• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

मोदीजींच्या नेतृत्त्वाखाली भारत आत्मनिर्भर बनत आहे : जयकुमार शिंदे  सातारा येथे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 14, 2020
in Uncategorized

 

     सातारा येथे ‘भाजपा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीरा’मध्ये मार्गदर्शन करताना जयकुमार शिंदे.

स्थैर्य, फलटण दि.१४ : केंद्र सरकारने आत्मनिर्भरता व राष्ट्रीय सुरक्षा याकडे विशेष लक्ष दिले आहे. शेती, उद्योग, व्यापार, संरक्षण आदी सर्वच क्षेत्रात देशाची स्वावलंबनाकडे वाटचाल सुरु असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली भारत आत्मनिर्भर बनत आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी केले.

भारतीय जनता पार्टी सातारा शहर यांच्यावतीने न्यू इंग्लिश स्कूल, सातारा  येथे भाजपा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना ‘आत्मनिर्भरता व राष्ट्रीय सुरक्षा’ या विषयावर मार्गदर्शन करताना जयकुमार शिंदे बोलत होते.  प्रारंभी जयकुमार शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी जेष्ठ नेते बाळासाहेब गोसावी, संघटक यशवंत लेले, सरचिटणीस विठ्ठल बलशेठ्ठींवर, शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक धनंजय जांभळे, राहुल शिवनामे, नगरसेवक सुनील काळभोर, नगरसेविका प्राची शहाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जयकुमार शिंदे पुढे म्हणाले, भारत देश आज जगात बलशाली व्हावा यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करीत आहेत. आज भारत शेती क्षेत्रात आत्मनिर्भर झाला आहे. शेतीवर आधारित असलेले सर्व व्यवसाय दुध, दुग्धजन्य पदार्थ, औषध निर्मिती या क्षेत्रामध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून लक्षणीय प्रमाणात वाढ झाली आहे. आपल्या देशांमध्ये तयार होणारा उत्पादित माल आपल्या लोकांच्या गरजा पूर्ण करून उर्वरित राहिलेल्या मालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर केला आणि म्हणून मेक इन इंडिया ची सुरुवात झाली. जसा आपला देश शेतीमालामध्ये आत्मनिर्भर झाला तसाच तो संरक्षण उत्पादन क्षेत्रामध्ये झाला पाहिजे ही भूमिका घेऊन मोदीजींनी संरक्षण विषयक उत्पादन उपकरणासाठी लागणार्‍या काही गोष्टींना एक वर्षासाठी निर्यातबंदी केली व आधुनिक शस्त्र व हत्यारे तयार करण्यासाठी भारतातील खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देऊन हे सर्व साहित्य भारतामध्ये तयार होण्यासाठी प्राधान्य दिले आणि आत्मनिर्भर भारत संकल्पनेला मेक इन इंडिया बरोबरच स्थानिक वस्तू खरेदीला प्राधान्य दिले गेले. 

कोरोना च्या पार्श्‍वभूमीवर या देशातील कोणताही माणूस उपाशी राहता कामा नये यासाठी केंद्र सरकारने रेशनकार्ड असो किंवा नसो सर्वांना मोफत धान्य देण्याची व्यवस्था केली. स्थलांतरित मजुरांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी मोफत व्यवस्था केली. गोरगरीब जनतेला विमा संरक्षण देऊन कोरोनाच्या काळात मदत झाली. घर बांधणी असेल फ्लॅट घेणे असेल यावर टॅक्समध्ये सूट दिली गेली. नवीन व्यवसायाला कर्ज पुरवठा करून जुन्या व्यवसायांमध्ये रिश्टर लोन देऊन व्यवसायाला चालना दिली. भारत हा जगाच्या पाठीवर बलशाली झाला पाहिजे ही भूमिका घेऊन आज या प्रशिक्षण शिबिरातून जात ाना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समाजातल्या दीनदलित दुबळ्या लोकांना मदत करण्याची भावना घेऊन जावी, असेही जयकुमार शिंदे यांनी  सांगीतले. 

शिबीरास सातारा शहरातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Tags: फलटण
Previous Post

कोळकीचा गावगाडा कोण हाकणार ?

Next Post

शिक्षकांच्या प्रश्‍नांसंबंधी अखिल भारतीय शिक्षक महासंघाच्या पदाधिकार्‍यांची ना.हसन मुश्रीफ यांचेसमवेत चर्चा

Next Post

शिक्षकांच्या प्रश्‍नांसंबंधी अखिल भारतीय शिक्षक महासंघाच्या पदाधिकार्‍यांची ना.हसन मुश्रीफ यांचेसमवेत चर्चा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्थानक योजनेत फलटणचा समावेश : रेल्वेमंत्री ना. अश्विनी वैष्णव; खासदार रणजितसिंह यांच्या प्रयत्नांना यश

मार्च 29, 2023

ग्रामदैवत फलटण, पुरातन श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जीर्णोद्धार लोकार्पण आणि कलशारोहण हे फलटणच्या परंपरेला साजेसे काम : आ.श्रीमंत रामराजे

मार्च 29, 2023

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी ‘आयएफसी’ सोबतचा भागिदारी करार उपयुक्त ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे प्रतिपादन

मार्च 29, 2023

प्रवचने – पैशाच्या आसक्तित राहू नये

मार्च 29, 2023

कमी पाण्यात जास्तीच्या उत्पन्नाची हमी देणारी ‘प्रति थेंब अधिक पीक योजना’

मार्च 29, 2023

ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मार्च 29, 2023

कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे संजय कोळी यांचे दीर्घ आजाराने निधन

मार्च 29, 2023

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात सातारा जिल्हा राज्यात अव्वल

मार्च 29, 2023

वझीरएक्सने पारदर्शकता अहवालाची चौथी आवृत्ती सादर केली

मार्च 29, 2023

मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्पाचे काम आठ दिवसात मार्गी लावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

मार्च 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!