स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खोडजाईवाडी तलावामुळे परिसराचा विकास होईल – सभापती रामराजे नाईक निंबाळकर

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
January 31, 2021
in सातारा जिल्हा
ADVERTISEMENT

स्थैर्य, सातारा, दि. ३१: खोडजाईवाडी येथे झालेल्या साठवण तलावामुळे येथील परिसराचा विकास झाला आहे. ज्यांनी या साठवण तलावाला जमिन दिली आहे. त्यांचे अभिनंदन करुन येथील पाण्याचा शेतकऱ्यांनी योग्य तो उपयोग करावा असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

साठवण तलावाचे भूसंपादन निधीचे वितरण व विविध विकास कामांचे भूमीपुजन व उद्घाटन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खा. श्रीनिवास पाटील, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे, तहसिलदार अमरदीप वाकडे, क्रिडा, अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, सुनिल माने, प्रभाकर देशमुख, जसराज पाटील, तानाजी साळुंके, अजित पाटील, संगीता साळुंके उपस्थित होते.

पाण्यामुळे कृषी व औद्योगिक क्रांती प्रगती होती. आज शेतकऱ्यांच्या त्यागातून जिल्ह्यात अनेक धरणे झाले आहेत. त्यांचे स्मरण लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी व जनतेने ठेवले पाहिजे. खोडजाईवाडी येथील शेतकऱ्यांना आज भूसंपादनाचा धनादेश मिळत आहे. या पैशाचा सदुपयोग आपल्या बरोबर आपल्या पुढच्या पिढीसाठी करावा असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, खोडजाईवाडी येथील साठवण तालावाचे काम चांगले झाले असुन यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती झाली आहे. ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्यावर चेहऱ्यावर सुध्दा आज आनंद दिसत आहे. याच परिसरात ओढाजोड प्रकल्पही राबविण्यात आला होता. त्याचा आज परिणाम चांगला दिसत असून येथील ऊसाचे क्षेत्र वाढले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. पण मार्केट कमिट्या सुरु ठेवून शेतकरी व ग्राहकांना न्याय देण्याची भूमिका शासनाने घेतली. आज कोरोनाचे पॉझिटिव्ह रेट कमी झाला असला तरी धोका आणखी टळलेला नाही. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि विविध विकास कामे पूर्ण करण्यावर शासनाचा भर असून, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधीची मागणी केली आहे. यातून जिल्ह्याचा विकास केला जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या वेळी खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, ज्या शेतकऱ्यांना धनादेश मिळाला आहे. त्यांनी मिळालेल्या पैशाचा सदुपयोग करावा. साठवण तलावामुळे खोडजाईवाडी परिसराचे परिवर्तन झाले असून, शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे असेही त्यांनी शेवटी सांगितले.

या कार्यक्रमात पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा खोडजाईवाडी ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कारही करण्यात आला. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


ADVERTISEMENT
Previous Post

शाहिद जवानाच्या पत्नीचा विनयभंग व जाचहाट, शासकीय लाभही व प्रॉपर्टीतुन बेदखल केले

Next Post

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथील वर्ग चार कर्मचारी यांच्या विविध समस्या बाबत संचालकांना निवेदन

Next Post

महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथील वर्ग चार कर्मचारी यांच्या विविध समस्या बाबत संचालकांना निवेदन

ताज्या बातम्या

फलटण तालुक्यातील १८ तर सातारा जिल्ह्यातील १३१ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 1 बाधिताचा मृत्यु

March 3, 2021

थरार! पुणे-सोलापूर महामार्गावर पेट्रोल- डिझेलची वाहतूक करणाऱ्या टॅंकरने घेतला अचानक पेट

March 3, 2021

जम्बो’बाबतचा निर्णय दोन-तीन दिवसांत घेऊ

March 3, 2021

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आलीय; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा

March 3, 2021

पत्नी ही काही मालमत्ता किंवा वस्तू नाही, तिच्यावर बळजबरी करता येणार नाही : सर्वोच्च न्यायालय

March 3, 2021

BMCवर कंगना राणौतने केले आरोप, म्हणाली की – ‘आर्किटेक्टना मिळतेय ही धमकी’

March 3, 2021

धक्कादायक! पोलिसांनी वसतीगृहात घुसून तरूणींना कपेड काढून नाचवलं

March 3, 2021

राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांच्या कारला अपघात, टायर फुटल्याने महामार्गावर दोन कारची धडक

March 3, 2021

‘अमोल भावा तू नवीन आहेस, माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, हे त्यांनाच विचार’- चित्रा वाघ

March 3, 2021

वहिवाटीच्या कारणावरून दोन गटात हाणामारी, शाहूनगरमधील अमराई रेसीडेन्सी येथील घटना

March 3, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.