स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

‘तारक मेहता…’चे लेखक अभिषेक मकवाना फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळले

Team Sthairya by Team Sthairya
December 5, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, मुंबई, दि.५: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय
मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चे लेखक अभिषेक मकवाना यांनी आत्महत्या
केली आहे. वृत्तानुसार, ही घटना 27 नोव्हेंबरची आहे. परंतु कुटुंबातील
सदस्यांनी केलेल्या दाव्यानंतर आता ही माहिती माध्यमांसमोर आली आहे. सायबर
फ्रॉड आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून अभिषेक यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल
उचलल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे.

सुसाइड नोटमध्ये आर्थिक विवंचनेबद्दल लिहिले

मुंबई
मिररच्या वृत्तानुसार, 27 नोव्हेंबरला अभिषेक यांचा मृतदेह त्यांच्या
मुंबईस्थित फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. मुंबई
पोलिसांनी सांगितल्यानुसार, अभिषेक यांनी एक सुसाइड नोट लिहिली असून त्यात
त्यांनी आर्थिक विवंचनेविषयी सांगितले आहे. अभिषेक यांच्या कुटुंबीयांनी
सांगितल्यानुसार, त्यांच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांना काही लोकांचे फोन
येत असून ते दावा करत आहेत की अभिषेक यांनी त्यांना लोकमध्ये गॅरेंटर बनवले
होते. हे फसवे लोक आता कुटुंबीयांकडे पैसे परत मागत असल्याचे कुटुंबीयांचे
म्हणणे आहे.

भावाला ईमेलद्वारे मिळाली फसवणूक झाल्याची माहिती

- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

अभिषेक
यांचा धाकटा भाऊ जेनिशने एका बातचीतमध्ये सांगितले की, “मी माझ्या भावाचा
मेल तपासला. कारण त्याच्या मृत्यूनंतर मला वेगवेगळ्या क्रमांकावरून अनेक
कॉल आले होते जे कर्जाचे पैसे परत मागत आहेत. एक फोन नंबर बांगलादेशात
रजिस्टर्ड आहे. एक म्यानमारमध्ये आणि उर्वरित देशाच्या वेगवेगळ्या
राज्यातील आहे.”

जेनिश पुढे
म्हणाले, “ईमेल रेकॉर्डवरून मला समजले की माझ्या भावाने एका इजी लोन
अॅपवरुन थोडे कर्ज घेतले होते, ज्यावर मोठ्या प्रमाणात व्याज आकारले गेले.
जेव्हा मी त्यांच्यातील व्यवहार पाहिले तेव्हा मला कळले की माझ्या भावाने
कर्जासाठी अर्ज न करताही, ते थोडे थोडे पैसे अकाउंटमध्ये पाठवत राहिले आणि
त्याचा व्याज दर 30%आहे.”

चारकोप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या
प्रकरणी मुंबईतील चारकोप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेथील अधिका-याच्या म्हणण्यानुसार अभिषेकच्या कुटुंबीयांनी त्यांना सर्व
फोन नंबर दिले आहेत. अभिषेकच्या बँक खात्यातील व्यवहारांची चौकशी केली जात
आहे.

Related


Tags: क्राइम
Previous Post

एक लाखांचे भांडण अंगलट; लग्नाच्या तीन दिवसआधी युवकाचे अपहरण करून गुप्तांग कापले

Next Post

ग्रंथालयांना मिळणार 23.7 टक्के अनुदान; शासन मोठा निर्णय घेण्याची शक्यता!

Next Post

ग्रंथालयांना मिळणार 23.7 टक्के अनुदान; शासन मोठा निर्णय घेण्याची शक्यता!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Phaltan : त्वरीत पाहिजेत

August 12, 2022

राज्यभरात ‘अमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा’ मोहिमेचे आयोजन

August 12, 2022

अल्पवयीन मुलीस धमकी देत पळवून नेले

August 12, 2022

परळी खोऱयात पावसाचा हाहाकार अतिवृष्टीमुळे नुकसान: उरमोडीचा विसर्ग वाढवला

August 12, 2022

मुसळधार पावसात मुख्यमंत्र्यांचे महाबळेश्वरकरांनी केले जल्लोषात स्वागत

August 12, 2022

सातारा जिल्ह्याच्या सिमेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री शंभूराजे देसाई यांचे जंगी स्वागत

August 12, 2022

वीर धरण पूर्ण क्षमतेने भरले;गुरुवारी संध्याकाळी सहा वाजता निरा नदीत तेहतीस हजार हजार चारशे क्युसेक्स विसर्ग

August 12, 2022

पोलीस बांधवांसाठी ‘बीजराखी’ या अनोख्या संकल्पनेसह रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न

August 12, 2022

पर्यावरण रक्षणासाठी व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज – श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

August 12, 2022
मान्यवर समवेत जिजाऊ सेवा संघाच्या पदाधिकारी.

जिजाऊ सेवा संघाचे कार्य कौतुकास्पद : पौर्णिमा तावरे

August 12, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!