स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या वरदान ठरतील – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी रानभाज्या वरदान ठरतील – पालकमंत्री गुलाबराव पाटील
ADVERTISEMENT


 

स्थैर्य, जळगाव, दि. 9 : रानभाज्या या निसर्गाची देण आहे. अनेक रानभाज्यांना आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व असून त्या पौष्टिक व जीवनसत्वयुक्त असल्याने कोरोनाच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या रानभाज्या वरदान ठरणार असल्याने प्रत्येक नागरिकाने आठवड्यात किमान दोन वेळा या रानभाज्यांचा आहारात समावेश करावा. असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा), कृषि विज्ञान केंद्र, जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोटरी क्लब, मायादेवी नगर, जळगाव येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सावचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष रंजना पाटील या होत्या. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर, रोटरीचे प्रकल्प प्रमुख रो. योगेश भोळे आदि मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

पालकमंत्री म्हणाले, आज ऑगस्ट क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिन असून याच दिवशी रानभाजी महोत्सव होत असल्याने हा त्रिवेणी संगमाचा दिवस आहे. याचे कारण म्हणजे रानभाज्या टिकवून ठेवण्यात आदिवसी बांधवांचे मोलाचे योगदान आहे. हुतात्म्यांना अभिवादन करुन त्यांनी आदिवासी बांधवांनाही यानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. आरोग्याच्यादृष्टीने रानभाज्यांना आहारात महत्त्व आहे. ही बाब लक्षात घेऊन आठवड्यातील एक दिवस शहरात रानभाज्यांचा बाजार भरविण्याच्या सूचनाही त्यांनी कृषि विभागास दिल्यात. त्याचबरोबर नागरिकांनी आपल्या आहारात रानभाज्यांचा समावेश करावा याकरीता जनजागृती करावी. अशा कामांमध्ये रोटरी नेहमीच मदतीसाठी पुढे असल्याचे गौरोवोद्वारही पालकमंत्र्यांनी काढले. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात रोजगार देणारा कृषि व्यवसाय वाचला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे सांगून यापुढे आठवड्यात दोन दिवस रानभाज्या खाणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाकारी श्री. राऊत म्हणाले, जिल्ह्याला कृषीची चांगली परंपरा आहे. सातपुड्यातील भाज्यांना आहारात महत्त्वाचे स्थान आहे. हा वारसा व विविधता टिकविण्याचे काम आपल्याला करायचे आहे. नैसर्गिक भाज्यांचा आहारात वापर वाढावा यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने आपल्याला नैसर्गिकतेकडे चला हा संदेशही नागरीकांपर्यंत पोहोचवायचा आहे. यासाठी कृषि विभाग, आत्मा व रोटरी क्लबचे महत्वपूर्ण योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी रानभाजी महोत्सव आयोजनामागील कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांची संकल्पना सांगून रानभाज्यांचे महत्व विशद केले. तर रोटरी योगेश भोळे यांनी रोटरी क्लबने गेल्या 27 वर्षात राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच चांगल्या कामासाठी रोटरी क्लब नेहमीच मदतीसाठी पुढे असेल असेही सांगितले.

यावेळी उमेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या रानभाजी या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आहारतज्ज्ञ डॉ अनंत पाटील यांनी आहारात रानभाज्यांचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले तर डॉ. मनोजकुमार चोपडा यांनी रानभाज्यांचे औषधी उपयोग यावर सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सरिता खाचणे व कावेरी राजपूत यांनी तर उपस्थितांचे आभार आत्माचे प्रकल्प उपसंचालक मधुकर चौधरी यांनी केले.

या कार्यक्रमास जिल्ह्याच्या पंधरा तालुक्यातील 50 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी विविध रानभाज्यांचे स्टॉल लावले होते. याठिकाणी रानभाज्या खरेदी करण्यासाठी जळगावकर नागरीकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: राज्य
ADVERTISEMENT
Previous Post

11 नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित

Next Post

धार्मिक कार्यक्रमातून सर्वसामान्यांचे प्रबोधन अधिक प्रभावी आणि समाजहिताला प्राधान्य देणारे ठरते : ह.भ.प. बंडा तात्या कऱ्हाडकर

Next Post
धार्मिक कार्यक्रमातून सर्वसामान्यांचे प्रबोधन अधिक प्रभावी आणि समाजहिताला प्राधान्य देणारे ठरते : ह.भ.प. बंडा तात्या कऱ्हाडकर

धार्मिक कार्यक्रमातून सर्वसामान्यांचे प्रबोधन अधिक प्रभावी आणि समाजहिताला प्राधान्य देणारे ठरते : ह.भ.प. बंडा तात्या कऱ्हाडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

फलटणकरांसाठी आनंदाची बातमी; बहुचर्चित फलटण – पंढरपूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण सुरु

मार्चपर्यंत सर्व मेल-एक्स्प्रेस ट्रेन सुरू होण्याची मंत्रालयाला अपेक्षा, विशेष गाड्यांमध्ये द्यावे लागते दुप्पट भाडे

January 25, 2021
वाळू तस्कराचा नायब तहसीलदारावर हल्ला; तलाठी गंभीर जखमी, रेती तस्कर फरार

वाळू तस्कराचा नायब तहसीलदारावर हल्ला; तलाठी गंभीर जखमी, रेती तस्कर फरार

January 25, 2021
‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’त प्रेक्षक संख्येवरील निर्बंध हटवले, आता कुठलीही मर्यादा नाही

‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’त प्रेक्षक संख्येवरील निर्बंध हटवले, आता कुठलीही मर्यादा नाही

January 25, 2021
शिशू केअर युनिटमध्ये कुणीही नसल्याचे स्पष्ट, सीसीटीव्ही फुटेज ठरला महत्त्वाचा पुरावा

शिशू केअर युनिटमध्ये कुणीही नसल्याचे स्पष्ट, सीसीटीव्ही फुटेज ठरला महत्त्वाचा पुरावा

January 25, 2021
पटोलेंची मंत्रिपदाची मागणी; काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पेच, नव्या मागणीमुळे पक्षश्रेष्ठींसह नेतेही नाराज

पटोलेंची मंत्रिपदाची मागणी; काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा पेच, नव्या मागणीमुळे पक्षश्रेष्ठींसह नेतेही नाराज

January 25, 2021
सुप्रीम कोर्टाने सरकारला म्हटले – ‘रॅलीच्या विरोधात अर्ज मागे घ्या, याविषयी पोलिसांना निर्णय घेऊ द्या’

26 जानेवारीस दिल्लीमध्ये प्रथमच होणार ट्रॅक्टर परेड; राजपथावर लष्कर, तर दिल्लीच्या इतर रस्त्यांवर शेतकऱ्यांची परेड

January 25, 2021
‘मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसू’; भाजप नेते प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

‘मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसू’; भाजप नेते प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

January 24, 2021
94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड

January 24, 2021
नाशिकवरुन निघालेले किसान सभेचं लाल वादळ मुंबईत दाखल, 26 जानेवारीला राजभवनावर मोर्चा

नाशिकवरुन निघालेले किसान सभेचं लाल वादळ मुंबईत दाखल, 26 जानेवारीला राजभवनावर मोर्चा

January 24, 2021
बारामती तालुक्यातील विकास कामे गतीने पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

बारामती तालुक्यातील विकास कामे गतीने पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

January 24, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.