• Contact us
  • Home
  • Privacy Policy
स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

पोवाडे आणि कवितांनी आंदोलनाचा तिसरा दिवस दणाणला

संपकर्यांना जिल्हा प्रशासनाकडून नोटीस देण्याची तयारी

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
मार्च 19, 2023
in सातारा जिल्हा

दैनिक स्थैर्य । दि. १९ मार्च २०२३ । सातारा । जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपाच्या तिसऱ्या दिवशी पोवाडे कविता आणि व्याख्यानांनी राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. संपामध्ये सहा हजार 9994 कर्मचारी सहभागी झाले आहेत . महसूल विभागाची 845 कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश होता जुनी पेन्शन योजना निर्णय टप्प्यात येईपर्यंत हा संप सुरूच राहणार असल्याचे आंदोलकांच्या सुकाणू समितीने स्पष्ट केले आहे

जुनी पेन्शन योजना लागू करणे तसेच इतर काही प्रमुख मागण्यासाठी शासकीय वर्गातील वर्ग ३ व ४ कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप 14 मार्चपासून सुरू झाला आहे गुरुवारी संपाचा तिसरा दिवस होता तिसऱ्या दिवशी जिल्ह्याच्या विविध शासकीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी तिसऱ्या दिवशी सहभाग घेतला होता . सुमारे विविध संघटनांचे 2000 प्रतिनिधी पोवई नाक्यावर जमले त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तेथून सर्व आंदोलक कर्मचारी चालत जिल्हाधिकारी कार्यालयावर आले मग तेथे पोवाडे कविता व्याख्याने यांचा सलग दोन तास सिलसिला सुरू होता.

पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्याने वाहतुकीची कोंडी झाली नाही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील अर्धा रस्ता आंदोलकांनी अडवून धरला आणि जुन्या पेन्शन योजनेसाठी जोरदार घोषणाबाजी केली . संपामध्ये महसुली विभागाचे 845 कर्मचारी आज आंदोलनात सहभागी झाले होते सातारा नगरपालिकेचे केवळ आठ कर्मचारी या संपात सहभागी झाल्याचे स्पष्ट झाले .मात्र नगरपालिका संघटनेने मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर या संपातून माघार घेतली असल्याचे समोर आले आहे जिल्हा प्रशासनाने या संपाच्या विरोधात कारवाई करण्याचे सूत्र आरंभले असून नोटीसा काढण्याची तयारी सुरू झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्राने सांगितले जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 236 कर्मचाऱ्यांची आज उपस्थित होती तर 106 कर्मचारी प्रशिक्षणासाठी रवाना झाले होते त्यामुळे काही विभागांच्या कामांची अडचण झाली मात्र आस्थापना, बारनिशी, महसूल, संजय गांधी निराधार योजना पुनर्वसन तसेच इतर सर्व शासकीय विभाग नेहमीप्रमाणे सुरू होते .जुनी पेन्शन योजना लागू होईपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे


Previous Post

जुन्या पेन्शन मागणीच्या आंदोलनाबाबत प्रतिनिधिक स्वरूपातील महिलांची भूमिका

Next Post

अल्पवयीन मुलीचे अपहरण

Next Post

अल्पवयीन मुलीचे अपहरण

ताज्या बातम्या

वडूज ता. खटाव येथील रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या बैठकीतील कार्यकर्ते

रिपब्लिकन पक्षाच्या सन्मानासाठी खटाव शेती बाजार समितीच्या रिंगणात – गणेश भोसले

मार्च 30, 2023

मातृभाषेसाठी एकत्र येऊन काम करू – उद्धव ठाकरे

मार्च 30, 2023

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा

मार्च 30, 2023

तर डॉक्टरांवर बुट पॉलिश अन् भाजी विकण्याची वेळ; विधेयकाविरुद्ध डॉक्टर रस्त्यावर

मार्च 30, 2023

“पुण्याची ताकद गिरीश बापट”, हजारोंच्या समुदायात गिरीश बापट यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मार्च 30, 2023

बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने प्रियदर्शनी राजा सम्राट अशोक यांचा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न

मार्च 30, 2023

राज्यात सांस्कृतिक विभागाच्या अंतर्गत अत्याधुनिक महासंग्रहालय उभे केले जाईल – मुनगंटीवार

मार्च 30, 2023

कोळकीच्या नागरिकाची रस्ता डांबरीकरणासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाईन तक्रार; ग्रामविकास अधिकार्‍यास धरले धार्‍यावर

मार्च 30, 2023

गोखळी येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा

मार्च 30, 2023

घरकुल योजनेत भ्रष्टाचार; ५ हजार रुपये घेऊन होतेय लाभार्थ्याची निवड; ग्रामसेवकासह ग्रामपंचायत पदाधिकारी खात आहेत कमिशन

मार्च 30, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!