स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

उत्तरप्रदेशकडे परप्रांतिय रवाना, मात्र पोटाची चिंता कायम

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
ADVERTISEMENT

 स्थैर्य, वडूज, दि. 19 : जगभरातील करोनाच्या महामारीने भयभीत झालेल्या राज्यातील स्थानिकांसह परप्रांतीयांचे लॉकडाऊनमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शासनाच्या धोरणानुसार परप्रांतीयांचा स्वगृही जाण्यासाठी मार्ग मोकळा झाला असून खटाव तालुक्यातील शेकडो परप्रांतीय रवाना झाले. जाताना ते भावूक झाले होते. परंतु एकीकडे घरी जाण्याची उत्सुकता तर दुसरीकडे तिकडे जावून करायचे काय? ही चिंता त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. मात्र महाराष्ट्राच्या संस्कृतीत घडलेल्या या परप्रांतीयांनी जाताना  आम्ही जातो आमुच्या गावा आमचा रामराम घ्यावा,  ही भूमिका घेत माणुसकी हाच एकमेव धर्म याचा प्रत्ययच जणू दाखवून दिला.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून शासनाने खबरदारी म्हणून गत दोन महिन्यांपासून लॉकडाऊनचा पर्याय निवडला. या काळात कामधंदे बंद असल्याने इच्छुक संबंधितांना स्वगृही पाठविणे हा निर्णय शासनाला घ्यावा लागला.  करोना   संर्सगाची साखळी तोडण्यासाठी शासनस्तरावर स्वर्वतोपरी प्रयत्न सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून मुळगावी जाण्यास परवानगी रितसर दोन्ही राज्याचा समन्वय साधून घेतलेला निर्णय होय.  इतर राज्यातून रोजी-रोटीसाठी दाखल झालेल्या परप्रांतीयांना त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी शासनाने दिलेल्या परवानगीने त्यांच्यात उत्साह होता. शेकडो लोक राजस्थान, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश  येथून येवून कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रात पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते काम करीत होते. परप्रांतीयांना परतीच्या प्रवासासाठी जाण्यासाठी शासनाने ऑनलाईन परवानगी व आरोग्य तपासणी ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी ग्रामस्तरावर नेटके नियोजन केले होते. यावेळी  तहसील कार्यालय, वडूज नगरपचांयत, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी उत्कृष्टपणे संघटनात्मक काम केले. त्यामुळे खटाव तालुक्यातील परप्रातीयांना निरोप देताना व घेताना अनेकजण भावुक होऊन संभाषण करीत होते. तर निरोप घेताना काही परप्रांतीयांना अश्रू अनावर झाले. हीच आपली  कर्मभूमी म्हणजेच जन्मभूमी समजून वास्तव्य केलेल्या परप्रांतीयांना निरोप घेताना फार अवघड वाटत होते. प्रशासनातील सर्वच अधिकारी व कर्मचार्‍यांनी परप्रांतीयांची त्यांच्या स्वगृही रवानगी करताना आवश्यक ती खबरदारी घेवून जबाबदारी पार पाडली. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहरातील एसटी आगारामधून आजपर्यंत 455 परप्रांतीय त्यांच्या मुळ गावी रवाना झाले.

आत्तापर्यत खटाव तालुक्यातून मध्यप्रदेशला 21, राजस्थानला 94 आणि उत्तरप्रदेशला 340 असे एकूण 455 परप्रांतीय रवाना झाले. यावेळी या सर्वांना प्रशासनाच्यावतीने जेवणाचे पॅकींग, पाणी बॉटल, बिस्किट पुडे व लाडूचिवडा असे साहित्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी तहसीलदार डॉ. अर्चना पाटील, मुख्याधिकारी माधव खांडेकर, नायब तहसीलदार कमलाकर भादुले, नगरसेवक वचन शहा आदीसह महसूल विभाग व नगरपचांयत कर्मचारी कार्यरत होते. आजअखेर वडूज आगाराच्या 20 बस मधून 455 परप्रांतीयांना सातारा (माहुली) रेल्वे स्टेशनवर सोडण्यात आले.

खटाव तालुक्यातुन सुमारे चाळीस जण उत्तर प्रदेशला जाण्यासाठी वडूज आगारात आले होते. यावेळी काही परप्रांतीयांनी तहसीलदार अर्चना पाटील यांचे आभार मानून मनापासून धन्यवाद दिले. त्यावेळी तहसीलदार  पाटील यांनी हे आमचे आद्यकर्तव्यच असल्याचे सांगून शासनाने दिलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करावे, अशा सूचनाही केल्या. 


Tags: सातारा
ADVERTISEMENT
Previous Post

दोन कैदी आणि एक कोरेगाव तालुक्यातील झाले कोरोनामुक्त

Next Post

नागठाणे येथे सोशल डिस्टंसिंगचा नागरिकांनी फज्जा उडवला

Next Post

नागठाणे येथे सोशल डिस्टंसिंगचा नागरिकांनी फज्जा उडवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

कोणत्याही प्रकारच्या सेन्सॉरशीपऐवजी स्व-वर्गीकरण करण्यावर भर : केंद्रीय मंत्री ना. प्रकाश जावडेकर

March 5, 2021

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोळकी ग्रामस्थांना संकलित करात 50% सवलत द्यावी; निवेदनाद्वारे मागणी

March 5, 2021

सकल जैन समाज संघटनेच्या माध्यमातून अनुप शहा यांच्या नेतृत्त्वाखाली विविध राज्यातील 108 अपंगांसह 400 लोकांना मिळाला सम्मेद शिखरजी यात्रेचा लाभ

March 5, 2021

सासरच्या जाचहाटास कंटाळून मुलीची आत्महत्त्या; मयत महिलेच्या आईची बारामती पोलीसांकडे तक्रार

March 5, 2021

फलटण – पंढरपूर रेल्वे मार्गाचा अहवाल जुन्या सर्वेक्षणानुसार करा : खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 5, 2021

फलटण तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे कामकाज उत्कृष्ट : सचिन रणवरे

March 5, 2021

भाडळीत स्मशानभुमीची मागणी; श्रीमंत संजीवराजेंकडे पाठपुरावा करणार : मोहनराव डांगे

March 5, 2021
केदारेश्वर मंदिरा शेजारील सिमेंट बंधारा

औंध येथील सिमेंट बंधारा निर्लेखित करु नये, शेतकऱ्यांची मागणी

March 4, 2021

अखेर संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर, 28 तारखेला दिला होता राजीनामा

March 4, 2021

पोलिस प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, अपघात असल्याचे भासवण्यासाठी केली मोठी प्लॅनिंग

March 4, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.