• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

गांधी-आंबेडकर हयात असते तर फॅसिझमविरोधात एकत्र आले असते : डॉ. गणेश देवी

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 16, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य,सातारा, दि १६ : संविधानाच्या चौकटीला सध्या मोडतोड करण्याचे काम सुरू आहे आणि सध्याच्या परिस्थितीत जातीयवाद व धर्मांधता वाढू लागली आहे. या परिस्थितीत जर महात्मा गांधी व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असते तर ते नक्कीच फॅसिझम विरोधी एकत्र आले असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी सातारा येथे बोलताना केले.

महात्मा गांधी सहा नोव्हेंबर 1920 रोजी वाई येथे व सात नोव्हेंबर 1920 रोजी सातारा आणि क-हाड येथे आलेल्या घटनेला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर त्याची माहिती देण्यासाठी डॉ. गणेश देवी हे सातारा येथे नुकतेच आले होते. त्यावेळी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अ‍ॅड. बाळासाहेब बागवान होते. यावेळी सुरेखा देवी, ह. भ. प. डॉ. सुहास फडतरे, कॉम्रेड. धनाजी गुरव, प्रा. डॉ. विजय माने, विजय मांडके, प्रा. गौतम काटकर हे विचारमंचावर उपस्थित होते.

महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी फॅसिझम विरोधी एकत्र यायला हवे असे आवाहन करून डॉ. देवी म्हणाले, महात्मा गांधी यांच्या सातारा व क-हाड येथील दौर्‍याला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर सामाजिक सलोखा, हिंदू- मुस्लिम ऐक्य, समता, सामंजस्य वाढवणे त्याचबरोबर संविधानिक लोकशाहीचे संवर्धन करणे गरजेचे आहे. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक ऐक्य व्हावे, हिंदू-मुस्लिम ऐक्य व्हावे याच मताचे होते. त्यांचे विचार परस्परपूरक होते. ते एकमेकांचे शत्रू नव्हते असे प्रतिपादन यावेळी बोलताना विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रचे कार्याध्यक्ष कॉ. धनाजी गुरव यांनी केले. अ‍ॅड. बाळासाहेब बागवान यांनी सामाजिक सलोखा व सामाजिक ऐक्यची गरज प्रतिपादन केली. प्रा. गौतम काटकर यांनी सूत्र-संचालन केले. प्रास्ताविकात डॉ. गणेश देवी यांची ओळख करून दिली.

विजय मांडके व प्रा. डॉ. मनीषा शिरोडकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी राजेंद्र गलांडे, डॉ. रवींद्र भारती, मिलिंद पवार, जयश्री माजगावकर, सुभाष सावंत, जीवन सर्वोदयी (इंगळे), प्रा. डॉ. आर. के. चव्हाण, प्रा. डॉ. बी. बी. जाधव, प्रा. झांझुर्णे, राहुल गंगावणे, संकेत माने पाटील, शुभम ढाले, रश्मी लोटेकर आदी उपस्थित होते.


Tags: सातारा
Previous Post

प्रसिद्ध सुवर्ण व्यावसायिक रतनलाल सी बाफना यांचे निधन

Next Post

कर्तव्य बजावताना पोलिसाला वीरमरण, रस्त्याचे नामकरण करुन हुतात्मा कदमांचे स्मरण!

Next Post

कर्तव्य बजावताना पोलिसाला वीरमरण, रस्त्याचे नामकरण करुन हुतात्मा कदमांचे स्मरण!

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

महाराष्ट्रात पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळेल – मंत्री मंगल प्रभात लोढा

मार्च 20, 2023

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तत्काळ देण्यात यावा – मंत्री संदिपान भुमरे

मार्च 20, 2023

इकोफायचा महिंद्रा सोलाराइझसोबत सहयोग

मार्च 20, 2023

‘चला जाणूया नदीला’ अभियान देशभर जावे – राज्यपाल रमेश बैस

मार्च 20, 2023

चवदार तळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

मार्च 20, 2023

‘रयत’ मार्फत मंगळवारी सौ.लक्ष्मीबाई पाटील पुण्यतिथीचे आयोजन

मार्च 20, 2023

तालुक्यातील 8 विकास सोसायटीवर राष्ट्रवादीचा झेंडा; विडणीतील विजयानंतर जल्लोष

मार्च 20, 2023

शिव-साई डिजिटल फ्लेक्स प्रिंटींगचा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उद्घाटन समारंभ

मार्च 20, 2023

विठ्ठलवाडी येथे महिला दिन व ‘घर दोघांचे’ जनजागृती अभियान संपन्न

मार्च 20, 2023

गुढीपाड्व्यादिवशी कुटुंबियांसोबत; आपल्यासाठी ८ एप्रिल : श्रीमंत रामराजे; भेटण्याचा प्रयत्न करू नये

मार्च 20, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!