प्रशासकीय पातळीवर आपण कोरोनाशी एकजुटीने लढत आहोत. अनेक बंधू-भगिनी मुक्त होत आहेत. अशा वेळेला चहूबाजूंनी जागरुकता बाळगणे, नागरिकांचे कर्तव्य ठरत आहे. प्रशासनाने घालून दिलेले, शासनाने सांगितलेले नियम काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहेच; परंतु त्यासोबतच काही सामाजिक वाईट तत्त्वे बाजूला ठेवली पाहिजेत. कानावर येणारे तसेच; समाज माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या सगळ्या गोष्टी खर्‍या नसतात. तार्किक दृष्टीने आणि अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या, शासनाने सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आज कुटुंबात, समाजात सकारात्मक वातावरण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. टेस्टची संख्या वाढल्यामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मुंबई मधील धारावी पॅटर्न यामुळेच प्रसिद्ध झाला आहे. फिलीपिन्स देशातील मनिला मध्ये सुद्धा धारावी पॅटर्न अवलंबला जात आहे, ही आपल्याला गौरवाची गोष्ट आहे. अन्यथा अफवांचा खूप मोठा धोका समाजाच्या स्वास्थ्याला उद्भवू शकतो. सातत्याने मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे आणि वारंवार हात धुणे ही यशाची आणि सुरक्षेची त्रिसूत्री ठरली आहे. 

नव्या नियमानुसार शासकीय कार्यालय, तसेच खासगी कार्यालयांमध्ये कंटेनमेंट झोन वगळून शंभर टक्के उपस्थिती आहे.  कंटेनमेंट झोन वगळून अनेक दुकानांनाही दिवसातला ठरवून दिलेला वेळ उघडे ठेवण्याची परवानगी आहे. मात्र, याचा अर्थ संकट पूर्णपणे संपले आहे, असा नसून काळजी सुद्धा आणि खबरदारी सुद्धा 100% घ्यावयाची आहे. जनतेच्या सोयीसाठी  शिथिलता देण्यात आली आहे. ती गरजेनुसार वापरावी. सरसकट बाहेर पडू नये. काटेकोर निर्बंध पाळावेत. जनतेच्या  अडचणी ओळखून आणि परिस्थितीचा अभ्यास करून प्रशासनाने सातारा जिल्ह्यामध्ये  शिथिलता दिली आहे. लस लवकरच येणार आहे  त्या बाबतचे संशोधन अंतिम टप्प्यात आहे मात्र, गाफील राहू नये. विषाणूचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. पूर्वीप्रमाणेच सर्व वैयक्तिक, सामाजिक आणि कौटुंबिक नियम तंतोतंत पाळणे गरजेचे आहे. शिथिलता याचा अर्थ ;”आता धोका नाही” असा जनतेने कृपया घेऊ नये. जनतेच्या अडचणी ओळखून सामान्य लोकांच्या सोयीसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्याचा आदर ठेवून आणि स्वतःची जबाबदारी ओळखून सामाजिक अंतर पाळूनच सर्व व्यवहार करणे गरजेचे आहे. वारंवार हात धुणे, चेहर्‍याला वारंवार स्पर्श न करणे, अत्यावश्यक गोष्टीसाठी बाहेर पडणे, मास्क वापरणे, कोणत्याही जागेत थुंकू नये, हस्तांदोलन न करता लांबूनच हात जोडून नमस्कार करणे अशा सर्वच गोष्टी पूर्वीप्रमाणेच पाळाव्यात. वारंवार हात धुण्याचा आणि मास्क वापरण्याचा कंटाळा करू नये. कार्यालयीन तसेच; इतर कर्मचाऱ्यांनी आणि सर्वच नागरिकांनी, घरी गेल्यावर विशेष काळजी घ्यावी आणि सर्व आवश्यक त्या गोष्टी पाळाव्यात. 

आपल्या आयुर्वेदिक मंत्रालयाने  सुचविलेल्या अनेक सुंदर गोष्टी आहेत

1) हळद टाकून गरम पाणी  गुळण्या करणे. यालाच; ” गोल्डन वॉटर” म्हणतात. 

2) हळद आणि सुंठ टाकून गरम दूध पिणे, यालाच; “गोल्डन मिल्क” म्हणतात. 

