• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

जिओची जाहिरात करणारे मोदी एकमेव पंतप्रधान; नवज्योतसिंग सिद्धूंची सडकून टीका

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 17, 2020
in Uncategorized

 


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१७:  केंद्राने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेले 21
दिवस शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा आज 22 वा दिवस आहे. या दरम्यानच
काँग्रेसचे नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी
सरकारवर कठोर टीका केलीय. त्यांनी मोदी सरकारला कॉर्पोरेटधार्जिणं सरकार
म्हटलं आहे. तसेच जो कुणी मोदी सरकारला विरोध करेल त्याला थेट देशद्रोही
म्हटलं जातंय. ही आपल्या भारतीय संविधानाची लढाई आहे. हे देशाचे
जाती-धर्माच्या नावावर विभाजन करु इच्छित आहेत, असंही नवज्योत सिंह सिद्धू
यांनी म्हटलं आहे.

या वक्तव्याचा व्हिडीओ नवज्योत सिंह सिद्धू यांनी सोशल मीडियावर शेअर
केला आहे. त्यांनी म्हटलंय की, मोदी सरकारने सगळे फायदे केवळ
धनदांडग्यांसाठी केले आहेत. देशातल्या सरकारी कंपन्या संपवण्यात आल्या
आहेत. बीएसएनएलचं उदाहरण घ्या. मी आतापर्यंत असा पंतप्रधान बघितलेला नाहीये
जो जिओ धन धना धन सोबत जाहिरात करतोय. दुसरीकडे बीएसएनएल या सरकारी
कंपनीला वार्षिक आठ हजार कोटींचं नुकसान सहन करावं लागतंय. जिओ एका वर्षात
900 कोटी रुपये कमावत आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

पुढे सिद्धू यांनी म्हटलंय की, ओएनजीसी या सरकारी
कंपनीकडे एक लाख कोटी रुपयांचा अधिक निधी उपलब्ध होता. रिलायन्सने
ओएनजीसीकडून 11 हजार कोटी रुपयांचे तेल चोरलं आहे. शाह कमिटी बनली.
याबाबतीत सुप्रीम कोर्टाने रिलायन्सने ओएनजीसीचे 11 हजार कोटी रुपये परत
करण्याचे आदेश दिले आहेत. ते पैसे आजपर्यंत परत मिळालेले नाहीयत, असंही
सिद्धू यांनी म्हटलंय.

मनमोहन सिंह सरकारने शेतकऱ्यांचं 72 हजार कोटी
रुपयांचे कर्ज माफ केलं होतं. आपण दावा केला होता की शेतकऱ्यांचे उत्पन्न
दुप्पट करणार. ते दुप्पट झालं का? मात्र दुसरीकडे मोदी सरकारने गेल्या
वर्षी धनदांडग्यांचे साडेतीन लाख कोटींचं कर्ज माफ केलं. खासगी विमान
कंपन्यांनी सरकारी विमान कंपन्यांची जागा घेतलेली आहे. या कंपन्यांच्या
माध्यमातून मोठी लूट केली जातीय. पीक खराब झालं तर शेतकऱ्यांना त्याचा
परतावाही कमी किंमतीचा दिला जातो. यामुळे शेतकऱ्यांचीच नव्हे तर सरकारी
खजान्याचीही  लूट होत आहे. अशीही टीका नवज्योत सिंह सिद्धू यांनी केली आहे.


Tags: देशमनोरंजन
Previous Post

कोयनेत साकारणार पोलिस प्रशिक्षण उपकेंद्र; गृह राज्यमंत्री शंभूराज देसाईंची संकल्पना

Next Post

जिल्ह्यातील 88 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु

Next Post

जिल्ह्यातील 88 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; 3 बाधितांचा मृत्यु

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदी महागले, सोन्याचे दर ६० हजारांच्या पार, तपासा आजचे दर

मार्च 31, 2023

मोदींची डिग्री दाखण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केला रद्द, केजरीवालांवर ठोठावला २५ हजाराचा दंड

मार्च 31, 2023

राहुल गांधींनी मनाचा मोठेपणा दाखवावा अन् OBC समाजाची माफी मागावी – कपिल पाटील

मार्च 31, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना घाबरतात; त्यामुळेच अशी कारवाई – प्रणिती शिंदेंचा आरोप

मार्च 31, 2023

महाराष्ट्र अस्थिर व्हावा ही सरकारची इच्छा; संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं

मार्च 31, 2023

देशात पेट्रोल-डिझेल बंद होणार?; जल, वायू अन् ध्वनी प्रदूषणावर नितीन गडकरींचं भाष्य

मार्च 31, 2023

श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

मार्च 31, 2023

पौष्टिक तृणधान्य… काळाची गरज

मार्च 31, 2023

बौध्दजन पंचायत समिती मीरा भाईंदर गट क्रं.३३ चे मार्गदर्शन शिबिर संपन्न

मार्च 31, 2023

ना. डॉ. नीलमताई गोर्‍हे यांची कै. लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

मार्च 31, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!