दिवाळीपूर्वी शिधाजिन्नसांचा संच घेऊन जाण्याचे आवाहन


दैनिक स्थैर्य । दि. ०८ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब शिधापत्रिकाधारकांनी दिवाळीपूर्वी आपली शिधापत्रिका ज्या रास्त भाव दुकानदार यांचे दुकानास जोडलेली आहे. त्या रास्त भाव दुकानदार यांचेकडे संपर्क साधून नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ, 1 किलो साखर व 1 लिटर पामतेल या 4 शिधाजिन्नसांचा समावेश असलेला 1 संच शासनाने निश्चित केलेल्या सवलतीच्या दरात घेवून शासनाच्या योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे, आवाहन जिल्हाधिकारी  रुचेश जयवंशी  व जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे –देवकाते यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!