‘उल्लास नव भारत साक्षरता’ योजनेची FLNAT परीक्षा पुढे ढकलली; शिक्षण विभागाचे सर्व जिल्ह्यांना आदेश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

अपरिहार्य प्रशासकीय कारणांमुळे ‘उल्लास नव भारत साक्षरता’ योजनेची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २० सप्टेंबर : ‘उल्लास – नव भारत साक्षरता’ कार्यक्रमांतर्गत आयोजित केली जाणारी पहिली पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) परीक्षा अपरिहार्य प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भात राज्य साक्षरता मिशन प्राधिकरणाने सर्व जिल्ह्यांच्या शिक्षण अधिकाऱ्यांना अधिकृत पत्र पाठवून सुरू असलेली पूर्वतयारी तात्पुरती स्थगित ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

प्रशासकीय कारणांमुळे परीक्षा स्थगित

ही परीक्षा आधीच्या नियोजनानुसार रविवारी आयोजित केली जाणार होती. मात्र, अचानक उद्भवलेल्या प्रशासकीय अडचणींमुळे शिक्षण विभागाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा केंद्रांची निश्चिती, परीक्षार्थींची नोंदणी, बैठकीची व्यवस्था आणि इतर सर्व भौतिक तयारी पूर्ण झाली असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेची सुधारित तारीख आणि नवीन वेळापत्रक शिक्षण विभागाकडून लवकरच जाहीर केले जाणार आहे.

संभ्रम टाळण्यासाठी तातडीने माहिती देण्याचे निर्देश

परीक्षा पुढे ढकलल्यामुळे परीक्षार्थी, स्वयंसेवक, शिक्षक, मुख्याध्यापक आणि परीक्षा केंद्रांशी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने तातडीने सर्वांना सूचना देण्याचे आदेश राज्य साक्षरता मिशन प्राधिकरणाचे सदस्य सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिले आहेत. १५ वर्षे व त्याहून अधिक वयोगटातील असाक्षर नागरिकांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान विकसित करण्याच्या उद्देशाने ही १५० गुणांची परीक्षा आयोजित केली जाते.

 

 

Back to top button
Don`t copy text!