स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

साहित्य वर्तुळातील नामवंतांचा पुरस्कार नागपूरसाठी भूषणावह – पालकमंत्री डॉ.नितीन राऊत

Team Sthairya by Team Sthairya
December 27, 2020
in Uncategorized

स्थैर्य, नागपूर, दि. २७ : साहित्य, कला,सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय चळवळीचे केंद्र असणाऱ्या नागपूर शहरातील तीन नामवंतांना साहित्य व सामाजिक क्षेत्रातील मिळालेले पुरस्कार विदर्भासाठी भूषणावह आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे केले.

अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी बांधवांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाऊंडेशनचे तीन मानाचे पुरस्कार यावर्षी प्रसिद्ध नाटककार, साहित्यिक महेश एलकुंचवार, ज्येष्ठ पत्रकार, लेखक श्याम पेठकर, सामाजिक कार्यकर्ता, प्रकाशक अरुणा सबाने या नागपुरातील तीन नामवंतांना मिळाले आहेत. या तीनही ज्येष्ठांपर्यंत पोहोचून आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला.

या सत्काराच्या वेळी भावना व्यक्त करताना ते म्हणाले, समाजकार्य, सांस्कृतिक महोत्सव, साहित्यनिर्मिती, कला, क्रीडा क्षेत्रात नागपूरचे नाव पर्यायाने विदर्भाचे नाव कायम अग्रेसर असणे एक नागपूरकर या नात्याने अभिमानास्पद आहे. महाराष्ट्र फाऊंडेशनने कोणताही अर्ज न घेता हे पुरस्कार प्रदान केले हे उल्लेखनीय आहे. कला व सामाजिक क्षेत्रातील नामवंत आपापल्या क्षेत्रात फकिरी वृत्तीने वावरत असतात, त्यांची त्यांच्या नकळत स्वतः दखल घेऊन सन्मान करणे प्रेरणादायी आहे. त्यामुळेच प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना सन्मानित करण्याचे नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या निवासस्थानी भेट देऊन पालकमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला. तर ज्येष्ठ पत्रकार, नाटक -चित्रपट पटकथाकार श्याम पेठकर, सामाजिक कार्यकर्ता अरुणा सबाणे यांचा भरतनगर वनराई कार्यालयात सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र फाऊंडेशन तर्फे श्री.महेश एलकुंचवार यांना यावर्षीचा दिलीप वि. चित्रे स्मृति साहित्य जीवनगौरव सन्मान मिळाला आहे. तर विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील एकल महिलांवर आधारित तेरवं या नाट्यसंहितेसाठी रा. श. दातार नाटय पुरस्कार श्याम पेठकर यांना मिळाला आहे. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या अरूणा सबाने यांना कार्यकर्ता (प्रबोधन ) पुरस्कार मिळाला आहे.

या कृतज्ञता सत्कार सोहळ्याला पालकमंत्र्यांसोबत, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी, ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब देशमुख, निलेश खांडेकर, प्राध्यापक जवाहर चरडे, वंदना वनकर आदी उपस्थित होते.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

Phaltan : त्वरित पाहिजेत

Next Post

मत्स्यव्यवसायाची उत्पादकता वाढविणे गरजेचे – पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार

Next Post

मत्स्यव्यवसायाची उत्पादकता वाढविणे गरजेचे – पशुसंवर्धनमंत्री सुनिल केदार

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,029 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

पत्रकार रफिक मुल्ला यांना पितृशोक

April 18, 2021

अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

April 18, 2021

शालिनीताई मेघे रुग्णालयाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट

April 18, 2021

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा वाढविणार – पालकमंत्री उदय सामंत

April 18, 2021

भक्ती व प्रेमाचा संदेश देणाऱ्या महाराष्ट्रातील संतांचा शीख व काश्मिरी तत्वज्ञानावर प्रभाव – सामाजिक कार्यकर्ते संजय नहार

April 18, 2021

फलटणमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांच्या कोरोना चाचण्या; पाच जण कोरोनाबाधित

April 18, 2021

फलटण तालुक्यातील १८९ तर सातारा जिल्ह्यातील १४३४ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;  ३३ बाधितांचा मृत्यु

April 18, 2021

‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’, ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा युनेस्कोकडून तत्वत: स्वीकार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

April 18, 2021

यावर्षी ६०% भारतीय सीएमओनी इन्फ्लूएंसर मार्केटिंगसाठी बजेट राखून ठेवले: क्लॅनकनेक्ट.एआय

April 18, 2021

सुरुवातीच्या अस्थिरतेनंतर बाजार स्थिरावला, मात्र अद्याप गर्तेतून सावरला नाही

April 18, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.