स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला अर्पण मिळालेल्या जमिनींपैकी आणखी ११७ एकर भूमी परत मिळाली; सर्व भूमी परत मिळेपर्यंत लढा चालूच रहाणार ! – हिंदु जनजागृती समिती

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 1, 2021
in महाराष्ट्र
ADVERTISEMENT

स्थैर्य, पंढरपूर, दि.१: श्री विठ्ठलाच्या चरणी भाविकांनी अर्पण केलेल्या शेकडो एकर जमिनींपैकी ११७ एकर जमीन मंदिर समितीने दळणवळण बंदीच्या काळात स्वत:च्या कह्यात घेतल्याचे नुकतेच देवस्थान समितीने घोषित केले. श्री विठ्ठलाच्या कृपेमुळेच ही भूमी परत मिळाली, अशी आमची श्रद्धा आहे. असे असले, तरी श्री विठुरायाची सर्व भूमी परत मिळेपर्यंत आम्ही आमचा लढा चालूच ठेवणार आहोत, असे मत हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी या प्रकरणी व्यक्त केले.

पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या सरकारनियुक्त समितीने देवस्थानाच्या संपत्तीत प्रचंड घोटाळा केल्याचे हिंदु जनजागृती समिती आणि हिंदू विधीज्ञ परिषद यांनी पुराव्यानिशी उघड केले होते. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने वेळोवेळी आंदोलनही केले होते. वर्ष २०१४ मध्ये हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून हिंदु जनजागृती समितीने श्री विठ्ठल मंदिराच्या १२५० एकर भूमी घोटाळ्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मा. न्यायालयाने ती याचिका दाखल करून घेत त्यावर महाराष्ट्र शासन आणि मंदिर समितीला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे, तसेच न्यायालयाने तहसीलदारांची पथके तयार करून देवस्थानच्या जमिनी शोधण्याचे आदेश दिले होते. याचा परिणाम म्हणून यापूर्वी देवस्थान समितीला ९०० एकर भूमी परत मिळाली होती आणि आता ११७ एकर भूमी परत मिळाली आहे. आतापर्यंत १०१७ एकर भूमी परत मिळवण्यात यश आले आहे.

श्री. घनवट पुढे म्हणाले की, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला भाविकांनी आजवर अडीच सहस्र एकर पेक्षा अधिक जमीन अर्पण केली असल्याची आमच्याकडे माहिती आहे. यातील अद्याप १४०० एकर जमीन परत मिळवता आलेली नाही. मुळात इतकी वर्षे या जमिनी ताब्यात घेण्याचे काम मंदिर समितीने स्वतःहून का केले नाही ? मंदिरांचे व्यवस्थापन चांगले करण्याच्या नावाखाली मंदिरांचे सरकारीकरण करायचे आणि इथेही सरकारी पद्धतीने भ्रष्टाचार करायचा, हे अत्यंत गंभीर आहे. हा मंदिरांचे सरकारीकरण केल्याचा दुष्परिणाम आहे. केवळ हिंदूंचीच मंदिरे धर्मनिरपेक्ष शासन ताब्यात घेते. घ्यायचीच आहेत, तर मुसलमानांच्या मशिदी आणि ख्रिस्त्यांची चर्च पण सरकारीकरण करून दाखवा ! आणि तसे करण्याची धमक नसेल, तर मंदिरांचे सरकारीकरण रद्द करा.


ADVERTISEMENT
Previous Post

देशाला, देशातील नागरिकांच्या आकांक्षांना नवउभारी देणारा अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस

Next Post

कोळीवाड्यातील जमिनी मच्छिमारांच्या नावे करण्यासाठी धोरण निश्चित करावे – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

Next Post

कोळीवाड्यातील जमिनी मच्छिमारांच्या नावे करण्यासाठी धोरण निश्चित करावे - विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

ताज्या बातम्या

बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करा ना. अजित पवार; आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांना केल्या सूचना

March 1, 2021

‘डॉलिवूड प्ले’द्वारे मनोरंजक चित्रपटांच्या डिजिटल प्रीमियरची घोषणा

March 1, 2021

विनामास्क फिरणाऱ्यांविरुध्द मोहीम तीव्र करणार गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांना होणार हजार रुपये दंड

March 1, 2021

नेक्सझू मोबिलिटीने इलेक्ट्रिक सायकल रॉम्पस+ लॉन्च केली

March 1, 2021

शेंद्रे येथे मंगळवारी मधुमक्षिका पालन शिबीर

March 1, 2021

सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये बंद; जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे सुधारित आदेश जारी

March 1, 2021

गलवान हिंसेनंतर चीनने मुंबईच्या पॉवर सप्लाय सिस्टीमवर केला होता सायबर हल्ला

March 1, 2021

सुहास लिपारे यांचे निधन

March 1, 2021

कच्चा माल आमचा… पक्का पण आम्हीच करु…!!

March 1, 2021

संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरी; जयंतीनिमित्त वृद्धाश्रमात धान्य वाटप व वृद्धश्रमास आर्थिक मदत

March 1, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.