स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

निरा – देवघर प्रकल्पासाठी केंद्राने 1 हजार कोटींचा निधी द्यावा; खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी

Team Sthairya by Team Sthairya
March 12, 2021
in फलटण तालुका, सातारा जिल्हा

स्थैर्य, फलटण दि.11 : फलटण – खंडाळा तालुक्यातील दुष्काळी भागासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या निरा – देवघर प्रकल्पाची कामे प्रकल्पातील पाणी बारामतीकडे नेण्यासाठी मुद्दाम रखडवली गेली आहेत. या योजनेच्या पूर्ततेसाठी किमान 1 हजार कोटींच्या निधीची आवश्यकता असून केंद्र सरकारने या निधीची उपलब्धता करुन दुष्काळी भागाचा ‘दुष्काळी’ हा शब्द कायमस्वरुपी पुसून टाकावा, अशी मागणी खासदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मतदार संघातील विविध प्रश्‍नांबाबत नुकतीच नवी दिल्ली येथे पंतप्रधान कार्यालयात नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी वरील विनंती त्यांनी केली.

सदर योजनेबाबत पंतप्रधानांना सविस्तर माहिती देताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, पश्‍चिम महाराष्ट्रातील दुष्काळी पट्ट्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा नीरा देवघर या प्रकल्पाला 1984 साली या मंजुरी झाली व 2000 साली या धरणाचे काम पूर्ण करण्यात आले. मात्र कालव्याची कामे प्रलंबित ठेवण्यात आली. जर ही कामे पुर्ण झाली असती तर प्रकल्पातून दुष्काळग्रस्त भागाला पाणी उपलब्ध झाले असते. माढा मतदारसंघातील तसेच सातारा मतदारसंघातील खंडाळा, फलटण, माळशिरस, सांगोल्यातील काही भाग अशा 100 किलोमीटर अंतराच्या लोकांना पाणी पोहोचवणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. परंतु 21 वर्षांमध्ये या योजनेस फक्त 108 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला व ही योजना जाणून बुजून रखडवणयात आली. या योजनेचे 21 वर्षांमध्ये फक्त 65 किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी यापूर्वी माढा लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे परंतु हा पिण्याचा पाण्याचा व सिंचनाचा प्रश्‍न त्यांनी जाणीवपूर्वक सोडवला नाही. याउलट त्यांनी हे पाणी प्रकल्पाचे लाभार्थी नसतानाही बारामती मतदारसंघाकडे वळवले. त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या काळात चुकीच्या धोरणानुसार बारामतीकडे जाणारे पाणी थांबवून हे पाणी पुन्हा या दुष्काळी पट्ट्यातील लोकांना देण्यात आले. त्यामुळे दुष्काळी भागातील लोकांनी हे पाणी म्हणजे अमृतच आहे असं समजून यांचे स्वागत केले. परंतु राज्यामध्ये सत्ताबदल झाला आणि शरद पवार यांनी पुन्हा हे पाणी बारामतीकडे नेले. या नीरा-देवघर प्रकल्पास पूर्ण होण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. तो आपण पूर्ण करण्यासाठी केंद्रातून निधी उपलब्ध करून द्यावा. पर्यायी बंदिस्त पाईपलाईनद्वारे सुद्धा हा प्रकल्प पूर्ण झाल्यास माळशिरस, फलटण, सांगोला, पंढरपूर या भागातील दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना पिण्याच्या पाण्याचा व शेती पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटेल. या दुष्काळी भागाचा दुष्काळी हा शब्द कायमस्वरूपी निघून जाईल. यामुळे या मतदार संघातील जनता सदैव आपले ऋणी राहील, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी पंतप्रधानांना आवर्जून सांगितले.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

जिहे कटापूर योजनेसाठी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतून निधी मिळावा; खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी

Next Post

उपळव्याच्या स्वराज कारखान्यात तीन लाखाची चोरी 

Next Post

उपळव्याच्या स्वराज कारखान्यात तीन लाखाची चोरी 

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,027 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

दहा हजार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदांची तातडीने होणार भरती

April 17, 2021

अत्याचारी इंग्रजांना चाप लावणारे चाफेकर बंधू

April 17, 2021

मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबईतील कोरोना परिस्थितीचा आढावा

April 17, 2021

रेमडेसिविर इंजेक्शनचा अतिरेक व अनावश्यक वापर टाळावा – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

April 17, 2021

शासन दुग्ध उत्पादकांच्या खंबीरपणे पाठिशी – दुग्ध विकास मंत्री सुनील केदार

April 17, 2021

फलटण तालुक्यातील १६९ तर सातारा जिल्ह्यातील १५४३ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; ३८ बाधितांचा मृत्यु

April 17, 2021

जिल्हाधिकारी महोदय, फलटण नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेचे वार्तांकन करण्यासाठी पत्रकारांना सहभागी करून घ्या; नगरसेवक सचिन सुर्यवंशी – बेडके यांची मागणी

April 17, 2021

सजाई गार्डन येथे उभारणार १०० बेड्सचे कोरोना केअर सेंटर; फलटणकरांच्या मदतीला धावून आले उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे

April 17, 2021

मुंबई महानगरातील मान्सूनपूर्व तयारीची कामे वेळेत पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

April 17, 2021

मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेतील सर्व अधिकृत शिधावाटप दुकाने सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार

April 17, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.