• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

रामायणाबाबतच्या ‘त्या’ वक्तव्याबद्दल सैफ अली खानने मागितली माफी

Team Sthairya by Team Sthairya
डिसेंबर 6, 2020
in Uncategorized

स्थैर्य,मुंबई, दि ६: सैफ अली खानने रामायणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे तो चांगलाच अडचणीत सापडला होता. सैफने त्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. सैफ अली खान माफी मागताना म्हणाला, ‘मला असं समजलं की, मी एका मुलाखतीमध्ये अनावधानाने केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. माझ्यासाठी भगवान राम हे नेहमीच हीरो आहेत. मी त्यांचा मनापासून आदर करतो. आदिपुरुष हा सिनेमा ‘वाईटावर चांगल्याचा विजय’ ही भावना दाखवण्यासाठी बनवणार आहोत.’ 

काय म्हणाला होता सैफ? 

अलीकडेच मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने ‘आदिपुरुष’मधील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना म्हटले की, या चित्रपटात लंकेशची व्यक्तिरेखा वाईट नसून मनोरंजक आहे. तो म्हणाला, ‘ एक अशा राक्षस राजाची भूमिका वठवणं रंजक आहे. यामध्ये सीतेच्या अपहरणानंतर झालेली रावणाची रामासोबत लढाई सूड उगविण्यात दाखवली जाईल, जी लक्ष्मणाने रावणाची बहिण शूर्पणखेचं नाक कापल्यामुळे सुरू झाली होती. सैफच्या या प्रतिक्रियेवर भाजप आमदार राम कदम यांनीही टीका केली होती. 

एका “जबरदस्त” अभिनेत्याला गमावले – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

काय म्हणाले होते राम कदम ? 

भाजप आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी सैफ अली खानवर जोरदार टीका केली होती. त्यांनी असं म्हटलं होतं की, ‘आदिपुरुष नावाच्या चित्रपटात सैफ रावणाची भूमिका साकारत आहेत. यामध्ये सैफ अली खान म्हणत आहेत की ते रावणाच्या भूमिकेला हिरोप्रमाणे प्रस्तुत करतील. ते म्हणत आहेत की, लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापल्याने त्या बदल्याच्या भावनेतून रावणाने माँ सीतेचं हरण केलं, प्रभू रामचंद्रांबरोबर युद्ध केलं. या घटनेला ते न्याय देणार आहेत. सैफ अली खान याचं समर्थन करत असतील, तर याचं समर्थन कसं होईल?’ हा सवाल उपस्थित करत राम कदम यांनी उपस्थित केला होता, ‘प्रभू रामचंद्रांनी धर्म स्थापित केला, आमची आस्था आणि श्रद्धा आहे. राम आणि रावणाची लढाई ही धर्म आणि अधर्म यांच्यातील आहे. ते अधर्माला उचित सिद्ध करत आहेत. आमच्या आस्था आणि श्रद्धेशी कोणी खेळू शकत नाही.

तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ फेम ओम राऊत आता ‘आदिपुरुष’ हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण अद्याप सुरू झालेलं नाही. यामध्ये भगवान रामांची भूमिका बाहुबली ‘प्रभास’, सीतेच्या भूमिकेत कृती सॅनन आणि रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसणार आहे. सैफच्या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावरही नाराजी पसरली होती.


Tags: देशमनोरंजन
Previous Post

मंगळवारपासून ब्रिटनमध्ये लसीकरण सुरू; सर्वप्रथम महाराणी एलिझाबेथ यांना दिली जाणार लस

Next Post

मुलीच्या सासरकडच्यांकडून तावडी येथे एकास मारहाण

Next Post

मुलीच्या सासरकडच्यांकडून तावडी येथे एकास मारहाण

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

साताऱ्यात कर्मचाऱ्यांचा जल्लोष

मार्च 20, 2023

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचं महाराष्ट्रात षडयंत्र; राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा खळबळजनक आरोप

मार्च 20, 2023

शेतीला चोवीस तास वीज मिळण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

मार्च 20, 2023

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं मोठं आश्वासन

मार्च 20, 2023

राहुल गांधींची माफी आणि JPC च्या मागणीवरुन आजही संसदेत गदारोळ

मार्च 20, 2023

म्हणून मी वारंवार दिल्लीला जातो, यापुढेही जात राहणार; CM शिदेंनी केला दिल्लीवारीचा खुलासा

मार्च 20, 2023

महाराष्ट्रात पर्यटनाबरोबर रोजगाराला चालना मिळेल – मंत्री मंगल प्रभात लोढा

मार्च 20, 2023

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला तत्काळ देण्यात यावा – मंत्री संदिपान भुमरे

मार्च 20, 2023

इकोफायचा महिंद्रा सोलाराइझसोबत सहयोग

मार्च 20, 2023

‘चला जाणूया नदीला’ अभियान देशभर जावे – राज्यपाल रमेश बैस

मार्च 20, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!