स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

‘कार्तिकी वारी साधेपणाने पार पाडा; 24 ते 25 कोटी जनतेला लसीकरण करायची गरज ‘- उद्धव ठाकरे

Team Sthairya by Team Sthairya
November 22, 2020
in Uncategorized

 

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

स्थैर्य, मुंबई, दि.२२: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ( दि. 22) राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी येणाऱ्या कार्तिकी वारीला गर्दी न करण्याचे आवाहन केले. आपल्या संवादात उद्धव ठाकरेंनी राज्यातील कोरोनाचा वाढता आकडा, सोशल डिस्टन्सिंगचे, मास्क न घालणे यांसह विविध विषयांवर भाष्य केले.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘सर्व धर्मांचे प्रार्थनास्थळे उघडली. चार दिवसांवर कार्तिकी वारी येत आहे. कार्तिकी वारी साधेपणाने पार पाडा. गर्दी न करता सण-उत्सव साजरे करा. कोरोना अजून गेला नाही. येणारी लाट आधीच्या लाटेपेक्षा अधिक उग्र असू शकते. 24-25 कोटी जनतेला आपल्याला लसीकरण करावे लागणार आहे. यासोबतच, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मास्क लावणे हे त्रिसूत्रीचे पालन करावे लागणार आहे.

ठाकरे पुढे म्हणाले की, ‘अनेकजण मास्क न घालता फिरत आहे, गर्दी करत आहेत. आपण शाळा उघडू शकलो नाही. निर्णय घेतला पण उघडू शकलो नाही, कारण प्रश्नांकित आहे. उद्या मुले आजारी पडू नये याची काळजी आहे. काहीजण म्हणतात हे उघडा, ते उघडा, मात्र ते या महाराष्ट्राची जबाबदारी घेणार आहेत का?’ असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

उद्धव ठाकरेंच्या संवादातील प्रमुख मुद्दे

  • कार्तिकी वारीला गर्दी करु नका.
  • सर्व सण संयमाने साजरे केले.
  • ज्येष्ठ नागरिकांसाठी करोना जास्त घातक आहे.
  • 24 ते 25 कोटी जनतेला लसीकरण करायची गरज आहे.
  • लस मिळाल्यानंतर ती किती तापमानात ठेवायची हे अजूनही निश्चित झालेले नाही,
  • मास्क घाला, हात धुवा हे त्रिसूही उपाय आपल्या हातात आहेत.
  • जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. हे उघडा, ते उघडा सांगणाऱ्यांवर जबाबदारी नाही.
  • अनावश्यक घराबाहेर पडू नका, करोनाची लक्षण दिसली तर लगेच चाचणी करा.
  • सगळ उघडलं म्हणजे करोना गेला असं समजू नका
  • गर्दी वाढली तरी कोरोना मरणार नाही वाढणार आहे.
  • उत्तर भारतीय बांधवांनी छट पूजा कुठेही गर्दी न करता साजरा केली.
  • सहकार्य केल्यामुळे फुगत चाललेला करोनाचा आकडा खाली आला.
  • दिल्लीत दुसरी, तिसरी लाट आली आहे.
  • परदेशात लॉकडाऊन करण्यात आला.

Related


Tags: राज्य
Previous Post

कोपर्डे हवेलीत सिद्धनाथांचा शेतकरी अवतार; भाविकांचे वेधले लक्ष

Next Post

पुढील काही दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, लॉकडाउनवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Next Post

पुढील काही दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, लॉकडाउनवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉल्बी का वाजू नये याचे उत्तर प्रशासनाने द्यावे – खासदार उदयनराजे भोसले यांचा साताऱ्यात रोखठोक पवित्रा

August 20, 2022

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतले अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीचे दर्शन

August 20, 2022

अवैधरित्या दारुची वाहतूक केल्याप्रकरणी एकावर कारवाई

August 20, 2022

दुष्काळ पीडित शेतकऱ्याच्या भावना समजून घेवून त्यांचे मनोबल वाढवा – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

August 20, 2022

युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

August 20, 2022

प्रवचने – दास विषयाचा झाला। सुखसमाधानाला आंचवला॥

August 20, 2022

माजी सैनिकांसाठी काम व क्षयरोग निर्मूलनासाठी बीड जिल्ह्यात होत असलेले प्रयत्न कौतुकास्पद – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

August 20, 2022

सातारा शहर परिसरातील दोन जुगार अड्ड्यांवर छापे

August 20, 2022

मुख्यमंत्री प्रणित जिल्हा शिवसेनेची जबाबदारी पुरुषोत्तम जाधव यांच्याकडे

August 20, 2022

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतले परळी वैजनाथाचे दर्शन

August 20, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!