स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

खडसेंचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
खडसेंचा फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल
ADVERTISEMENT


 

स्थैर्य, जळगाव, दि.६: मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यामुळे माझ्यावर अन्याय झाला आहे. माझ्यावर खोटे आरोप करणा-या हॅकर मनिष भंगाळे याला त्याचवेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशासाठी भेट दिली? ‘मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार’ असे म्हणत विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांच्या तिकिटांची काटछाट केल्यामुळेच भाजपचे सरकार येवू शकले नाही, अशा शब्दांत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर हल्ला चढविला आहे. आपल्यावर झालेल्या या अन्यायाबाबत ‘नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ नावाचे पुस्तक लिहिणार असल्याचेही खडसे यांनी सांगितले.

मुक्ताईनगर येथील आपल्या निवासस्थानी बोलताना खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप सरकारमधील तत्कालीन मंत्र्यांबाबत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. मागील सरकार स्थापनेनंतरच्या काळात मुख्यमंत्रिपदाचा मी दावेदार आहे, हे लक्षात आल्यानंतर एक षडयंत्र रचलं गेलं. माझ्या चाळीस वर्षाच्या राजकीय काळात एकही आरोप झालेला नसताना सरकार आल्यानंतर अवघ्या वर्षभरातच माझ्यावर एका मागून एक आरोप करण्यात आले. हा त्या षडयंत्राचाच भाग होता, असा दावा खडसे यांनी केला.

भंगाळे-फडणवीस भेटीचे फोटो आहेत

माझे दाऊदच्या बायकोबरोबर बोलणे होत असल्याचा आरोप हॅकर मनिष भंगाळे याने केला. देशभर हे प्रकरण गाजत असताना त्याच दिवशी हा मनिष भंगाळे मध्यरात्री दीड वाजता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटला. त्याच्यासोबत कृपाशंकर सिंह देखील होते. त्याचवेळी त्यांच्या भेटीचे फोटोग्राफ माझ्याकडे आले होते. देवेंद्र फडणवीसांनी रात्री दीड वाजता मनिष भंगाळे याला भेटण्याचे कारण काय? असा सवाल देखील खडसे यांनी केला आहे.

त्यानंतर पुन्हा माझ्या जावयाने लिमोझिन घेतली, मी एमआयडीसीची जमीन विकत घेतली, असे आरोप करण्यात आले. जमीन खरेदीची झोटिंग समितीकडून चौकशी करण्यात आली. त्या अहवालात देखील काही तथ्य नव्हते, असे खडसे यांनी नमूद केले.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

माझ्यावर आरोपांचे हे षडयंत्र होते. हे षडयंत्र कुणी केले? कसे केले? त्यात कोण होते? कोणत्या मंत्र्याचे पीए होते? कोण अंजली दमानिया यांना भेटत होते, याच्या व्हिडिओ क्लिपदेखील माझ्याकडे आहेत. मी हे पुरावे वरिष्ठांना देखील दाखविणार आहे. काही पुरावे मी यापूर्वीच वरिष्ठांना दाखविल्याचेही खडसे यांनी स्पष्ट केले.

तसेच एका मंत्र्याचा पीए व एका महिलेचे नग्न फोटोदेखील माझ्याकडे होते, ते देखील मी वरिष्ठांना देवून या मंत्र्याचे व त्याच्या जवळच्या लोकांचे काय उद्योग आहेत, त्याचीही माहीती वरिष्ठांना दिल्याचे खडसे म्हणाले. मी काय गुन्हा केला आहे? असे वारंवार विचारतो आहे, असे सांगताना मी दोषी असेन तर मला शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मीच विधानसभेत केल्याची आठवणही खडसे यांनी यावेळी करून दिली.

‘मी पुन्हा येणार’ हा अहंकार नडला

मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार हा अहंकार होता. ही भूमिका लोकांना आवडली नाही. त्याच जागी जर आम्ही पुन्हा येणार म्हटले असते तर लोकांना आवडले असते. मी येणार मधला ‘मी’पणा लोकांना आवडला नाही. याचा परिणाम असा झाला की, भाजप-शिवसेनेचे सरकार येवू शकले नाही. युती नसताना १२३ जागा आल्या होत्या मग आता युती असताना का सरकार आले नाही, याचे उत्तर कोण मागेल? असा सवालही खडसे यांनी केला.

चार दिवसांच्या संसारावर फटकेबाजी!

देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका-टिप्पणी करूच शकत नाहीत. कारण सर्व तत्त्व, सत्त्व विसरून फडणवीसांनी त्यांच्यासोबत चार दिवसांचा संसार केला आहे. मुहूर्त साधला, लग्न केले, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. तीन, चार दिवस एकत्र राहिले. चार दिवस दुस-याच्या घरात राहून तुम्ही पतीव्रता कसे राहू शकतात? तुम्ही नैतिकता हरविली आहे, असा घणाघाती आरोप खडसे यांनी केला. खडसे म्हणाले की, पूर्वी पक्षात गोपीनाथ मुंडे आक्रमक शैलीत बोलायचे. दुस-या बाजूला भाऊसाहेब फुंडकर यांची तोफ चालायची. तिकडे नागपूरला गेले तर नितीन गडकरी यांचा तोफखाना एकदम जोरात चालायचा. इकडे गिरीश बापट, विनोद तावडे, पंकजा मुंडे मी स्वत: तसेच हरिभाऊ बागडे असे अनेक नेते सरकारविरोधात आवाज उठवत असत. त्यावेळी सरकार गांगरून जायचे. एकदम हादरून जायचे. मात्र, आता महाराष्ट्रात सर्व नेतेमंडळी गुपचूप बसली आहे. सुधीर मुनगंटीवार कुठे आहेत, पंकजा मुंडे काही बोलत नाही. तुम्ही निवडून दिलेले जे पदाधिकारी आहेत, चंद्रकांत पाटील यांच्यासह ते कधीतरी बोलतात. आताच्या घडीला सरकारविरोधात आक्रमक भाषा पाहिजे, त्यात आम्ही कुठेतरी कमी पडत आहोत, असे माझे वैयक्तिक मत असल्याचे सांगत खडसेंनी फडणवीस यांच्या नेतृत्त्वावरच शंका उपस्थित केली आहे.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: राज्य
ADVERTISEMENT
Previous Post

व्यवसायासाठी सर्वाधिक सवलती देणाऱ्या राज्यांत आंध्र प्रदेश अव्वल, यूपी दुसऱ्या तर महाराष्ट्र 13 व्या क्रमांकावर

Next Post

आयपीएल 2020 चे वेळापत्रक जाहीर:पहिला सामना डिफेंडिंग चॅम्पियन मुंबई आणि चेन्नईदरम्यान होईल, पहिल्यांदाच फायनल रविवारीऐवजी मंगळवारी

Next Post
आयपीएल 2020 चे वेळापत्रक जाहीर:पहिला सामना डिफेंडिंग चॅम्पियन मुंबई आणि चेन्नईदरम्यान होईल, पहिल्यांदाच फायनल रविवारीऐवजी मंगळवारी

आयपीएल 2020 चे वेळापत्रक जाहीर:पहिला सामना डिफेंडिंग चॅम्पियन मुंबई आणि चेन्नईदरम्यान होईल, पहिल्यांदाच फायनल रविवारीऐवजी मंगळवारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

भारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

भारतीय शास्त्रीय संगिताचे अर्ध्वयू उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे निधन

January 17, 2021
बाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर!

बाळासाहेबांच्या जयंतीदिनी CM ठाकरे-नारायण राणे एकाच व्यासपीठावर!

January 17, 2021
पुण्यात ‘युके स्ट्रेन’चा शिरकाव! पिंपरी-चिंचवडमध्ये तीन प्रवासी पॉझिटिव्ह

आईस्क्रीममध्येही आढळला करोनाचा विषाणू

January 17, 2021
नामांतर मुद्द्यावर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

नामांतर मुद्द्यावर शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले…

January 17, 2021
वीज वितरण कंपनीच्या८० कंत्राटी कामगारांना सेनेच्या इशाऱ्याने मिळाला न्याय

शिवसेना पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार

January 17, 2021
FIR सार्वजनिक करणाऱ्यांवर गुन्हे कधी दाखल करणार?  चित्रा वाघ यांचा परखड सवाल

पुण्यातील ज्यू धर्मीय बांधवांचा भाजपामध्ये प्रवेश

January 17, 2021
G-7 परिषदेसाठी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मोदींना आमंत्रित केले

G-7 परिषदेसाठी ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मोदींना आमंत्रित केले

January 17, 2021
आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

January 17, 2021
स्वयंपाकाचे बजेट बिघडवणाऱ्या खाद्यतेलांच्या किमतीत घट होणार

स्वयंपाकाचे बजेट बिघडवणाऱ्या खाद्यतेलांच्या किमतीत घट होणार

January 17, 2021
भारतात या वर्षात वेगानेवाढेल सोन्याची मागणी, कोरोना लसीकरणात स्थिती बदलेल

भारतात या वर्षात वेगानेवाढेल सोन्याची मागणी, कोरोना लसीकरणात स्थिती बदलेल

January 17, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.