• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

महात्मा गांधी योजनेतून अंगणवाडी, शाळा होणार टकाटक; राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 20, 2020
in Uncategorized

 


स्थैर्य, वहागाव, दि.२०: महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार
हमी योजनेतून राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी परिसरात विविध
प्रकारची कामे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यात प्रामुख्याने शाळेचे मैदान,
किचन शेड, संरक्षण भिंत, वृक्षारोपण, गांडूळ खत यासारखे विविध प्रकल्प घेता
येणार आहेत. या निर्णयामुळे शाळेचा परिसर सुंदर होणार असल्याने मुलेही
शाळेत जाण्यासाठी आकर्षित होणार आहेत. 

रोजगार हमी योजनेतून ग्रामीण भागातील मजुरांना काम देण्यात येते. कोरोना
परिस्थितीमुळे मजुरांना काम देण्याबरोबरच गावांचा विकास करण्याची सांगड
राज्य शासनाने या योजनेतून घातली आहे. अंगणवाडी व शाळांच्या परिसरात परसबाग
निर्माण करणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, रस्ते करणे, शोषखड्डे घेणे,
पाणीपुरवठा योजना राबविणे आदी प्रकारच्या कामांनाही शासनाने या योजनेतून
मंजुरी दिली आहे. या योजनेतील नियमाप्रमाणे 60 टक्के काम हे अकुशल व 40
टक्के काम हे कुशल मजुरांकडून असणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायतीकडून या
नियमाचा भंग झाला, तर जिल्हास्तरावर त्याचे प्रमाण योग्य राखण्याचेही आदेश
आहेत. कोरोना परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील मजूर व शेतकऱ्यांची आर्थिक
परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात “मागेल त्याला काम’
देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. रोजगार हमी योजनेतून ग्रामीत भागात
राजेगारही उपलब्ध होईल व विकासकामेही होतील, अशी भूमिका शासनाची आहे.
दरम्यान, राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षकांसह, पालक वर्गात
समाधानाचे वातावरण आहे. 

अमरावती जिल्ह्याचा पुढाकार : अमरावती जिल्ह्यातील
चिखलदरा तालुक्‍यातील जैतादेही गावच्या जिल्हा परिषद शाळेत चिखलदरा पंचायत
समितीचे गटविकास अधिकारी व जैतादेही शाळेच्या शिक्षकांनी याबाबतचे नियोजन
केले आहे. “जैतादेही पॅटर्न’च्या धर्तीवर मनरेगा योजनेच्या माध्यमातून
राज्यातील इतरही शाळांचा भौतिक विकास करणे शक्‍य आहे. अमरावती जिल्ह्याने
त्यासाठी पुढाकार घेतला असून, तेथील 40 टक्के शाळांचे प्रस्ताव वरिष्ठ
पातळीवर प्राप्त झाले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांनी अशीच कामगिरी
बजावल्यास महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांचा भौतिक दर्जा व गुणवत्ता
वाढीस मदत होणार आहे. 

शाळांची भौतिक सुविधेची समस्या सुटणार

 

शाळा, अंगणवाडीतील भौतिक सुविधांसाठी सातत्याने जिल्हा परिषदेसह आमदारांकडे
निधीची मागणी संबंधित गावाकडून करण्यात येत असते. रोजगार हमी योजनेतून आता
शाळेतील भौतिक सुविधा निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शाळा व
अंगणवाडीचा परिसर अधिक समृद्ध होण्यास मदत होणार आहे. या परिसरात प्रत्येक
ग्रामपंचायत शाळेतील शिक्षक व अंगणवाडीतील शिक्षकांची भूमिका अत्यंत
महत्त्वाची ठरणार आहे. 


Tags: राज्य
Previous Post

होंडा इंडिया टॅलेंट माेटाेक्राॅस स्पर्धेत इक्‍शन शानभागची भरारी

Next Post

‘रिअल इस्टेट’मध्ये दिलेली कर्जे अंगलट; संचालकांच्या अनागोंदी कारभाराचा ‘कराड जनता’ला जबर फटका

Next Post

'रिअल इस्टेट'मध्ये दिलेली कर्जे अंगलट; संचालकांच्या अनागोंदी कारभाराचा 'कराड जनता'ला जबर फटका

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उभारणीसाठी ‘आयएफसी’ सोबतचा भागिदारी करार उपयुक्त ठरेल – उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांचे प्रतिपादन

मार्च 29, 2023

प्रवचने – पैशाच्या आसक्तित राहू नये

मार्च 29, 2023

कमी पाण्यात जास्तीच्या उत्पन्नाची हमी देणारी ‘प्रति थेंब अधिक पीक योजना’

मार्च 29, 2023

ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

मार्च 29, 2023

कोकण विभागीय माहिती कार्यालयाचे संजय कोळी यांचे दीर्घ आजाराने निधन

मार्च 29, 2023

डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबविण्यात सातारा जिल्हा राज्यात अव्वल

मार्च 29, 2023

वझीरएक्सने पारदर्शकता अहवालाची चौथी आवृत्ती सादर केली

मार्च 29, 2023

मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्पाचे काम आठ दिवसात मार्गी लावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

मार्च 29, 2023

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराचे वितरण

मार्च 29, 2023

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे योजना

मार्च 29, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!