• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
No Result
View All Result
शनिवार, फेब्रुवारी 4, 2023
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब व अंत्योदय योजनेच्या लाभार्थीना वर्षभर मोफत अन्नधान्य मिळणार – जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
जानेवारी 12, 2023
in सातारा जिल्हा

दैनिक स्थैर्य । दि. १२ जानेवारी २०२३ । सातारा । राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील  प्राधान्य कुटुंब लाभार्थींना प्रति लाभार्थी २ किलो गहू व ३ किलो तांदुळ तर अंत्योदय योजनेच्या लाभार्थीना प्रति कार्ड कुटुंबास १५ किलो गहू व २० किलो तांदुळ पूर्णतः मोफत देण्यात येणार आहे.  प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय योजना लाभार्थींनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत मिळणारे गहू व तांदुळ घेताना दि. 1 जानेवारी 2023 ते दि. 31 डिसेंबर 2023 या कालावधीत कोणतेही शुल्क दुकानदारांना द्यावयाचे नाही, अशी  माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा  किसवे-देवकाते यांनी दिली.

यासाठी जिल्ह्याला महिन्याला सुमारे ८ हजार ४९५ मे. टन अन्नधान्य (गहू व तांदुळ ) वाटप करण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय कार्ड – २७३०८ (अंत्योदय लाभार्थी- १,१९,३६९) व प्राधान्य कुटुंब लाभार्थी – १५,५३,६२५ ( कार्ड संख्या ३,७३,७११) इतक्या लाभार्थ्यांना दिनांक १ जानेवारी २०२३ पासून मोफत धान्य वितरण केले जाणार आहे. देशातील एकही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना सुरु केली आहे.

स्वस्त धान्य दुकानदारांनी यासाठी कोणतेही धान्याचे शुल्क लाभार्थ्याकडून आकारु नये. लाभार्थीनी POS (बायोमेट्रीक प्रमाणीकरण) मशिनवर आपल्या कुटुंबातील किती व्यक्ती नोंदीत आहेत हे पहावे. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना प्रति सदस्य 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ व अंत्योदय लाभार्थीना प्रति कुटुंबास 15 किलो गहू व 20 किलो तांदूळ याप्रमाणे धान्य दुकानदार देत आहेत काय याची खातरजमा करावी. सदरचे अन्नधान्य (गहू व तांदुळ) विनाशुल्क असलेने दराचा हिशोब करणेची आवश्यकता राहिलेली नाही. मात्र मिळणाऱ्या अन्नधान्याचे प्रमाण मात्र तपासून खात्री करणे व आपल्या हक्कांचा लाभ नियमाप्रमाणे प्राप्त करुन घेणे आवश्यक असल्याचे श्रीमती स्नेहा किसवे-देवकाते यांनी सांगितले.

या बाबत कोणतीही तक्रार असल्यास संबधित तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा.  त्याचप्रमाणे अंत्योदय लाभार्थींना प्रतिकुटुंब देणेत येणारी 1 किलो साखर 20/- रुपये प्रमाणे देण्याची बाब पूर्वीप्रमाणेच लागू राहील.


Previous Post

वाहतुकीचे नियम पाळणे ही सामूहिक जबाबदारी – मंत्री शंभूराज देसाई

Next Post

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची मुलाखत

Next Post

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात उद्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची मुलाखत

ताज्या बातम्या

जिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा! चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी

फेब्रुवारी 4, 2023

सेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

फेब्रुवारी 4, 2023

राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा

फेब्रुवारी 4, 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा

फेब्रुवारी 4, 2023

राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

फेब्रुवारी 4, 2023

खासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

फेब्रुवारी 4, 2023

प्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील

फेब्रुवारी 4, 2023

तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री

फेब्रुवारी 4, 2023

ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे

फेब्रुवारी 4, 2023

प्रवचने – भगवंताच्या नामानेच वासनाक्षय !

फेब्रुवारी 4, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!