• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

कालबाह्य कायद्याच्या जोरावर राष्ट्रनिर्माण अशक्य : मोदी

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 7, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.७: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर
प्रदेशातील आग्रा मेट्रो प्रकल्पाचा शुभारंभ केला. गेल्या शतकातील
कायद्यांनी राष्ट्रनिर्माण शक्य नाही, असं म्हणत यावेळी पंतप्रधानांनी कृषी
कायद्यांवर अप्रत्यक्ष भाष्य केलं. मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात
शेतकरी आंदोलन पेटलं असून विरोधकांची एकजूट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
आग्रा मेट्रो रेल 29.4 किमी लांब असून त्यात दोन कॉरिडोर असतील. ताज ईस्ट
गेटपासून सिकंदरापर्यंत 14 किमी मार्गावर 13 मेट्रो स्टेशन असतील.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, कायदे एका ठराविक काळानंतर ओझी होतात. गेल्या शतकातील कायदे राष्ट्र निर्माण करणार नाहीत.

आता कोरोना लस मिळवण्यासाठी आपल्याला फार
काळ प्रतीक्षा करावी लागेल, असे वाटत नाही. परंतु तोपर्यंत प्रत्येकाला
मास्क आणि दोन गज अंतराचा नियम पाळावा लागेल. शहरांच्या विकासासाठी आम्ही
चार स्तरांवर काम सुरु केले आहे. भूतकाळापासून सुरु असलेल्या समस्यांचे
निराकरण, जीवन अधिक सुलभ करणे, गुंतवणूक वाढावी आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा
अधिक वापर झाला पाहिजे.

जेव्हा तुम्ही धैर्य आणि समर्पणाने पुढे
जाता तेव्हा कोणताही अडथळा तुम्हाला रोखू शकत नाही. भारतातील सामान्य तरुण,
भारतातील छोटी शहरे आजही तेच धैर्य आणि समर्पण दर्शवित आहेत, असे वक्तव्य
मोदींनी या कार्यक्रमात केले.

रिअल इस्टेट क्षेत्राच्या परिस्थितीशी आपण
परिचित आहोत. बिल्डर आणि गृह खरेदीदार यांच्यात विश्वासाचे अंतर आले होते.
काही व्यक्तींनी मध्यमवर्गाला त्रास देऊन संपूर्ण रिअल इस्टेट क्षेत्राला
बदनाम केले. ही समस्या दूर करण्यासाठी रेरा कायदा आणला गेला. अलिकडच्या
अहवालांनुसार या कायद्यानंतर मध्यमवर्गीयांची घरं वेगाने पूर्ण होण्यास
सुरुवात झाली आहे.

पायाभूत सुविधा क्षेत्राची एक मोठी समस्या
म्हणजे नवीन प्रकल्प जाहीर तर होतात, परंतु आर्थिक स्त्रोतांकडे फारसे
लक्ष दिले जात नाही. आमच्या सरकारने नवीन प्रकल्प सुरु करण्यासोबतच आवश्यक
निधीची तरतूद करण्याची काळजी घेतली.

नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाइन
प्रकल्पांतर्गत 100 लाख कोटींपेक्षा जास्त खर्च करण्याची योजना आहे.
देशातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी जगभरातील गुंतवणूक आकर्षित करण्याचा
प्रयत्न आहे.

मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी
इन्फ्रास्ट्रक्चर मास्टर प्लॅनवरही काम केले जात आहे. देशातील पायाभूत
सुविधा सुधारण्यासाठी जगभरातील गुंतवणूक आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे.

आधुनिक सुविधा आणि आधुनिक
कनेक्टिव्हिटीमुळे उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागाची क्षमता आणखी वाढत आहे.
मेरठ ते दिल्ली दरम्यान देशातील पहिली वेगवान रेल्वे वाहतूक व्यवस्था तयार
केली जात आहे. दिल्ली-मेरठ दरम्यान 14 पदरी एक्सप्रेस वे लवकरच
नागरिकांच्या सेवेत असेल

माझे नेहमीच मत आहे की पर्यटन हे एक असे क्षेत्र आहे ज्यात प्रत्येकासाठी
कमाईची साधने आहेत. मला आशा आहे की कोरोनाची परिस्थिती जसजशी सुधारत आहे,
तसतसे लवकरच पर्यटन क्षेत्रही परत रुळावर येईल.


Tags: देश
Previous Post

उद्या राज्यातील संवेदनशील मार्गावर एसटी सेवा बंद, भारत बंदच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाचा निर्णय

Next Post

दिलीप कुमार यांच्यासाठी प्रार्थना करा

Next Post

दिलीप कुमार यांच्यासाठी प्रार्थना करा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

वृक्ष लागवड व संवर्धनासाठी प्रत्येकाचे प्रयत्न आवश्यक – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मार्च 27, 2023

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नाट्यगृहे सुसज्ज करणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्धार

मार्च 27, 2023

गोवा मुक्ती संग्रामच्या प्रत्यक्षदर्शी चंद्राबाई जाधव कालवश

मार्च 27, 2023

एफसी मद्रासने विश्वस्तरीय रेसिडेन्शियल फुटबॉल अकॅडेमी सुरु केली

मार्च 27, 2023

फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ निवडणूक कार्यक्रम जाहीर : दि. ३० एप्रिल रोजी मतदान व मतमोजणी

मार्च 27, 2023

सीएलएक्सएनएसचा प्रबळ टीम तयार करण्याचा मनसुबा

मार्च 27, 2023

नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयातील प्रत्येक घटकानी माध्यम म्हणून काम करावे – न्यायाधीश भूषण गवई

मार्च 27, 2023

पशुसंवर्धन विभागाच्या सधन कुक्कुट विकासगट योजनेतून कुरुलच्या हणमंत कांबळे यांची प्रगती

मार्च 27, 2023

मुंबईचे गतवैभव पुन्हा मिळवून देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही

मार्च 27, 2023

मांग गारुडी समाजाच्या मागण्यांबाबत अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मार्च 27, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!