• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
No Result
View All Result
शनिवार, फेब्रुवारी 4, 2023
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

मंत्रालयात दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार – हेमंत पाटील

पीडब्ल्यूडी विभाग केंद्रस्थानी;उच्च न्यायालयात दाद मागणार

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
जानेवारी 10, 2023
in देश विदेश

दैनिक स्थैर्य । दि. १० जानेवारी २०२३ । मुंबई । गेल्या १० वर्षांमध्ये मंत्रालयातील विविध विकास कामांमध्ये दोन हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी केला.या भ्रष्टाचाराची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी करण्याची मागणी देखील पाटील यांनी केली आहे.मंत्रालयात असलेल्या विविध दालनातील परदे,खिडक्यांच्या काचा,टेबल-खुर्च्या बदलण्यासारख्या कामांसह विविध मंत्र्यांच्या बंगल्याच्या दुरूस्ती कामांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी.विशेषत: केंद्रीय तपास यंत्रणांमार्फत या प्रकरणाची चौकशी केली तर भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत पोहचून मुख्यसुत्रधारापर्यंत पोहचता येईल. याप्रकरणाची चौकशी केली नाही तर जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा देखील पाटील यांनी दिला.राज्य सरकारने चौकशी केली नाही तर उच्च न्यायालयात जावून यासंदर्भात कायदेशीर लढाई देखील संघटना लढेल,असा इशारा पाटील यांनी दिला आहे.

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. त्यामुळे हा विभागच भ्रष्टाचाराचे केंद्रबिंदू बनला आहे.पीडब्ल्यूडी मंत्र्यांची कागदोपत्री दिशाभूल करीत अधिकार्यांकडून आतापर्यत हा भ्रष्टाचार करण्यात आला.विभागातील भ्रष्टाचाराचे सखोल पुरावे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सादर करणार असल्याचे देखील पाटील यावेळी म्हणाले.पुरावे देवून देखील संबंधितांवर कारवाई झाली नाही तर राज्यातील जनता पेटून उठेल आणि यानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर यासाठी सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील, असे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.


Previous Post

सुमंगलम् पंचमहाभूत लोकोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

Next Post

भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा देण्यात महाराष्ट्र देशात अव्वल – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

ताज्या बातम्या

जिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा! चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी

फेब्रुवारी 4, 2023

सेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

फेब्रुवारी 4, 2023

राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा

फेब्रुवारी 4, 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा

फेब्रुवारी 4, 2023

राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

फेब्रुवारी 4, 2023

खासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

फेब्रुवारी 4, 2023

प्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील

फेब्रुवारी 4, 2023

तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री

फेब्रुवारी 4, 2023

ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे

फेब्रुवारी 4, 2023

प्रवचने – भगवंताच्या नामानेच वासनाक्षय !

फेब्रुवारी 4, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!