• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

खुल्या प्रवर्गातील राखीव जागांवर अन्य उमेदवार लादू नका; मराठा क्रांती मोर्चाचा प्रशासनाला इशारा

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 22, 2020
in Uncategorized

 


स्थैर्य, कुडाळ, दि.२२: सध्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून मराठा क्रांती मोर्चा, जावली व खुल्या प्रवर्गातील सर्व समाज त्यांच्यासाठी असलेल्या खुल्या जागेवर हक्क सांगण्यासाठी एकवटले आहेत. कुडाळमध्ये सर्व पक्षांच्या पॅनल प्रमुखांना निवेदन देऊन खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या जागेवर अन्य उमेदवार लादू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या जावली तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायत व इतर निवडणुकांचा माहोल सुरू आहे. राजकीय नेते मंडळी ब-याच वेळी खुल्या प्रवर्गातील जागेवर अन्य उमेदवार देतात. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांवर अन्याय होतो. त्यामुळे यापुढे असा प्रयत्न झाल्यास त्याला विरोध करण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे. त्याच बरोबर सामाजिक बांधिलकीची जाणीव असणाऱ्या इच्छुकांनी सुद्धा निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेणे आवश्यक आहे. यापुढे मराठा समाजाच्या वतीने शासनाला हेही निर्देशित केले जाणार आहे की, इथून पुढच्या सर्व निवडणुकीसाठी जर खुला प्रवर्ग इतर जागी उभा राहू शकत नसेल अथवा उमेदवारी नामनिर्देशन फॉर्म भरू शकत नसेल, तर ज्या खुल्या जागा आहेत त्याच्यावर इतर समाजानेही आपला हक्क सांगू नये. त्या जागा खुल्या समाजामधूनच निवडल्या जाव्यात. त्याची सुरुवात कुडाळ (ता. जावळी) येथील सकल मराठा समाजाने केली. गावोगावी असलेल्या सर्व केंद्रप्रमुख, समन्वयक यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर या पद्धतीचे निवेदन दिले जाणार आहे असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

मराठा क्रांती मोर्चासह खुल्या प्रवर्गातील कार्यकर्त्यांनी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांच्या जागी अन्य उमेदवार न देण्याबाबत व्यक्त केलेल्या भावना नक्कीच योग्य आहेत. परंतु हा निर्णय सर्व पॅनल प्रमुखांनी घेणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत प्रत्येक वॉर्डमध्ये ठराविक समाजाचे प्राबल्य असते. अशावेळी सर्व पॅनलनी हे बंधन पाळणे आवश्यक आहे. एखाद्या पॅनलने जर त्या वॉर्डमधील जातीवर आधारित मतांचा विचार करुन उमेदवार दिला, तर अडचण येऊ शकते. असे मत जावली सौरभ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.


Tags: सातारा
Previous Post

उपमुख्यमंत्र्यांच्या भुमिकेमुळे सातारा जिल्हा बॅंकेच्या विद्यमान संचालकांसह नव्यांना दिलासा

Next Post

खवल्या मांजराची तस्करी रोखण्यासाठी शासनाकडून अभ्यास गट स्थापन; पर्यावरण अभ्यासकांसह अधिकाऱ्यांचा समावेश

Next Post

खवल्या मांजराची तस्करी रोखण्यासाठी शासनाकडून अभ्यास गट स्थापन; पर्यावरण अभ्यासकांसह अधिकाऱ्यांचा समावेश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी सोने-चांदी महागले, सोन्याचे दर ६० हजारांच्या पार, तपासा आजचे दर

मार्च 31, 2023

मोदींची डिग्री दाखण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केला रद्द, केजरीवालांवर ठोठावला २५ हजाराचा दंड

मार्च 31, 2023

राहुल गांधींनी मनाचा मोठेपणा दाखवावा अन् OBC समाजाची माफी मागावी – कपिल पाटील

मार्च 31, 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांना घाबरतात; त्यामुळेच अशी कारवाई – प्रणिती शिंदेंचा आरोप

मार्च 31, 2023

महाराष्ट्र अस्थिर व्हावा ही सरकारची इच्छा; संजय राऊतांनी शिंदे-फडणवीसांना फटकारलं

मार्च 31, 2023

देशात पेट्रोल-डिझेल बंद होणार?; जल, वायू अन् ध्वनी प्रदूषणावर नितीन गडकरींचं भाष्य

मार्च 31, 2023

श्रीलंकेच्या उच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

मार्च 31, 2023

पौष्टिक तृणधान्य… काळाची गरज

मार्च 31, 2023

बौध्दजन पंचायत समिती मीरा भाईंदर गट क्रं.३३ चे मार्गदर्शन शिबिर संपन्न

मार्च 31, 2023

ना. डॉ. नीलमताई गोर्‍हे यांची कै. लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

मार्च 31, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!