स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

बेळगावात कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मराठी फलकावर फासले काळे

Team Sthairya by Team Sthairya
November 20, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, बेळगाव, दि.२०: बेळगाव जिल्ह्यातील पिरनवाडी
येथे १४ ऑगस्ट रोजी संगोळी रायण्णा यांचा पुतळा उभारण्यावरून भाषिक वाद
सुरू झाला, तो वाद शमला असे वाटत असतानाच आता हा नवा वाद उद्भवला आहे.आमदार
अभय पाटील यांच्या समर्थकांनी अनगोळ नाका येथे फलक लावला होता. त्याच
फलकाला काळे फासण्यात आले आहे. बेळगावातील या भागात तणाव निर्माण झाला आहे.
मात्र पोलिस प्रशासनाने अद्याप कोणताही कारवाई केली नाही.

मराठा
विकास प्राधिकरण स्थापनेबद्दल मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांचे
अभिनंदन करण्यासाठी लावण्यात आलेल्या मराठी भाषेतील फलकाला कन्नड भाषिकांनी
काळे फासले. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला आहे. त्या फलकावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री येडीयुराप्पा, बेळगाव दक्षिणचे आमदार
अभय पाटील यांच्यासह काही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे छायाचित्र होते.
मराठा विकास प्राधिकरण स्थापनेसाठी पाठपुरावा केल्याबद्दल त्या फलकाच्या
माध्यमातून आमदार अभय पाटील यांचे आभारही व्यक्त करण्यात आले होते. या
घटनेमुळे अनगोळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण आहे. गळ्यात लाल व पिवळ्या
रंगाचा स्कार्फ घातलेल्या दोन तरुणांनी हे कृत्य केले आहे. त्याचे व्हिडिओ
चित्रण करून ते चित्रण समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आले आहे. आमदार
अभय पाटील यांच्या छायाचित्राला काळे फासण्याची सूचना चित्रण करणारा तरूण
देत होता. अत्यंत वर्दळीच्या अशा या ठिकाणी हा प्रकार घडत असताना त्याला
कोणी आक्षेप घेतला नाही हे विशेष. फलकाला काळे फासून ते तरूण आरामात तेथून
निघून गेले. या घटनेमुळे बेळगाव शहरात पुन्हा भाषिक तणाव निर्माण झाला आहे.
घटनेनंतर तो फलक तातडीने तेथून हटवण्यात आला आहे.

कर्नाटकात
मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. १३ नोव्हेंबर रोजी
प्राधिकरणाची स्थापना झाली तर १४ रोजी त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली.
त्यानंतर राज्यातील कन्नड संघटनांनी या प्राधिकरण स्थापनेला विरोध केला
आहे. बेळगावात प्राधिकरण स्थापनेला थेट विरोध झालेला नाही. पण प्राधिकरण
स्थापनेनंतर कन्नड संघटनांची धुसफूस सुरू आहे. कन्नड संघटनांच्या दबावानंतर
कर्नाटक सरकारने प्राधिकरणाचा निर्णय मागे घेवून मराठा समाज महामंडळ
स्थापन करण्याची घोषणा केली आहे. तरीही कन्नड संघटनांचा विरोध कायम आहे.
प्राधिकरण स्थापनेसाठी पाठपुरावा केल्याचे श्रेय शहराच्या दोन्ही आमदारांना
त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिले. त्याबाबतचे संदेश समाज माध्यमांवर
व्हायरल झाले. शिवाय शहरात विविध ठिकाणी अभिनंदनाचे फलकही लावण्यात आले.
यातुनच फलकावर काळे फासण्याचा प्रकार घडला आहे.

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

Related


Tags: राज्य
Previous Post

अजित पवारांच्या शेजा-याची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी नेत्यांचा नामोल्लेख

Next Post

शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेणार- शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

Next Post

शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेणार- शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

येत्या तीन दिवसात मंत्रिमंडळाचे खातेवाटप होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती

August 13, 2022

केंद्र पुरस्कृत योजनांचे काम समाधानकारक – केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा

August 13, 2022

जन जागृतीसाठी फलटणमध्ये वृक्षदिंडी संपन्न

August 13, 2022

मायणीतील जमीन फसवणूक प्रकरणात आ. जयकुमार गोरे यांना जामीन मंजूर

August 13, 2022

प्रवचने – देहाचे भोग आणि आनंद

August 13, 2022

यवतेश्वर घाटात कार तिनशे फुट दरीत

August 13, 2022

मोळाचा ओढा परिसरातील पाच गाळे पालिकेकडून सील

August 13, 2022

श्रीमंत रघुनाथराजे मोफत ध्वज देणार

August 13, 2022

अतिवृष्टीमुळे वावदरे येथे घरांची पडझड

August 13, 2022

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सावरकर व लोकमान्य स्मारकास भेट

August 13, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!