स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

पशुपालक हा महाराष्ट्राचा आद्य वसाहतकार; सातवाहनांनी केली पायाभरणी – प्रसिद्ध विचारवंत संजय सोनवणी

महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
April 6, 2021
in इतर, देश विदेश

स्थैर्य, नवी दिल्ली, दि.०६: उत्खननातील पुराव्यांनुसार पशुपालक हे महाराष्ट्राचे आद्य वसाहतकार असल्याचे सिद्ध झाले असून सातवाहन राजवटीने महाराष्ट्राची पायाभरणी करून राज्याला वैभव मिळवून दिले, अशी माहिती प्रसिद्ध विचारवंत व कादंबरीकार संजय सोनवणी  यांनी  दिली.

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेचे १८वे पुष्प गुंफताना  “महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इतिहास” या विषयावर श्री. सोनवणी बोलत होते.

महाराष्ट्राच्या पुरातन इतिहासाच्या ज्ञात साधनांतून महाराष्ट्रात पर्जन्यमान चांगला असल्याने पशुपालन हा येथील मुख्य व्यवसाय होता व धनगर,गवळी आदी पशुपालकांचे येथे वास्तव्य असल्याचे दिसते. म्हणूनच पशुपालक हे महाराष्ट्राचे आद्य वसाहताकर ठरतात. या मातीत महत्त्वाचे मानवी वंश राहायला आले, त्यांनी वसाहती केल्या याच वसाहतींनी निर्माण केलेल्या विरोबा, विठोबा, ज्योतिबा, जगदंबा, तुळजाभवानी, काळुबाई आदी देवी-देवता पुढे महाराष्ट्राच्या लोकदेवता झाल्या. या लोकदेवतांनी महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जोपासला, असे श्री. सोनवणी यांनी सांगितले.

सातवाहनांनी केली महाराष्ट्राची पायाभरणी

सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात घराणे  होय. सिमुख सातवाहनाने इसपूर्व २२० मध्ये जुन्नर येथे सत्ता स्थापन केली. या राजवंशाने ४५० वर्षे राज्य करून गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशपर्यंत राज्य विस्तार केला. प्राकृत मराठी भाषेला हाल सातवाहन राजाने  साहित्यिक भाषा बनवले. ‘गाथा सप्तशती’ या ग्रंथात हाल सातवाहनाने ७०० ग्रंथांचे संकलन केले. गौतमीपुत्र सातकर्णी ने मराठी माणसांचा पहिला स्वातंत्र्य लढा उभारला. सातवाहन काळात रायगड, राजगड, राजमाची आदी किल्ले बांधले गेले. नाशिक येथील पांडवलेणी, कार्ले भाजे लेण्याही याच काळात बांधल्या गेल्या. बंदरे उभारली. सातवाहनांच्या काळात महाराष्ट्रातील कला  साधने, शेती उत्पादनांचा व्यापार रोम मध्ये होत असे.  सातवाहन काळात महाराष्ट्राला मोठे वैभव प्राप्त झाले होते, असे त्यांनी सांगितले.

सातवाहनानंतर खान्देशात स्थिर झालेल्या ‘अहिर वंशा’ने सव्वाशे वर्ष राज्य केले. ६ व्या ते ८ व्या शतकात महाराष्ट्रात ‘चालुक्यांची राजवट’ आली. ८ व्या ते १० व्या शतकात ‘राष्ट्रकुट राजवट’ आली त्यांनी जैन धर्माला राजाश्रय दिला त्यामुळे महाराष्ट्रात अहिंसा,मानवता आदी मूल्यांची पायाभरणी  झाली.कोकणातील ‘शिलाहार राजवंशा’ची राजवट, त्यांचा प्रभाव व त्यांनी कोकणास मिळवून दिलेले वैभव यावर श्री सोनवणी यांनी प्रकाश टाकला.

राजा भिल्लम याने १२ व्या शतकात यादवांची सत्ता स्थापन केली. अडीचशे वर्ष राज्य करणाऱ्या यादव काळात यादव घराणे म्हणजे महाराष्ट्र अशी ओळख निर्माण झाली. यादव घराण्याने आजच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीवर अनेक प्रकारे प्रभाव टाकला. यादव काळात ‘रुक्मिणी स्वयंवर’, ‘ज्ञानेश्वरी’  या साहित्य रचना जन्माला आल्या. संतांची मांदीयाळी निर्माण होण्यासाठी यादवकाळात मनोभूमिका तयार झाल्याचे त्यांनी सांगितले.

सातवाहनांनी मराठी भाषेचा, साहित्य संस्कृतीचा, किल्ले, शेती,व्यापाराचा पाया घातला. पुढच्या राजवटींनी तो वाढवत नेत यादव काळात तो शिखरावर पोहोचला आणि आजचा महाराष्ट्र तयार व्हायला सुरुवात झाली. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय होईपर्यंत महाराष्ट्र दास्यात राहिला. तरीही येथील जनतेची मानसिक जडणघडण बदललेली नव्हती. राजकीय दास्य असले तरी सामाजिक दास्य लोकांनी स्वीकारलेले दिसत नाही.

महाराष्ट्राची संत परंपरा, वैचारिक परंपरा, राजकीय परंपरा हे राज्याचे व्यापक चित्र दर्शविते. विदर्भ, पवनी, चंद्रपूर, मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र, कोकण या विशाल भूप्रदेशावर राज्य करणाऱ्या राजवटींनी एका वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीची निर्मिती केली. हा आपला समृध्द वारसा सर्वांनी समजून घेतला पाहिजे व तो जपला पाहिजे असा आशावाद श्री. सोनवणी यांनी व्यक्त केला.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

एंजल ब्रोकिंगने ग्राहकांसाठी ‘स्मॉलकेस’ सेवा सुरु केली

Next Post

असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी त्यांची नोंदणी करण्यास प्राधान्य द्यावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

Next Post

असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी त्यांची नोंदणी करण्यास प्राधान्य द्यावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,026 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

कोरोना निर्बंध काळात बियाणे, खते, निविष्ठा पुरवठ्याच्या तक्रारींसाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित

April 16, 2021

‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे योजना’ राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या पुढाकाराने सुरू

April 16, 2021

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर केली सातारा शहराची पहाणी

April 16, 2021

गडकरी, फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळेच नागपुरातील स्थिती आटोक्यात – भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक

April 16, 2021

पंढरपूर पोट निवडणुक : नागरिकांना मतदानासाठी प्रवास करण्याबाबत सूचना

April 16, 2021

भारतातील ऍडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम्स

April 16, 2021

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ‘एएनएस कॉमर्सची’ उपाययोजना

April 16, 2021

एक देश एक रेशन कार्ड योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी

April 16, 2021

खावटी अनुदान सर्व गरजू आदिवासी कुटुंबांना द्यावे – आमदार विनोद निकोले

April 16, 2021

साताऱ्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ७८ बेडची नवीन सुविधा उभारणी; पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली जागेची पाहणी

April 16, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.