3) खोबरेल तेल किंवा तिळ तेल किंवा मोहरीचे तेल नाकात दोन थेंब सोडणे 

4)  दोन ते तीन मिनिटे खोबरेल तेल किंवा तिळाचे तेल तोंडात धरून नंतर थुंकणे आणि लगेच गरम पाण्याच्या गुळण्या करणे 

5) रोज दहा ग्रॅम चवनप्राश  खाणे 

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

6)काळी मिरी, काळे मनुके,  दालचिनी, सुंठ, तुळशीची पाने, गुळ हे सर्व दहा मिनिटे पाण्यात उकळावे आणि त्यातून तयार झालेला आयुर्वेदिक  काढा प्राशन करणे 

7) रोज नियमितपणे तीस मिनिटे योगासने, ध्यानधारणा ,प्राणायाम करणे 

8) रोज एक “आवळा” कोणत्याही स्वरूपात खाणे.

9) “आर्सेनिक अल्बम थर्टी” या गोळ्या सल्ल्यानुसार खाणे  

10) “संशमनी वटी”,  या गोळ्या रोज सकाळी संध्याकाळी एक- एक अशा पद्धतीने पंधरा दिवस सल्ल्यानुसार खाणे 

11) बाहेरचे अन्न अजिबात न खाता घरात शिजवलेला पौष्टिक  गरम आहार घ्यावा 

12) वारंवार गरम पाणी पिणे, तसेच ;गरम पाण्याची वाफ घ्यावी.अशा गोष्टी आता रोजच्या जीवनशैलीचा भाग झाल्या पाहिजेत. गावोगावी ग्राम समिती तसेच शहरातून वेगवेगळे प्रभाग विलगीकरणसाठी कष्ट घेत आहेत . विलगीकरण प्रक्रियेला पूर्ण सहकार्य करणे गरजेचे आहे .बाहेरून आलेल्या नागरिकांवर करडी नजर ठेवावी आणि आपले कर्तव्य बजावावे.”स्वच्छता” सर्वप्रकारे सर्व ठिकाणी पाळणे ;हा तर आपला रोजचा मूलमंत्र बनला पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांचे संस्कार असलेला आपला समाज आहे.म्हणूनच स्वच्छता हा आपला “जीवितधर्म” बनवावा.जेणेकरून संसर्ग रोखला जाईल. विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नष्ट झालेला नाही. साखळी पूर्णपणे तुटलेली नाही. त्यामुळे रोजचे जीवन जगण्यात सुसह्यता यावी, एवढाच हेतू शिथिलता देण्यामागे आहे. परस्परातील मतभेद विसरून सर्वांनी मिळून मुकाबला करणे गरजेचे आहे. प्रत्येक गाव आणि प्रत्येक शहर हे जणू “एक राष्ट्र” बनणार आहे. बाधित झालेले आणि त्यानंतर बरे झालेले तसेच; संपर्कात येऊन अथवा प्रवास करुन विलगीकरण असलेल्या नागरिकांशी अत्यंत आपुलकीने वागणे गरजेचे आहे. मनाचा संकुचितपणा: माझे घर ,माझी गल्ली आणि फक्त माझा गाव असा विचार अत्यंत धोक्याचा ठरणार आहे. संत ज्ञानेश्वर माउलींनी ” हे विश्वची माझे घर “असा एकात्म संस्कार महाराष्ट्रावर केला आहे, हे आपण विसरता कामा नये. “मला काय त्याचे”, अशी बेफिकीर वृत्ती असणे बरोबर नाही. आपल्या राज्यात गावोगावी  ज्ञानेश्वरीचे पारायण होते. तुकोबांच्या अभंगाची तर सुभाषिते झाली आहेत…हे सर्व लक्षात घेता आता एकमेकांसाठी झटणे ,गावाचा विचार करणे गरजेचे बनले आहे.आरोग्य, पोलीस, महसूल प्रशासनाला, अंगणवाडी सेविका, आशाताई, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य केंद्रांमधील सर्व  सहकारी, पोलीस जीवावर उदार होऊन, प्रत्यक्ष समाजात जाऊन; घरोघरी जाऊन काम करीत आहेत. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा माहिती अधिकारी अशा जबाबदार अधिकार्‍यांपासून ते तळागाळातल्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण अत्यंत तळमळीने समाजासाठी झटत आहेत.कार्यालयातून काम करणारे कर्मचारी ,तसेच; सामाजिक काम करणाऱ्या संस्था, सामाजिक कार्यकर्ते इतकेच नव्हे तर; पत्रकार बंधू सुद्धा जीवावर उदार होऊन स्वतःचे कर्तव्य बजावत आहेत .”ग्राम समिती” आणि शहरातील “प्रभाग समिती” यांना सर्व बाबतीत सहकार्य करावे. फेसबुक, व्हाट्सएप, इंस्टाग्राम अशा समाज माध्यमांचा वापर अत्यंत सकारात्मक आणि प्रबोधनासाठी करावा.कलाकार, लेखक ,गायक, विविध प्रकारचे तंत्रज्ञ इत्यादी जबाबदार घटकांनी आपल्या कलेचा वापर, सर्व नियम पाळून ;समाजात जागृती साठी करावा. गावोगावी सरकार तर्फे आयोजित केलेल्या प्रशिक्षणाला प्रतिसाद द्यावा. त्यासोबतच अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडावासा वाटतो की; सुशिक्षित नागरिक, तसेच; शिक्षण घेत असलेले तरुण-तरुणी तसेच; इतर जागरूक यांनी नियंत्रण करण्याचे सर्व नियम स्वतः जाणून घ्यावेत आणि त्याचा आपल्या कमी शिकलेल्या ,कामगार इत्यादी बंधूंपर्यंत प्रसार करावा. दिव्यांग, गर्भवती स्त्रिया, वृद्ध, लहान मुले   इत्यादी घटकांची विशेष काळजी घ्यावी.हे आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून करावे. ऑगस्ट 2020 आता संपत आला आहे  आपण गेले चार ते पाच महिने प्राणपणाने मुकाबला करीत आहोत.आपण मुक्त होणार आहोत . संपूर्णपणे काळजी घेत असताना दारू, सिगारेट ,तंबाखू अशा व्यसनांपासून सुद्धा पण दूर राहिले पाहिजे .एकंदरीतच ; आपुलकी ,मानवता, शासन, प्रशासनाबद्दलचा आदर, आपल्या देशबांधवांवरील प्रेम आणि त्यांना केलेले जीवापाड सहकार्य, या सर्व मुल्यांचा अवलंब करून या महासंकटावर आपण मात करू या…. संघर्ष आणि खंबीर लढवय्येपणाचा भारताचा इतिहास पाहता हे अजिबातच अशक्य नाही.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: सातारा
ADVERTISEMENT
Previous Post

