स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

नुसता धुरळा! अकरावीतील मुलाने आईविरोधात उभं केलं वडिलांचं पॅनल

Team Sthairya by Team Sthairya
December 30, 2020
in प्रादेशिक

स्थैर्य, कन्नड (औरंगाबाद), दि.३०: सध्या कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी अटकेत आहेत. पण आता जाधव राजकारणात सक्रिय होत असल्याचे मुलगा आदित्य जाधवने सांगितले आहे. वडिलांच्या अनुपस्थितीत मंगळवारी कन्नड येथे आयोजित पत्रकार परिषदेत आदित्यने ही माहिती दिली. आता कन्नडच्या राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला भेटणार आहे.

महत्वाचे म्हणजे अकरावीत शिकत असलेला आदित्य जाधव यांनं थेट पत्रकार परिषद घेऊन वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली. धक्कादायक म्हणजे हर्षवर्धन यांचे पॅनल हे त्यांची पत्नी व भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या विरोधात उभे करण्यात आले आहे. वडिलांच्या अनुपस्थितीत आई विरुध्द मुलगा अशी लढत ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला भेटणार आहे.

आदित्य जाधवने ऐन ग्रामपंचायतीच्या निवडणूक रणधुमाळीत उडी घेऊन हर्षवर्धन जाधव सक्रिय होणार असल्याची घोषणा करून वडील अटकेत असताना स्वतः सर्व सूत्रे हातात घेतली आहेत. या निमित्ताने आदित्यने स्वतःचीही राजकीय वाटचाल सुरू केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विषेश म्हणजे स्वतःच्या आई विरुध्द पॅनेल उभा करत आदित्यने राजकारणार एंट्री केली आहे.

पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना आदित्यने समर्पक उत्तरे दिली. तर पिशोर येथील ग्रामपंचायत मध्ये हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलचा प्रचार करणार असाल तर तेथे आई संजना ताई जाधव यांचेही पँनल असणार यावर आदित्य ने सांगितले की संविधानाने सर्वाना निवडणुकीत उभा राहण्याचा हक्क दिलेला आहे त्यामुळे कुणी निवडणुकीला सामोरे जावे हा प्रत्येकाचा वयक्तिक प्रश्न आहे. संविधानाने त्यांना तो दिलेला हक्क असून त्या त्यांचा हक्क बजावत असतील तर त्यात वावगे काय? असे समर्पक उत्तर दिले शिवाय वडील राजकारणात असताना शेतकऱ्यांसाठी लढत असताना, त्यांना न्याय मिळवून देताना मोठ्या नामांकित नेत्यांसोबत त्यांचे वाद झाले आहे मात्र आता शेतकऱ्यांसाठी परत एकदा ते राजकारणात सक्रिय होत असल्याचे सांगितले.

त्यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारले की नामांकित लोक, नेते, म्हणजे नेमके कोण? पत्रकारांचा रोख आजोबा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे होता मात्र आदित्यने याही प्रश्नास पत्रकारांचा व्होरा ओळखून वादाचा मुद्दा टाळून समर्पक उत्तर दिले. शिवाय निवडणुकांच्या निकलातूनच आता विरोधकांना उत्तर देणार असल्याचेही यावेळी आदित्य जाधव यांनी ठासून सांगितले.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील 102 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

Next Post

UK हून येणाऱ्या फ्लाइट्सला 7 जानेवारीपर्यंत ‘रेड सिग्नल’

Next Post

UK हून येणाऱ्या फ्लाइट्सला 7 जानेवारीपर्यंत 'रेड सिग्नल'

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,029 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

पत्रकार रफिक मुल्ला यांना पितृशोक

April 18, 2021

अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

April 18, 2021

शालिनीताई मेघे रुग्णालयाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट

April 18, 2021

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा वाढविणार – पालकमंत्री उदय सामंत

April 18, 2021

भक्ती व प्रेमाचा संदेश देणाऱ्या महाराष्ट्रातील संतांचा शीख व काश्मिरी तत्वज्ञानावर प्रभाव – सामाजिक कार्यकर्ते संजय नहार

April 18, 2021

फलटणमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांच्या कोरोना चाचण्या; पाच जण कोरोनाबाधित

April 18, 2021

फलटण तालुक्यातील १८९ तर सातारा जिल्ह्यातील १४३४ संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित;  ३३ बाधितांचा मृत्यु

April 18, 2021

‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’, ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा युनेस्कोकडून तत्वत: स्वीकार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

April 18, 2021

यावर्षी ६०% भारतीय सीएमओनी इन्फ्लूएंसर मार्केटिंगसाठी बजेट राखून ठेवले: क्लॅनकनेक्ट.एआय

April 18, 2021

सुरुवातीच्या अस्थिरतेनंतर बाजार स्थिरावला, मात्र अद्याप गर्तेतून सावरला नाही

April 18, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.