राज्यात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या ७ तुकड्या तैनात

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०९ सप्टेंबर २०२२ । मुंबई । राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व  एसडीआरएफच्या ७ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) मुंबई (कांजूरमार्ग – १, घाटकोपर – १) – २, रायगड- १, ठाणे – १, सांगली – १ एकूण ५ पथके तैनात आहेत.

तर नांदेड – १, गडचिरोली – १ अशा एकूण दोन ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) २ तुकड्या तैनात केल्या आहेत.

राज्यातील नुकसानाची सद्यस्थिती

राज्यात १ जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २९ जिल्हे व ३६८ गावे प्रभावित झाली असून ११७ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली असून २० हजार ८६६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ३०७ नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर ५७८९ प्राणी दगावले आहेत. ४४ घरांचे पूर्णत: तर ३ हजार ५४० घरांचे अंशत: नुकसान झाले आहे.

मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त माहितीनुसार हा अहवाल प्रसिद्धीसाठी देण्यात  येत आहे.


Back to top button
Don`t copy text!