• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

तुमच्या मोबाइल बिलात होणार 20 टक्के वाढ

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 20, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, दि.२०: देशातील तीनही दूरसंचार
कंपन्या व्होडा-आयडिया, एअरटेल व रिलायन्स जिओ लवकरच सेवा महाग करण्याच्या
तयारीत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काही महिन्यांत दरवाढ कधीही
होऊ शकते. तीनही कंपन्या दरात २० टक्क्यांपर्यंत वाढ करतील, असा
तज्ज्ञांचा अंदाज आहे. वित्तीय सेवा कंपनी मोतीलाल ओसवाल फायनान्शियल
सर्व्हिसेसचे संशोधन उपाध्यक्ष अली असगर शाकिर यांच्यानुसार आधी व्होडा-
आयडिया दरात वाढ करील आणि त्यानंतर एअरटेल व जिओ त्यांचे अनुकरण करतील.
कारण एअरटेल आणि जिओ यांना आधी दर वाढवून त्यांचे ग्राहक गमवायचे नाहीत.
अली असगर सांगतात की, बहुतांश आर्थिक उलाढाल कोरोनाच्या आधीच्या पातळीवर
गेल्याने अपेक्षेआधीही दरात वाढ होऊ शकते. तर आनंद राठी सिक्युरिटीजचे
दूरसंचार विश्लेषक नरेंद्र सोळंकी सांगतात की, दूरसंचारचे दर वाढणे नक्की
आहे. फक्त ते नूतन वर्षाच्या आधी वाढतात की नवीन वर्षानंतर हे बघावे लागेल.
त्यांच्यानुसार दरात १० टक्क्यांच्या आसपास वाढ होऊ शकते. यासाठी
व्होडा-आयडिया पहिले पाऊल टाकील. मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसच्या
एका अहवालानुसार दरात २० टक्के वाढ झाल्यास एअरटेलचा प्रतिव्यक्ती महसूल
वाढून १७८ रुपये, जिओचा १६७ रुपये व व्होडा-आयडियाचा महसूल १४० रुपये होईल.
अली असगर सांगतात की, महसुलातील वाढीमुळे व्होडा-आयडियाचा रोकड प्रवाह तर
वाढेल, पण त्यांचा खर्च भागणार नाही.

यंदाचा औंध संगीत महोत्सव 22नोव्हेंबर रोजी आँनलाईन सादर होणार; दिग्गज गायकांचे होणार शास्त्रीय गायन

व्होडा-आयडियात ऑकट्री करू शकते १५ हजार कोटी रुपयांची गंुतवणूक

भारतातील
संकटग्रस्त दूरसंचार कंपनी व्होडाफोन-आयडियात अमेरिकन अॅसेट मॅनेजमेंट
कंपनी ऑकट्री कॅपिटलने कमीत कमी दोन अब्ज डॉलरची (१४८५३ कोटी रुपये)
गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ऑकट्रीने या संभाव्य व्यवहारासाठी
वरदेसह अनेक कंपन्यांसोबत गट बनवला आहे. या गुंतवणूकदार समूहाने २ ते २.५
अब्ज डाॅलरचा निधी व्होडाफोन-आयडियाला उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव दिला
आहे. ऑकट्रीच्या या गटासोबतच्या संभाव्य व्यवहार कसा असेल हे सध्या स्पष्ट
नाही. सप्टेंबरमध्ये व्होडा-आयडियाने म्हटले होते की, भारतीय वायरलेस
इंडस्ट्रीत स्पर्धा वाढल्याने त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शेअर व
कर्जाद्वारे जवळपास २५ हजार कोटी रुपयांचा निधी जमवण्याची योजना आखत आहेत.
याच्याशी संबंधित जाणकारांचे म्हणणे आहे की, व्होडा-आयडियाची इतर संभाव्य
गुंतवणूकदारांसोबतही चर्चा सुरू आहे. याबाबत ऑकट्री, वर्दे व व्होडाफोन
आयडियाच्या प्रतिनिधींनी बोलण्यास नकार दिला.


Tags: अर्थ विषयक
Previous Post

2022 कॉमनवेल्थ स्पर्धेत प्रथमच महिला टी-20 क्रिकेटचा समावेश; सध्याच्या क्रमवारीनुसार भारतीय संघाचा प्रवेश निश्चित

Next Post

जिल्ह्यातील 107 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;11 बाधितांचा मृत्यु

Next Post

जिल्ह्यातील 107 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ;11 बाधितांचा मृत्यु

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

जिंती येथे एकास नऊ जणांकडून मारहाण

मे 29, 2023

निंबळकजवळ बुलेट गाडीच्या अपघातात युवक ठार

मे 29, 2023

महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा

मे 29, 2023

वाठार फाटा येथील अपघातात दोघे जखमी

मे 29, 2023

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले; उपळवे येथील घटना

मे 29, 2023

पृथ्वी चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच; वाहतूक पोलीस असून अडचण नसून खोळंबा

मे 29, 2023

बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होईल – डॉ. सुरेश खाडे

मे 29, 2023

पालखीत सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

मे 29, 2023

नवीन संसद भवनच्या उद्घाटन सोहळा हा आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण : खासदार रणजितसिंह

मे 29, 2023
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय चे विध्यार्थी

“पुरानी जीन्स ओर गिटार” १६ वर्षानंतर भेटले जुने मित्र

मे 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!