बांधाच्या वादातून बोअरवेल मुजवले


स्थैर्य, सातारा, दि.०७: बांधाचा सुरू असलेल्या वादाच्या रागातून शेतात असलेले बोअरवेल मुजवल्याची घटना जकातवाडी (ता. सातारा) येथे घडली. याप्रकरणी अनवर आलेखान मुल्ला (रा. शिरवडे, ता. कराड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिलीप बाबुराव जाधव, शेअरअली शौकत बागवान, नफीसा इकबाल शेख, शाहीन जब्बार शेख (सर्व रा. सातारा) यांच्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, जकातवाडी (ता.सातारा) येथे तक्रारदार व संशयित यांच्या शेतजमिनी शेजारी शेजारी असून त्यांच्यात त्याबाबत वाद सुरू आहेत. त्याच वादाच्या रागातून दि. 4 रोजी संशयितांनी जकातवाडी येथील गट क्रं (32)1 मधील तक्रारदार यांच्या मालकीच्या शेताचा बांध फोडून त्यात शेतात असलेली बोअरवेल मुजवून टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सजन हंकारे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!