रामचंद्र निपाणे यांचे निधन

Next Post

जिल्ह्यातील 290 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 11 बाधित नागरिकांचा मृत्यू

Next Post
जिल्ह्यातील 290 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 11 बाधित नागरिकांचा मृत्यू

जिल्ह्यातील 290 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 11 बाधित नागरिकांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

अजिंक्य रहाणेचे मुंबईत जोरदार स्वागत

अजिंक्य रहाणेचे मुंबईत जोरदार स्वागत

January 21, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यात घेणार लस; या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त वयस्कर लोकांना दिली जाणार लस

पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या टप्प्यात घेणार लस; या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त वयस्कर लोकांना दिली जाणार लस

January 21, 2021
तुरुंगातील कैद्यांना ड्रग्जचा पुरवठा करताना शिपायाला अटक; 28 ग्रॅम ड्रग्ज जप्त

तुरुंगातील कैद्यांना ड्रग्जचा पुरवठा करताना शिपायाला अटक; 28 ग्रॅम ड्रग्ज जप्त

January 21, 2021
मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, पण… : जयंत पाटील

मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल, पण… : जयंत पाटील

January 21, 2021
पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे 31 जानेवारी पर्यंत सुधारीत आदेश जारी

साताऱ्यात शनिवारपासून खरेदी व खाद्य जत्रेचे आयोजन

January 21, 2021
‘फ्युचर ऑफ होम्स’ ई-बुकची दुसरी आवृत्ती लॉन्च

‘फ्युचर ऑफ होम्स’ ई-बुकची दुसरी आवृत्ती लॉन्च

January 21, 2021
कोरोनाची लस बनवणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लँटमध्ये भीषण आग

कोरोनाची लस बनवणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लँटमध्ये भीषण आग

January 21, 2021
बोंडारवाडी प्रकल्पासाठीची जागा निश्चिती करून प्रस्ताव शासनाकडे पाठवा  आ. शिवेंद्रसिंहराजे

बोंडारवाडी प्रकल्पासाठीची जागा निश्चिती करून प्रस्ताव शासनाकडे पाठवा आ. शिवेंद्रसिंहराजे

January 21, 2021
जिल्ह्यातील 75 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

70 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्य

January 21, 2021
कोरोना काळातही शासनाने  लोकाभिमुख काम केलं ; सामान्य जनतेच्या अपेक्ष्यपूर्तीचे एक वर्षे : ना. बाळासाहेब पाटील

कोरोना काळातही शासनाने लोकाभिमुख काम केलं ; सामान्य जनतेच्या अपेक्ष्यपूर्तीचे एक वर्षे : ना. बाळासाहेब पाटील

January 21, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.