• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
No Result
View All Result
शनिवार, फेब्रुवारी 4, 2023
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

स्वामी विवेकानंद यांनी भारताला नवी ओळख दिली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
जानेवारी 14, 2023
in देश विदेश

दैनिक स्थैर्य । दि. १४ जानेवारी २०२३ । मुंबई । स्वामी विवेकानंद यांचे कार्य अतुलनीय आहे. त्यांनी आपल्या कार्याने भारताला नवी ओळख प्राप्त करून दिली. भारताला पुन्हा स्वर्णिम युगात नेण्यासाठी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे अनुकरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

भारत विकास परिषद, महाराष्ट्र, मुंबई प्रांत यांच्यातर्फे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे स्वामी विवेकानंद यांच्या १६० व्या जयंती निमित्त आयोजित नाट्य मंचन कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी परिषदेचे अध्यक्ष उमरावसिंह ओस्तवाल, उपाध्यक्ष संपत खुरदिया, विद्याधर मोरवाल, महासचिव दिलीप माहेश्वरी, अनिल गग्गड, मार्गर्शक वीरेंद्र याज्ञिक आदी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते राजीव श्रीवास्तव, मुंबई मेट्रोचे विभागीय संचालक शंतनू चॅटर्जी, सुनील कर्वे, अनुप श्रीवास्तव, भावेश चंदुलाल शहा, आशुतोष राठोड, अनुप बलराज, डॉ. अमूल्य साहू, डॉ. दिलीप रामदास पवार, अनुप शेट्टी आदींचा उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी नागपूरच्या राधिका क्रिएशनच्या सारिका पेंडसे यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित नाट्य मंचन सादर केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी जगाला जिंकले. त्यांचे अमेरिकेतील भाषण दिग्विजयी होते. या भाषणाने जगाला नवा विचार दिला. भारतीय संस्कृतीबरोबरील विविध संस्कृती काळाच्या ओघात लुप्त झाल्या. मात्र, भारतीय संस्कृती टिकून राहिली. भारतीय संस्कृती जगात महान आहे. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेची स्वामी विवेकानंद यांनी जगाला ओळख करून दिली, असेही त्यांनी सांगितले. यावेळी एमईटीचे व्हाइस चेअमन सुनील कर्वे, परिषदेचे उपाध्यक्ष श्री. खुरदिया, डॉ. अनुप श्रीवास्तव आदींनी मनोगत व्यक्त केले. श्री. माहेश्वरी, श्री. याज्ञिक यांनी सूत्रसंचालन केले.


Previous Post

नाविन्यपूर्ण उपक्रम, शाश्वत विकासासाठी ब्रिटनने महाराष्ट्रात गुंतवणूक करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

तेलंगणाच्या माहिती संचालकांची जनसंपर्क महासंचालनालयास भेट

Next Post

तेलंगणाच्या माहिती संचालकांची जनसंपर्क महासंचालनालयास भेट

ताज्या बातम्या

‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण’च्या माध्यमातून जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण देण्यास प्रयत्नशील राहणार

फेब्रुवारी 4, 2023

जिजामाता उद्यान आणि पद्मावती उद्यान आत्ता तरी आमच्यासाठी खुली करा! चक्क पंढरीतील बाळगोपाळांनी मुख्याधिकार्‍यांना निवेदन देत केली मागणी

फेब्रुवारी 4, 2023

सेवाभावी वृत्तीने कलेची सेवा करणाऱ्यांचा गौरव करणे हा शासनाचा बहुमान – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

फेब्रुवारी 4, 2023

राज्यात १४ वर्षाखालील मुलांच्या एफ.सी. बायर्न महाराष्ट्र करंडक फुटबॉल स्पर्धा

फेब्रुवारी 4, 2023

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला अर्थसंकल्प पूर्व आढावा

फेब्रुवारी 4, 2023

राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

फेब्रुवारी 4, 2023

खासदार डॉ. अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट

फेब्रुवारी 4, 2023

प्रा. एन. डी. पाटील हे सच्चे सत्यशोधकी – प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील

फेब्रुवारी 4, 2023

तृणधान्यापासून बनवलेल्या पदार्थांच्या विक्रीस भरभरुन प्रतिसाद; दोन दिवसात तब्बल ११ लाख रुपयांची विक्री

फेब्रुवारी 4, 2023

ग्रामरोजगार सेवकांच्या समस्या सोडवण्यासाठी सकारात्मक – फलोत्पादन व रोहयो मंत्री संदिपान भुमरे

फेब्रुवारी 4, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!