• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

सकस आहार व नियमित व्यायामातून हाडांचे विकार टाळणे शक्य: डॉ.प्रसाद जोशी; झी – 24 तास वरील विशेष मुलाखतीत दिला ‘आरोग्य हीच संपत्ती’चा संदेश

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 17, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, फलटण, दि.१७: पूर्वी सर्वसामान्यपणे वयाच्या साठीनंतर सांधेदुखीचा आजार आढळून यायचा. पण सध्या अन्नप्रक्रियेत कीटकनाशकांचा वाढता वापर, व्यायामाचा अभाव, व्यसनाधिनता यामुळे अनेकांना कमी वयातच सांधेदुखीचे विकार आढळून येत आहेत. आपले आरोग्य हीच आपली बहुमोल संपत्ती आहे, हे प्रत्येकाने लक्षात घेवून सेंद्रीय पद्धतीने पिकवलेले सकस व मोजके अन्न खावे. नियमीत व्यायाम करावा. यातून सांधेदुखीचा विकार टाळणे सहज शक्य आहे, असा मौलिक सल्ला फलटण येथील सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ञ डॉ.प्रसाद जोशी यांनी दिला. 

‘हाडांचे आणि सांध्यांचे विकार व उपचार’ या विषयावर झी – 24 तास वृत्तवाहिनीने घेतलेल्या विशेष मुलाखतीत डॉ.जोशी बोलत होते. 

यावेळी बोलताना डॉ.जोशी म्हणाले, प्रामुख्याने वयोमानानुसार होणारी सांधेदुखी, संधीवात, हाडाला पूर्वी लागलेला मार, अंर्तस्त्रावातील बिघाडामुळे जडलेली सांधेदुखी असे सांधेदुखीचे प्रकार आढळतात. तरुणपणी सांध्यांमध्ये गुळगुळीत कवच असते. जसजसे वय वाढते तसतसे या कवचामध्ये खड्डे पडून हे कवच खडबडीत व्हायला सुरुवात होते. सांध्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यासदेखील हे कवच हळूहळू खराब होते. त्यामुळे सांधा एकमेकांवर घासायला सुरुवात होवून त्यातून दाह निर्माण होतो. साध्यांला सूज येते व यातून रुग्णांना वेदना सुरु होतात. यातून रुग्णाच्या हालचालींवर प्रचंड मर्यादा येतात.

सांधेदुखीवर प्राथमिक उपचार करुनही वेदना न थांबल्यास कृत्रिम सांधेरोपण करावे लागते. या उपचार पद्धतीबाबत कोणीही भिती बाळगायचे काहीच कारण नाही. वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञान खुप बदलले आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कमी वेळात अचूक सांधेरोपण करणे शक्य झाले आहे. कृत्रिम सांधेरोपणातून सांधेदुखीच्या वेदना 100% जातात. सांध्यांची कार्यक्षमता वाढते. सांधेरोपणानंतर व्यायाम पुन्हा सुरु करुन आरोग्यदायी आयुष्य जगता येते. रुग्णाला एकप्रकारे यातून पुर्नजीवन मिळते, असेही डॉ.प्रसाद जोशी यांनी यावेळी स्पष्ट केले.

बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव, व्यसनाधिनता व अन्ननिर्मिती प्रक्रियेत वाढता रसायनांचा वापर यामुळे हाडे ठिसूळ होवून गुडघे, मणका, खुबा यांचे विकार अनेकांना कमी वयातच जडत आहेत. आपलं जीवन आपल्या हाती आहे, आरोग्य हीच आपली मौलिक संपत्ती आहे हे लक्षात घेवून प्रत्येकाने नित्यनियमाने व्यायाम करावा, सेंद्रीय, सकस व मोजका आहार घ्यावा, पाणी भरपूर प्यावे, व्यसनांपासून दूर रहावे व शरीरसंपत्तीची काळजी घ्यावी, असा सल्लाही या मुलाखतीच्या माध्यमातून डॉ.प्रसाद जोशी यांनी दिला.


Tags: फलटण
Previous Post

आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र स्वीकारताना करण पोरे. भाजप ओबीसी मोर्चाच्या राज्य उपाध्यक्षपदी करण पोरे

Next Post

रणजितसिंह डिसले यांना मिळालेला पुरस्कार राज्यासह देशाचा गौरव – सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

Next Post

रणजितसिंह डिसले यांना मिळालेला पुरस्कार राज्यासह देशाचा गौरव – सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

साताऱ्यात कर्मचाऱ्यांचा जल्लोष

मार्च 20, 2023

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप

मार्च 20, 2023

शेतीला चोवीस तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

मार्च 20, 2023

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन

मार्च 20, 2023

राहुल गांधींची माफी आणि JPC च्या मागणीवरुन आजही संसदेत गदारोळ

मार्च 20, 2023

म्हणून मी वारंवार दिल्लीला जातो, यापुढेही जात राहणार; CM शिदेंनी केला दिल्लीवारीचा खुलासा

मार्च 20, 2023

महाराष्ट्रात पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळेल – मंत्री मंगल प्रभात लोढा

मार्च 20, 2023

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तत्काळ देण्यात यावा – मंत्री संदिपान भुमरे

मार्च 20, 2023

इकोफायचा महिंद्रा सोलाराइझसोबत सहयोग

मार्च 20, 2023

‘चला जाणूया नदीला’ अभियान देशभर जावे – राज्यपाल रमेश बैस

मार्च 20, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!