स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

महात्मा गांधी योजनेतून अंगणवाडी, शाळा होणार टकाटक; राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

Team Sthairya by Team Sthairya
December 20, 2020
in Uncategorized

 


स्थैर्य, वहागाव, दि.२०: महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार
हमी योजनेतून राज्य शासनाने जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी परिसरात विविध
प्रकारची कामे घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यात प्रामुख्याने शाळेचे मैदान,
किचन शेड, संरक्षण भिंत, वृक्षारोपण, गांडूळ खत यासारखे विविध प्रकल्प घेता
येणार आहेत. या निर्णयामुळे शाळेचा परिसर सुंदर होणार असल्याने मुलेही
शाळेत जाण्यासाठी आकर्षित होणार आहेत. 

रोजगार हमी योजनेतून ग्रामीण भागातील मजुरांना काम देण्यात येते. कोरोना
परिस्थितीमुळे मजुरांना काम देण्याबरोबरच गावांचा विकास करण्याची सांगड
राज्य शासनाने या योजनेतून घातली आहे. अंगणवाडी व शाळांच्या परिसरात परसबाग
निर्माण करणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, रस्ते करणे, शोषखड्डे घेणे,
पाणीपुरवठा योजना राबविणे आदी प्रकारच्या कामांनाही शासनाने या योजनेतून
मंजुरी दिली आहे. या योजनेतील नियमाप्रमाणे 60 टक्के काम हे अकुशल व 40
टक्के काम हे कुशल मजुरांकडून असणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायतीकडून या
नियमाचा भंग झाला, तर जिल्हास्तरावर त्याचे प्रमाण योग्य राखण्याचेही आदेश
आहेत. कोरोना परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील मजूर व शेतकऱ्यांची आर्थिक
परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात “मागेल त्याला काम’
देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. रोजगार हमी योजनेतून ग्रामीत भागात
राजेगारही उपलब्ध होईल व विकासकामेही होतील, अशी भूमिका शासनाची आहे.
दरम्यान, राज्य शासनाच्या या निर्णयामुळे शिक्षकांसह, पालक वर्गात
समाधानाचे वातावरण आहे. 

अमरावती जिल्ह्याचा पुढाकार : अमरावती जिल्ह्यातील
चिखलदरा तालुक्‍यातील जैतादेही गावच्या जिल्हा परिषद शाळेत चिखलदरा पंचायत
समितीचे गटविकास अधिकारी व जैतादेही शाळेच्या शिक्षकांनी याबाबतचे नियोजन
केले आहे. “जैतादेही पॅटर्न’च्या धर्तीवर मनरेगा योजनेच्या माध्यमातून
राज्यातील इतरही शाळांचा भौतिक विकास करणे शक्‍य आहे. अमरावती जिल्ह्याने
त्यासाठी पुढाकार घेतला असून, तेथील 40 टक्के शाळांचे प्रस्ताव वरिष्ठ
पातळीवर प्राप्त झाले आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांनी अशीच कामगिरी
बजावल्यास महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांचा भौतिक दर्जा व गुणवत्ता
वाढीस मदत होणार आहे. 

शाळांची भौतिक सुविधेची समस्या सुटणार

 

शाळा, अंगणवाडीतील भौतिक सुविधांसाठी सातत्याने जिल्हा परिषदेसह आमदारांकडे
निधीची मागणी संबंधित गावाकडून करण्यात येत असते. रोजगार हमी योजनेतून आता
शाळेतील भौतिक सुविधा निर्माण करण्याचा मार्ग मोकळा झाल्याने शाळा व
अंगणवाडीचा परिसर अधिक समृद्ध होण्यास मदत होणार आहे. या परिसरात प्रत्येक
ग्रामपंचायत शाळेतील शिक्षक व अंगणवाडीतील शिक्षकांची भूमिका अत्यंत
महत्त्वाची ठरणार आहे. 

Related


- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -

टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज

Tags: राज्य
Previous Post

होंडा इंडिया टॅलेंट माेटाेक्राॅस स्पर्धेत इक्‍शन शानभागची भरारी

Next Post

‘रिअल इस्टेट’मध्ये दिलेली कर्जे अंगलट; संचालकांच्या अनागोंदी कारभाराचा ‘कराड जनता’ला जबर फटका

Next Post

'रिअल इस्टेट'मध्ये दिलेली कर्जे अंगलट; संचालकांच्या अनागोंदी कारभाराचा 'कराड जनता'ला जबर फटका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“हर घर तिरंगा” या अभियानासाठी फलटणमध्ये श्रीमंत संजीवराजे मोफत ध्वज देणार

August 11, 2022

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून

August 11, 2022

आशियातील सर्वात मोठ्या टाटा मुंबई मॅरेथॉनला गौरवशाली परंपरा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

August 11, 2022

देश स्वतंत्र करण्यासाठी तरुणांनी रक्ताचे अर्ध्य दिले

August 11, 2022

रासायनिक निविष्ठांचा वापर हा शेवटचा पर्याय असावा- शास्त्रज्ञ डॉ. इंडी

August 11, 2022

शहीद हसेन – हुसेन यांच्या ताबुताला आटपाडीच्या नाथांनी दिला खांदा !

August 11, 2022

सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बिबी अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम प्रभात फेरी द्वारे संपन्न

August 11, 2022

आज काँग्रेसची आझादी गौरव यात्रा; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व माजी मंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती

August 11, 2022

मुधोजी महाविद्यालयात M.Com. व M.Sc चे वर्ग सुरू

August 11, 2022
कटफळ गावातून रॅली काढताना झेनिबियाचे विद्यार्थी

झैनबिया स्कूलच्या वतीने घर घर तिरंगा रॅली

August 11, 2022
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!