• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

केंद्र सरकारच्या धोरणामुळे बेरोजगारी वाढली – अजित पवार

Team Sthairya by Team Sthairya
नोव्हेंबर 22, 2020
in Uncategorized

 

स्थैर्य, पिंपरी, दि.२२: ‘मन की बात’ या कार्यक्रमामधून अनेक गोष्टी सांगितल्या जातात. अनेक अश्‍वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात काहीच होत नाही. करोनानंतरच्या काळात केंद्र सरकारने घेतलेल्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्रासह देशात प्रचंड बेरोजगारी वाढली असून, केंद्राच्या कामगार कायद्यामुळे कामगारांवरही अन्याय झाल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व नगरसेवकांची बैठक आज (रविवारी) चिंचवडगावातील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित करण्यात आली होती. 

या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अजित पवार बोलत होते. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ‘मन की बात’मध्ये खूप काही सांगितले जाते, आश्‍वासने दिली जातात मात्र त्यानंतर त्याची कोणतीही अंमलबजावणी होत नाही. 20 लाख कोटींच्या पॅकेजचा बोलबाला करण्यात आला. मात्र कोणाला फायदा झाला हे कळलेच नाही. यावर राष्ट्रवादीच्या खासदारांनी लोकसभेतही अनेकवेळा मुद्दे उपस्थित केले. मात्र त्याचे उत्तर मिळाले नाही.

एका बाजूला बेरोजगारी अटोक्‍यात आणण्यासाठी निर्णय घेतले जात नाही. तर दुसरीकडे कामगारांसाठी अन्यायकारक ठरेल असे कामगार कायदे केले जात आहेत. केंद्राने नव्याने केलेल्या कामगार कायद्यामुळे कामगारांवर अन्याय झाला आहे. मात्र महाराष्ट्रातील आजपर्यंतच्या नेत्यांनी कामगारांसाठी योग्य निर्णय घेतले आहेत. महाविकास आघाडीतील कामगारमंत्री देखील योग्य निर्णय घेतील, असा विश्‍वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

राज्यातील भाजपावर टीका करताना पवार म्हणाले, सत्तेचा माज आला की जनता ती उतरवित असते. सत्तेचा गैरवापर करून यापूर्वीच्या शासनकाळात अतिरेक करण्यात आला होता. मात्र महाविकास आघाडी सरकार हे पुरोगामी विचारांचे असून असा प्रकार आमच्याकडून कधीच होणार नाही.

मंदिरे उघडण्याबाबत योग्य निर्णय 


गेल्या सहा ते सात महिन्यांपासून मंदिरे बंद होती. मंदिरे ही आस्थेचा विषय आहे. करोनामुळे मंदिरांबाबत खूप विचार करून निर्णय घेण्यात आला आहे. लवकर मंदिरे उघडली असती आणि करोना वाढला असता तर आज जे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करताहेत त्यांनीच करोना वाढल्यामुळे राज्य सरकारवर टीका केली असती.

राज्याचे उत्पन्न घटले 


करोनामुळे राज्याच्या उत्पन्न घटले आहे. त्याचा विकासकामांवर परिणाम होणार नसल्याचे सांगतानाच अजित पवार म्हणाले, करोनाकाळात जगताना दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम झाला आहे. करोनाची लस लवकरच उपलब्ध होईल असा विश्‍वास असून लसीकरणाबाबत राज्य पातळीवर नियोजन करण्यात येत आहे. आपणही करोनामुळे आपल्या जिवाभावाचे सहकारी गमावले आहेत. स्वत:ची काळजी घेतानाच इतरांचीही काळजी घ्यावी, असे आवाहनही पवार यांनी या वेळी केले.


Tags: पुणे
Previous Post

मतदान केंद्राबाहेर चोख पोलिस बंदोबस्त ठेवा; निवडणूक निरीक्षकांच्या जिल्हा प्रशासनाला सक्त सूचना

Next Post

ढगाळ हवामानाचा पिकांवर परिणाम; बटाटा-कांद्यावर मावा, तुडतुडे, करप्याचा प्रादुर्भाव

Next Post

ढगाळ हवामानाचा पिकांवर परिणाम; बटाटा-कांद्यावर मावा, तुडतुडे, करप्याचा प्रादुर्भाव

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

आज मलठणमध्ये सावरकर गौरव यात्रा; खासदार रणजितसिंह यांची उपस्थिती

एप्रिल 2, 2023

डॉ. देशपांडे हॉस्पिटलचा शुक्रवार, दि. ७ एप्रिलला उद्घाटन सोहळा

एप्रिल 2, 2023

राष्ट्रीय महामार्ग व जिल्हा महामार्गांना जोडणार्‍या माढा मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी ५५ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी मंजूर; खा. रणजितसिंह यांच्या प्रयत्नांना यश

एप्रिल 2, 2023

प्रवचने – मनुष्याने प्रपंचात कसे वागावे?

एप्रिल 2, 2023

आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद

एप्रिल 2, 2023

नव्या ई-ग्रंथालयाचा गरीब, गरजू विद्यार्थ्यांना अधिकाअधिक लाभ मिळावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एप्रिल 2, 2023

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवी मुंबईतील नव्या सुसज्ज कार्यालयाचे उद्घाटन

एप्रिल 2, 2023

लोणार व शेगाव विकास आराखड्याची कामे ‘मिशन मोड’वर पूर्ण करा – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

एप्रिल 2, 2023

विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्राधान्य देत अर्थसंकल्पात उच्च शिक्षणासाठी भरीव तरतूद

एप्रिल 2, 2023

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून अनिल केळगणे यांनी साधली आर्थिक प्रगती

एप्रिल 2, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!