ग्रामपंचायत राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्याउमेदवारांचे जात पडताळणीचे अर्ज 30डिसेंबरपर्यंत ऑफलाईन स्वीकारणार


स्थैर्य, सातारा दि.२९: ग्रामपंचायत राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 डिसेंबर असून राखीव जागांवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यास मान्यता दिली आहे. 30 डिसेंबर 2020 अखेर जात पडताळणीसाठी अर्ज ऑफलाईन स्विकारले जाणार आहेत असे  उपयुक्त तथा जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सदस्या स्वाती इथापे यांनी कळविले आहे.


Back to top button
Don`t copy text!